Thursday, August 14, 2014

Whirlpool...Whirlpool...We are sick with the service standard of Whirlpool...

We are sick with the service standard of Whirlpool...

I have heard that the companies strive hard to retain and further grow their customer base,whereas here,I am seeing a company,which is hellbent upon losing its customers.I have already decided that in future I am not going to buy any Whirlpool product and have advised my relatives and friends for the same,which they have promptly acted upon.I would be very soon writing an extensive article,on how the customer-though deemed as king,is actually being treated as a beggar by the companies and that they forget that their very existence depends upon the customers.

Tuesday, August 12, 2014

भारताच्या स्वातंत्र्यदिना निमित्त लेख:​​भळभळणाऱ्या जखमा,ठसठसणारी वेदना…

भळभळणाऱ्या जखमा,ठसठसणारी वेदना… 
​​
विद्यार्थीदशेत असताना रुक्ष भासणारे विषय व्यवहार्य जगात पाऊल ठेवल्यावरच खऱ्या अर्थानं आपल्याला कळतात. इतिहासातल्या घटनांमध्ये त्यावेळी आपल्याला भले स्वारस्य वाटलं नसलं, तरी इतिहासानं घडवलेला भूगोल नंतर अनेकविध माध्यमातून कल्पनेपलिकडचं भीषण वास्तव आपल्याला उलगडून दाखवतो,त्यावेळी मनाला विलक्षण चटका बसतो. 

ईस्ट इंडिया कंपनीनं व्यापार -उदिमाच्या मिषानं इ.स.१६०० मध्ये भारताच्या भूमीवर ठेवलेलं पाऊल शतक-दर शतक घट्ट रोवत गेलं आणि साम्राज्यावरचा सूर्य नं ढळणाऱ्या ब्रिटीश राजसत्तेनं आपली पकड आणखी मजबूत करत ह्या देशाचं वैभव,अस्मिता,स्वातंत्र्य हिरावून घेत त्याला हीन-दीन अशा भुकेकंगाल अवस्थेप्रत आणून ठेवलं. 'डिव्हाइड अ‍ॅण्ड रूल'- दोन धर्मांमध्ये वैमनस्य आणि तेढ उत्पन्न करून राज्य करण्याचं तंत्र अवलंबित अखेरीस देशाचे तुकडे केले.हा इतिहास आपल्या मनावर कायमचा कोरला गेला आहे .
भारताला स्वातंत्र्य मिळून बघता-बघता ६७ वर्षे झाली. आपल्या देशानं स्वातंत्र्याची फार मोठी किंमत फाळणीच्या आणि फाळणीदरम्यान झालेल्या नरसंहाराच्या रुपानं चुकवली.स्वातंत्र्य मिळवताना देशाचे तुकडे होणं,अपिरिमित नरसंहार होणं आवश्यक होतं का हा प्रश्न आजही प्रत्येकाला पडतो. त्यावेळच्या अपिरिमित नरसंहाराबद्दल आणि अत्याचारांबद्दल कुणाही संवेदनाशील व्यक्तीच्या मनात कालवाकालव व्हावी!फाळणी टाळता आली असती,अशा अर्थाची विधानं फाळणीला जबाबदार असलेल्यांनी स्वत: केली आहेत. फाळणी टाळता आली असती का,ह्यावर अनेक विचारवंतांनी अनेक पुस्तकांतून विचारमंथन केलं आहे.
""If British governments had been prepared to grant in 1900 what they refused in 1900 but granted in 1920,or to grant in 1920 what they refused in 1920 but granted in 1940;or to grant in 1940,what they refused in 1940 but granted in 1947-then nine tenths of the misery,hatred and violence,the imprisonings and terrorism, the murders,flogging,shootings,assassinations,even the racial massacres would have been avoided;the transference of power might well have been accomplished peacefully,even possibly without Partition.भारतीयांनी सन १९०० मध्ये जी मागणी केली,ती ब्रिटीश सरकारनं तेव्हा नाकारली आणि जे मागितलं ते सन १९०० ऐवजी १९२० सालीं देऊ केलं,१९२० सालीं जी मागणी केली,ती तेव्हा धुडकावून ते १९४० सालीं देऊ केलं आणि १९४० सालीं मध्ये केलेली मागणी फेटाळून ते १९४७ सालीं भारतीयांना देऊ केलं. ब्रिटीश सरकारनं भारतीयांची मागणी तेव्हाच पूरी केली असती तर दु:ख,द्वेष,हिंसा, हत्या, अत्याचार, कारावास, दहशतवाद, खूनखराबा,गोळीबार,एवढंच काय धर्मांधतेतून झालेला नरसंहार,हे सगळं टळलं असतं.सत्तेचं हस्तांतरण शांततापूर्वक आणि कदाचित फाळणी नं होतासुद्धा झालं असतं," असं प्रशासकीय अधिकारी आणि लेखक लिओनार्ड वूल्फ (लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचे पती )यांनी लिहिलंय.  

