Wednesday, September 10, 2014

हिंदुत्व,वेद,वैदिक संस्कृती ह्यांच्याबद्दलचा लेख( (Proof of Vedic Culture's Global Existence -by Stephen Knapp)

उत्तिष्ठत,जाग्रत… 
-रश्मी घटवाई 

उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ।
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति ।। 
(कठोपनिषद्, अध्याय १, वल्ली ३, मंत्र १४)
​​उठा,जागे व्हा आणि श्रेष्ठ,ज्ञानी व्यक्तींच्या सान्निध्यात ज्ञान प्राप्त करा.ज्ञान प्राप्तीचा मार्ग सुरीच्या धारदार पात्यावरून चालण्याइतकाच दुर्गम आहे,असं (विद्वान )कवी सांगतात.  

"उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत"-उठा,जागे व्हा आणि लक्ष्यप्राप्ती होईतो थांबू नका, असा संदेश देणाऱ्या आणि प्रखर,जाज्ज्वल्य हिंदुत्व ही ज्यांची निजखूण,त्या स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं 'अभिमानानं सांगा की मी भारतीय आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत.मात्र असेही काही लोक आपल्या देशात आहेत,जे भारतीय असूनही त्यांना भारतीय म्हणवून घ्यायची लाज वाटते,हिंदू असूनही हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटते.त्यांना हिंदू हा शब्द उच्चारलेला देखील खपत नाही आणि हिंदुस्तान असा भारताचा उल्लेख त्यांच्या लेखी घोर अपराध ठरतो . 

ह्या पार्श्वभूमीवर,अमेरिकन लेखक स्टीफन 
 ​
नॅप(Stephen Knapp)ह्यांनी आपल्या अनेक पुस्तकांतून,प्रारंभी सबंध जगात सनातन धर्म अनुसरला जात होता आणि सबंध जगात केवळ आणि केवळ वेदिक संस्कृती अनुसरली जात होती,असं अगदी शास्त्रीय कारणमीमांसा करून सप्रमाण सांगितलं आहे,ते अत्यंत मोलाचं ठरावं. अमेरिकेतल्या ख्रिश्चनधर्मीय कुटुंबात जन्मलेल्या स्टीफन 
 ​
नॅप ह्यांनी बायबलचा अभ्यास केला,पण त्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं त्यांना मिळाली नाहीत म्हणून त्यांनी हिंदू धर्म-खरे म्हणजे सनातन धर्म -आणि  वेद ,(वेदिक)वैदिक संस्कृती ह्यांचा चाळीस वर्षे दांडगा अभ्यास केला आणि प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली.ख्रिश्चन धर्म त्यागून त्यांनी सनातन धर्म स्वीकारला.आपल्या पुस्तकांतून आणि जगभर दिलेल्या भाषणांतून, प्रवचनांतून ते हिंदुत्व,वेद,वैदिक संस्कृती ह्यांच्याबद्दल अधिकारवाणीनं बोलतात. भारतातला सनातन धर्म,वेद,वैदिक संस्कृती हेच आदि आणि शाश्वत आहे,असं त्यांनी पुराव्यांसकट सिद्ध केलंय.त्यामुळे ह्या सर्वांबद्दल आस्था असणाऱ्यांनी तर वाचावंच,पण हिंदू धर्म,हिंदुत्व,वेद ,ईश्वर ,आपली प्राचीन भारतीय संस्कृती वगैरेंबद्दल प्रचंड तिरस्कार असलेल्यांनी तर हातची सगळी कामं बाजूला सारून पहिले वाचावं ,असं हे " प्रूफ ऑफ वेदिक कल्चर'
 ​
स् ग्लोबल एग्झिस्टन्स "(Proof of Vedic Culture's Global Existence -by Stephen Knapp)पुस्तक आहे.त्यानंतर,अत्यंत अबोध असूनही सुबोध म्हणवणाऱ्या ह्या स्वयंघोषित विद्वानांनी आतापर्यंत जिवापाड बाळगलेल्या अज्ञानाबद्दल स्वत:ची कींव करत,पळीत गंगाजल घ्यावं,आणि … !
http://www.stephen-knapp.com ह्या संकेतस्थळावर यांच्या कार्याबद्दल अधिक जाणून घेता येईल. 
"इतिहासाचं कोडं सोडवताना 'जिग-सॉ पझल'चे सगळे तुकडे व्यवस्थित जोडले की आपल्याला भूतकाळातल्या सगळ्या गोष्टींमागचं सत्य उलगडता येतं.सबंध जगभरातच संस्कृत भाषा बोलली जात होती आणि (वेदिक कल्चर)वैदिक संस्कृती अनुसरली जात होती,ह्याचे भरपूर पुरावे अस्तित्वात आहेत आणि सबंध जगभर उपलब्ध आहेत. प्राचीन संस्कृत वैदिक साहित्यातवैदिक संस्कृतीची आणि जगाच्या प्राचीन इतिहासाची माहिती आहे. आर्य कुठून बाहेरून आलेले लोक नाहीत,तर भारतातले,आर्यावर्तातले लोक आहेत.आर्य बाहेरून आक्रमण करून इथे आले वगैरे अपप्रचार हेतुपुरस्सर केला गेला.१० एप्रिल १८६६ रोजी लंडनमध्ये झालेल्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या बैठकीत ती मनगढंत कहाणी रचली गेली आणि त्या तथाकथित शोधाचा उगम झाला. भारतावर कायमच बाहेरून आक्रमणे झालेली आहेत,ह्या देशातल्या लोकांवर बाहेरून आलेल्या लोकांनीच नेहमी राज्य केले आहे त्यामुळे ख्रिश्चन लोकांच्या अधिपत्याखाली ह्या देशानं गुलाम म्हणून रहावं,म्हणून ब्रिटीश सत्तेनं राजकीय खेळी खेळली आणि शाळा -कॉलेजांतून पद्धतशीरपणे तसा अपप्रचार केला.ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृत शिक्षण सुरु करण्यात आलं,जेणेकरून नेटीव भारतीयांना ख्रिश्चनधर्मीय करणे ब्रिटिशांना सुकर होईल." असं स्टीफन 
 ​
नॅप प्रस्तुत पुस्तकात लिहितात.
संस्कृतचा  अभ्यासक 
 मॅक्स म्यूलर Max Mueller  ह्या जर्मन तत्ववेत्त्यानंसुद्धा पुराव्यासहित आर्यांच्या तथाकथित आक्रमणाचं खंडन केलंय.जर्मन विचारवंत Schopenhaurशॉपेनहॉअर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय की उपनिषदांच्या अभ्यासाइतकं  अधिक लाभकारक आणि रोमहर्षक अन्य काहीच नाही.फार कशाला,इंग्लिश तत्त्ववेत्त्या डॉ.अ‍ॅनी बेझंट  यांनी लिहिलं,"सुमारे चाळीस वर्षांहून अधिक काळ जगातल्या सर्व धर्मांचा अभ्यास केल्यानंतर ,हिंदू आणि हिंदुत्व ह्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या  ह्या महान धर्मावाचून दुसरं काहीच इतकं अचूक, इतकं शास्त्रीय,इतकं तात्त्विक(फिलॉसॉफिक)आणि इतकं अध्यात्मिक असं मला आढळत नाही;हिंदू धर्माशिवाय भारताचं अस्तित्व नाही. मेक नो मिस्टेक ,विदाऊट हिंदुइझम , इंडिया 
 ​
हॅज नो फ्युचर.
हिंदुइझम इज  द सॉईल इनटू व्हिच इंडिया'ज् रूट्स आर स्ट्रक,
 ​​
अ‍ॅ
ण्ड टॉर्न ऑफ 
 ​
दॅट,शी विल इनएव्हीटेबली विदर,अ‍ॅ
 ​ज अ ट्री 
टॉर्न आऊट फ्रॉम इट्स प्लेस. … लेट हिंदुइझम व्ह्ॅनिश (vanish )अ‍ॅ
 ​
ण्ड व्हॉट इज शी ?… हर लिटरेचर,हर आर्ट,हर 
मॉन्युमेन्टस्,ऑल हॅव हिंदुडम रिटन अ‍ॅक्रॉस देम. अ‍ॅ
 ​
ण्ड इफ हिंदुज डू नॉट मेन्टेन हिंदुइझम,हू  शॅ​ल सेव्ह इट ?इंडिया अलोन कॅन सेव्ह इंडिया अ‍ॅ
 ​
ण्ड इंडिया अ‍ॅ
 ​
ण्ड हिंदुइझम आर वन !"
"हिंदुत्व वैदिक तत्त्वज्ञानाशी निगडीत आहे आणि ते अगदी हिंदु ,ख्रिश्चन,बौद्ध ,मुस्लिम ह्या   वरवरच्या केवळ संज्ञांपेक्षाही अधिक व्यापक,पलीकडचं आहे. हिंदू हा शब्द मूळ संस्कृत वैदिक वाङ्ग​मयात,साहित्यात नाही. हिंदू हा शब्द नंतर वापरात आला. ईसपूर्व ३२५ वर्षे आधी, जेव्हा अलेक्झांडरनं भारतावर स्वारी केली,तेव्हा सिंधू नदीला सिंधू मधला स वगळून इंडस नाव दिलं आणि इंडसच्या पूर्वेला असलेल्या भूमीला इंडिया,हे नामाभिदान ब्रिटिशांनीही वापरलं.मुस्लिम आक्रमणकर्ते सिंधूचा उच्च्चार हिंदू असा करीत आणि इथल्या लोकांचा आणि त्यांच्या धर्माचा उल्लेख त्यांनीच हिंदू असा केला. "ते लिहितात.  