ते अर्थातच अगदी खरं आहे.कारण इतिहासाच्या पुस्तकांचा मागोवा घेतला तर दिसतं,की  फाळणी होण्यामागे केवळ एका व्यक्तीचा अहंकार आणि आडमुठेपणा होता.'द मॅन हू डिव्हायडेड इंडिया 'हे रफ़िक झकारिया यांचं पुस्तक ह्यावर सखोल विवेचन करतं.फाळणी झाली;ती महंमद अली जिन्ना यांच्या दुराग्रहामुळे! 'भला तेरी कमीज मेरी कमीज से सफ़ेद कैसी ?'ह्या ईर्षेतून, महात्मा गांधींवर कुरघोडी करण्याच्या आणि स्वत:चं राजकीय महात्म्य रुजवण्याच्या दुर्दम्य लालसेपोटी जिन्नांनी आपली आधीची भूमिका पूर्णपणे बदलली आणि द्विराष्ट्रवादाचा हट्ट धरला.भारतीय राजकीय आणि सामाजिक पटलावर महात्मा गांधींच्या तोडीचं स्थान आणि आदर मिळवण्यासाठी त्यांनी जिवाचं रान केलं.त्यांनी पद्धतशीरपणे हिंदू आणि मुस्लिम धर्मियांमध्ये दरी निर्माण केली आणि रूढार्थानं धर्माचं पालन न करूनसुद्धा आपणच मुस्लिम धर्मियांचे एकुलते एक तारणहार अशी आपली प्रतिमा निर्माण केली.हिंदू आणि मुस्लिम धर्मियांमध्ये काहीच साम्य नाही,वस्तुत: ती दोन भिन्न  राष्ट्रे आहेत,अशा प्रकारे प्रचार करून त्यांनी वातावरण कलुषित करून हटवादीपणे भारताच्या फाळणीची मागणी लावून  धरली. गांधी ट्राइड टु विन ओव्हर जिन्ना सेव्हरल टाईम्स…सिन्स द अ‍ॅडव्हेन्ट ऑफ गांधी,जिन्ना स्ट्रगल्ड हार्ड टु  अ‍ॅव्हेन्ज हिज ह्युमिलियेशन अ‍ॅन्ड सक्सीड इन अ‍ॅक्वायरिंगअ पोझिशन व्हिच इक्वलड्  दॅट ऑफ गांधी…ही सक्सेसफुली इनक्रीजड् द रिफ्ट बिटवीन द टू कम्युनिटीज,कन्व्हिन्सड् द वर्ल्ड  दॅट हिंदूज  अ‍ॅन्ड मुस्लिमस् हॅ नथिंग इन कॉमन बिटवीन देम…दॅट हिंदूज अ‍ॅन्ड मुस्लिम वेअर टू डिफरन्ट नेशन्स…हॅविंग विलफुली पॉइझनड् द अ‍ॅटमॉस्फिअर ऑफ युनिटी ,ही पुट फोर्थ हिज डिमांड  फॉर द पार्टिशन ऑफ इंडिया". फाळणीची मागणी करणारा हा माथेफिरू आणि फाळणी ही मोठीच आपत्ती असेल असं ठाम मत असणाऱ्या लॉर्ड माऊंबॅटननं मात्र फाळणीला मूर्तस्वरूप का द्यावं, असा सवाल करीत झकारियांनी कुठलीही भीडभाड नं ठेवता जिन्नांचा ताळेबंद मांडला आहे.    
मात्र ज्यांनी भारताची फाळणी केली ,दस्तुरखुद्द त्यांनीच त्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केल्याबद्दल, नवी दिल्लीत ऑस्ट्रेलिया चे राष्ट्रदूत -हाय कमिशनर म्हणून काम केलेले आणि नेहरूंचे परिचित वॉल्टर क्रॉकर यांनी 'नेहरू,-अ कन्टेम्पररी'ज एस्टीमेट'ह्या आपल्या पुस्तकात  नेहरू ह्या आपल्या समकालीनाचा लेखाजोखा मांडताना उल्लेख केलेला आहे. पाकिस्तानची निर्मिती करणं ही चूक झाली आणि पाकिस्तानच्या निर्मितीपेक्षा स्वातंत्र्य उशिरा मिळालं असतं ,तर ते अधिक योग्य झालं असतं,असं जिन्ना म्हणाल्याचं जिन्नांच्या जीवनाच्या अखेरच्या कालावधीत,त्यांच्या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्यावर  उपचार करणाऱ्या भारतीय डॉक्टरांनी म्हटलं होतं . "According to one of the Indian Doctors attending Jinnah in the later part of his fatal illness Jinnah said that the creation of Pakistan was a mistake and that rather than create it the better course would have been to delay independence."'(Nehru -A Contemporary's Estimate'-by Walter Crocker) 

'फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट ' हे डॉमिनिक लापियर आणि लॅरी कॉलिनस् (Freedom at Midnight -Dominique Lapierre , Larry Collins )या लेखकद्वयीचं अत्यंत गाजलेलं पुस्तक. भारतात ब्रिटीश राज्यसत्तेची सुरुवात कशी झाली,इथल्या राजघराण्यांचा राजेशाही थाट आणि कारभार कसा चालत होता, ब्रिटन मध्ये काय घडत होतं इथपासून ते  स्वातंत्र्यप्राप्तीचा संघर्ष, प्रत्यक्ष स्वातंत्र्यप्राप्ती, फाळणी  आणि त्यापायी  झालेला नृशंस नरसंहार हे आपल्यासमोर जणू दृश्य रूपात ते उभं करतात. 
जिन्ना यांना टीबी झालेला असून जिन्ना केवळ सहा महिन्याचेच सोबती असल्याचं निदान डॉक्टरांनी केल्याची अत्यंत महत्वाची माहिती  १९४७ सालीं माउंटबॅटन यांच्यापासूनलपवून ठेवण्यात आली होती. जर  ही बातमी  माउंटबॅटन यांना कळली असती,तर माउंटबॅटन यांनी वेगळा निर्णय घेतला असता,वा  जिन्नांच्या  मृत्यूपश्चात निर्णय घेतला असता;कदाचित पाकिस्तान अस्तित्वातच आलं नसतं .  
'देअर वॉज वन व्हायटल पीस ऑफ नॉलेज डिनाइड टू माऊंबॅटन इन द समर ऑफ १९४७… दॅट जिन्ना वॉज डाइंग ऑफ टी.बी. अ‍ॅन्ड दॅट ही हॅड लेस दॅन सिक्स मंथस् टु लिव्ह.हॅड ही नोन दॅट,ही वुड हॅव अ‍ॅक्टेड क्वाइट डिफरन्टली…माऊंबॅटन वुड हॅव बीन सोअरली टेम्प्टेड टु अवेट हिज डेथ.देन , परहॅप्स, पाकिस्तान वुड नेव्हर हॅव कम इनटु बीईंग!' लेखकद्वयी लिहिते.
मजूर पक्षाचे  ब्रिटनचे पंतप्रधान क्लीमंट अ‍ॅटलींनी सहा फूट उंची आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या,४६ वर्षीय माऊंबॅटनना भारताचे व्हॉईसरॉय  म्हणून भारतात पाठवलं. माऊंबॅटन व्हिक्टोरिया राणीचे पणतू होते. माऊंबॅटननी  भारताला तडकाफडकी स्वातंत्र्य देऊ केलं आणि घाईघाईनं सत्तांतरण केलं , तसंच नरसंहार होऊ नये म्हणून त्यांनी काहीच काहीच केलं नाही,असा माऊंबॅटन यांच्यावर आरोप केला जातो. 
लाहोरमध्ये काँग्रेसनं  पूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव मांडून १९३० सालच्या  जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी,म्हणजे २६ जानेवारी १९३० हा स्वातंत्र्यदिन म्हणून  मुक्रर करून दरवर्षी साजरा करण्याचं ठरवलं . अखेरात अखेर ३० जून १९४८ रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याचं ब्रिटीशांनी निश्चित केलं होतं .  मात्र अधिक उशीर केला तर भारतीय उपखंडात सिव्हिल वॉर -जनक्षोभ उसळेल असं माऊंबॅटन यांना वाटत होतं .माऊंबॅटन यांचा नवा मसूदा तयारच होता,त्यावर ३ जून १९४७ रोजीच्या अत्यंत महत्वाच्या,ऐतिहासिक  बैठकीत मोठ्या चतुराईनं आणि नाटकीय पद्धतीनं माउंटबॅटन यांनी जवाहरलाल नेहरू,वल्लभभाई पटेल,जे.बी.कृपलानी हे काँग्रेसचे नेते,महम्मद अली जिन्ना,लियाकत अली खान,अब्दुर रब निश्तर हे मुस्लिम लीगचे नेते आणि शिखांचा प्रतिनिधी म्हणून सरदार बलदेव सिंह अशा ७ नेत्यांची स्वीकृती मिळवली. माऊंबॅटन प्लान प्रमाणे देशाची -भूभागाची फाळणी तर  होणारच होती;स्थावर जंगमाची ,पैशा -अडक्याची,साहित्य सामुग्रीची ,कैद्यांची,सैन्याची -साऱ्या -साऱ्याची वाटणी होणार होती.त्या दिवशी संध्याकाळी ऑल इंडिया रेडियोवरून माउंटबॅटन,जवाहरलाल नेहरू, महम्मद अली जिन्ना यांनी,फाळणी होऊन दोन स्वतंत्र,सार्वभौम राष्ट्रे निर्माण होण्यास त्यांची स्वीकृती असल्याची अधिकृतरीत्या घोषणा केली. 