समग्र सावरकर खंड १० वा ह्या  ग्रंथातही सावरकरांनी हिंदुत्व आणि हिंदुधर्म यातील शब्दार्थ भेद यावर विस्तृत विवेचन दिलं आहे.सप्तसिंधूविषयी आर्यांना कृतज्ञ भक्तिभाव होता कारण ते प्रामुख्यानं कृषि करून रहात ,यज्ञयाग करीत.संस्कृत मधील सिंधूचे प्राकृत मध्ये हिंदू असे रुपांतर झाले -जसे सप्ताहचे हप्ता .सरस्वती चे पर्शियन रुपांतर हरहवती असे होते.कदाचित प्राकृत 'हिंदु'चेच 'सिंधु ' हे नंतरचे रुपांतर असावे. 
                    आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका 
                   पितृभू:पुण्याभूश्वैव व वै हिन्दुरितिस्मृत: ।। 
सिंधु नदीपासून ते सिंधु (समुद्र)पर्यंत पसरलेली ही भारतभूमी ज्याच्या पूर्वजांची भूमी आणि पुण्यभूमी,धर्मासह संस्कृतीची भूमी आहे,तो हिंदू !अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदूची व्याख्या केली आहे. 

" मेहेरगढ ह्या मोहेंजदरोपासून उत्तरेला १५० मैल  असलेल्या स्थानी ख्रिस्तपूर्व ६५०० वर्षे या काळात अस्तित्वात असलेल्या संस्कृतीचे पुरावे आहेत",वेदांचा अभ्यास केलेले स्टीफन 
 ​
नॅप आपल्या पुस्तकात पुढे लिहितात,"सरस्वती नदीचा ऋग्वेदात उल्लेख आहे,ऋग्वेदात सरस्वती नदीची प्रशंसा आहे आणि तिच्या पर्वतीय उगमापासून ते समुद्रापर्यंतच्या तिच्या प्रवाहाचं वर्णन आहे,की ती यमुना आणि शुतुद्री (सतलज) यांच्या मध्ये वाह्ते.अथर्ववेदात सरस्वती नदीच्या काठावर जव (बार्ली)पेरल्या-उगवल्याचा उल्लेख आहे,तर यजुर्वेदात पाच नद्या सरस्वती नदीत येउन मिळतात आणि ती खूप मोठी नदी म्हणून वहाते असा उल्लेख आहे .अलीकडच्या शास्त्रीय संशोधनावरून सिद्ध झालंय की सरस्वती नदीचा प्रवाह ख्रिस्तपूर्व ८००० वर्षे लुप्त झाला. जर का वैदिक काळातले लोक सिंधुसंस्कृतीनंतर आलेले असते,तर त्यांना सरस्वती नदीबद्दल माहिती कशी असती?ऋग्वेद ख्रिस्तपूर्व १०००० वर्षे आधी अस्तित्वात आला,"असे ते लिहितात. 