व्हॉईसरॉय  माऊंबॅटन यांनी फाळणीच्या घोषणेबद्दल घेतलेल्या पत्रकार परिषदेला जगभरातले ३०० पत्रकार उपस्थित होते. सत्तांतरणासाठी तुम्ही तारीख निश्चित केलीच असेल ना,असे एका पत्रकाराने विचारले,त्यावर  माऊंबॅटन यांनी होकार दिला.मग ती तारीख कोणती अशी त्या पत्रकारानं पृच्छा केली.खरं तर  माउंटबॅटन यांनी अशी कोणतीच तारीख वगैरे मनात ठरवली नव्हती .मात्र आपण जिवंत ज्वालामुखीवर बसलो आहोत,त्या ज्वालामुखीचा कधीही उद्रेक होईल,कधीही जनक्षोभ उसळू शकेल , याची त्यांना जाणीव होती. "सत्तांतरणासाठी तारीख निश्चित केली आहे",त्यांनी घोषणा केली.वेगानं त्यांच्या डोक्यात चक्रं फिरू लागली.कुठली बरं तारीख सांगावी?क्षणभर ते विचार करू लागले आणि एका तारखेपाशी येऊन थांबले.त्यांच्यालेखी यापेक्षा अधिक सयुक्तिक तारीख दुसरी नव्हती,कारण दोन वर्षांपूर्वी त्या दिवशी बर्मामध्ये त्यांना विजयश्री मिळाली होती,जपाननं दुसऱ्या महायुद्धात अलाईड फोर्सेस-ब्रिटनच्या संयुक्त फौजांसमोर शरणागती पत्करली होती.त्या विजयाचा उद्गाता भारताच्या पारतंत्र्यातून होणाऱ्या मुक्तीचाही उद्गाता ठरणार होता.माऊंबॅटन यांनी घोषणा केली,"भारताच्या हातात सत्तेची सारी सूत्रे १५ ऑगस्ट १९४७ रोजी सोपवण्यात येतील!"अशा प्रकारे आधी काहीही नं ठरवता त्यांनी उत्स्फुरपणे तारीख घोषित करून टाकली.मात्र तो दिवस ज्योतिष्यांच्या मते अत्यंत अशुभ होता आणि त्या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्यास त्याचे भयंकर आणि दूरगामी परिणाम होतील , मोठा विध्वंस होईल,असं सगळ्या ज्योतिष्यांनी भाकीत वर्तवलं होतं.  
आणि तसंच झालं.सिरिल रॅडक्लिफ यांनी आखलेल्या रेषांवरून देशाचं द्विभाजन झालं आणि देशात संतापाचा आगडोंब उसळला.विद्वेषाच्या त्या अग्नीत पंचवीस तीस लाख लोकांचे प्राण गेले,स्त्रियांची अब्रू गेली आणि लाखो संसार उध्वस्त झाले .देशाची शकलं झाली.            
"भारताची फाळणी का झाली ?आणि फाळणी अपरिहार्यच होती,तर त्यात एवढा नरसंहार का व्हावा?" लेखक रामचंद्र गुहा " इंडिया आफ्टर गांधी" ह्या आपल्या पुस्तकात प्रश्न करतात. ह्या नऊशे पानी पुस्तकात त्यांनी सखोलपणे आणि अत्यंत अभ्यासू वृत्तीनी गांधींच्या आधीच्या आणि नंतरच्या भारताच्या इतिहासाचा मागोवा घेतला आहे. त्या नृशंस नरसंहाराचं वर्णन फाळणीच्या भळभळणाऱ्या जखमा मनात ठसठसणारी वेदना जागवतात.नियतीशी झालेल्या त्या कराराचं दु:ख मनात कायमचं व्यापून उरतं .
--------------------------------------------------------------------------------------------
रश्मी घटवाई 
०९८७१२४९०४७