"मनु बद्दल ऋग्वेदात माहिती आहे.महापुरानंतर त्याची नाव मनालीला पोहोचल्याचा उल्लेख अथर्व-वेदात आहे .पौरव,आयु,नहुष,ययाती हे त्याचे वंशज.ययातीच्या दोन पत्नी - देवयानी आणि शर्मिष्ठा .ययातीला देवयानीपासून यदु आणि तुर्वसु हे दोन पुत्र होते आणि यदु पासून यदुवंश ,यादव निर्माण झाले,तर तुर्वसू पासून यवन किंवा तुर्क वंश . शार्मिष्ठे पासून ययातीला दृह्य,अनु आणि पुरू असे तीन पुत्र प्राप्त झाले. दृह्य-ज्याच्या वंशात पुढे भोज राजा आला,अनु-ज्यानं म्लेंछ वा ग्रीक वंश ( dynasty )निर्माण केला आणि पुरुनं पौरव वंश स्थापन केला,जो रावी नदीच्या, काठी आणि नंतर सरस्वतीच्या काठी वास्तव्य करू लागला.काहींच्या मते ह्या वंशाचा विस्तार होऊन पुढे ते इजिप्त मध्ये गेले,फरोह  pharoh ह्या नावानं ओळखले जाऊ लागले. महाभारतात पुलिंद (ग्रीस)साम्राज्य भीम आणि सह्देव यांनी जिंकल्याचा उल्लेख आहे. ग्रीस,तुर्कस्थान हे सगळे एकेकाळी वैदिक संस्कृतीचे आणि साम्राज्याचे घटक होते. "

"संस्कृत ही सोलोमनच्या काळात इसवीसनपूर्व १०१५ वर्षे या काळात जगभर बोलली जाणारी भाषा होती,त्याचप्रमाणे अलेक्झांडरच्या काळात इसवीसनपूर्व ३२४ वर्षे या  काळात जगभर बोलली जाणारी भाषा होती. संस्कृतमधला  ऋग्वेद हेच जगातलं सर्वात प्राचीन वैदिक साहित्य आहे.वैदिक साहित्यात आयुर्वेद हे धन्वंतरीचं औषधशास्त्र ,महर्षी भृगुंचा धनुर्वेद भारत मुनींचा गांधर्ववेद,स्थापत्यवेद यांचा समावेश होतो तसंच शुल्बसूत्र ह्या वैदिक गणिताचा समावेश होतो.वेदिक गणित हे 
 ​​
बॅबिलोन मध्ये  इसवीसनपूर्व  १७०० मध्ये उगम पावलेल्या गणिताचा आधार घेऊन अस्तित्वात आलेलं नाही,तर ह्या वेदिक गणिताचा आधार घेऊन बॅबिलोन मध्ये गणिताचा अविष्कार झाला आणि ग्रीक आणि पायथागोरस  यांच्या गणिताचं मूळ  वेदिक गणित हे
 च आहे. " 
इंग्रजी महिन्यांची,व्यक्तीची,देशांची नावं  ही सगळी मूळ संस्कृत शब्दांपासून आलेली व अपभ्रंशीत रूपातली आहेत,असे ते विस्तृतपणे सांगतात.जगभर कशी केवळ संस्कृत भाषा आणि वैदिक संस्कृती अस्तित्वात होती हे त्या  चारशे पानी  पुस्तकात शास्त्रशुद्धपणे उलगडलं  जातं  आणि आपण त्या महान संस्कृतीचं संचित जाणून कृतकृत्य होतो.  
-----------------------------------------
-रश्मी घटवाई 
मोबाईल :०९८७१२४९०४७