Monday, February 16, 2015

Women power:देशातली स्त्री शक्ती:प्रबळ मनुष्यबळाचा स्त्रोत

देशातली स्त्री शक्ती:प्रबळ मनुष्यबळाचा स्त्रोत  
-रश्मी घटवाई 

एक काळ असा होता की कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अर्थार्जनाची जबाबदारी पुरुषाची तर घर सांभाळण्याची जबाबदारी स्त्रीची अशी वाटणी होती.घर हे स्त्रीचं कार्यक्षेत्र होतं आणि उत्तमरीत्या ती ते सांभाळीत होती.विस्तारणाऱ्या कुटुंबाच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी,वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी सुशिक्षित महिला अर्थार्जनासाठी बाहेर पडल्या आणि आज सर्वच क्षेत्रांत त्यांचा सन्माननीय वावर होताना दिसतो आहे.तरीही अनेकविध कारणांमुळे केवळ गृहिणी म्हणून पूर्णवेळ काम करणाऱ्या महिला आपल्या देशात खूप मोठ्या संख्येनं आहेत.गृहिणी म्हणून कार्य करणाऱ्या,घर सांभाळतानाच फावल्या वेळात काही ना काही काम करून अर्थार्जन करून संसाराला हातभार लावणाऱ्या महिलांचा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. घरात राहूनही अनेक आघाड्या सांभाळणारी ही स्त्री शक्ती खरं म्हणजे ह्यूमन रिसोर्सेसच आहे.ह्या होम मेकर्स खरं म्हणजे नेशन मेकर्स आहेत.जीडीपीमध्ये ह्या एवढ्या मोठ्या वर्गाच्या श्रमांचा,परिश्रमांचा सहभागही धरला जात  नाही.त्यांच्याकडे आजही (तसं)उपेक्षेनी(च)पाहिल्या जात असल्यामुळे आणि गृहिणींच्या अनमोल कार्याचे नेमके मूल्यांकन,मूल्यमापन होऊ शकत नसल्यामुळे त्याचं घर उभारणीतलं,राष्ट्र उभारणीतलं योगदान अनुल्लेखित रहातं. आजारपणात लहानग्याची मायेनं शुश्रुषा करणाऱ्या आईच्या श्रमांना क्वांटीफाय कसं करता येईल?पैशांत त्याची किंमत कशी ठरवता येईल?(इथे प्र.के.अत्रे यांची 'दिनूचे बिल' ही  बालकथा आठवते.) मला काही काळापूर्वीचं एक व्यंगचित्र आठवतं.ग्रामीण भागातला एक माणूस हुक्क्याचा वगैरे आस्वाद घेत बाजेवर लोळत पडलेला त्यात दाखवला होता. त्याची बायको चूल फुंकताना दाखवली होती,स्वयंपाक रांधून आजूबाजूला असलेल्या बालगोपालांना खायला घालणे,बाजूला बांधलेल्या गायीगुरांना चारा-पाणी देणे इत्यादी कामे देखील तिची विनातक्रार सुरु होती,माझी बायको काहीच काम करीत नाही, ती केवळ दोनवेळ स्वयंपाक करते,मुलांना जेवायला घालते,त्यांना हवे-नको बघते,गायी गुरांकडे बघते,त्यांना चारापाणी देणे,चरायला नेणे,गोठा स्वच्छ करणे ,घरातले केरवारे करणे, सगळ्यांचे कपडे धुणे , नदीवरून पाणी आणणे वगैरे करते;पण काम म्हणून काहीच करीत नाही,असे तो पुरुष बाजेवर लोळतच कुणाला तरी सांगतोय,असं त्या व्यंगचित्रात दाखवलं होतं.        
काही महिन्यांपूर्वीपूर्वी  भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाचा 
​​
नॅ
​शनल 
सॅम्पल सर्व्हे रिपोर्ट प्रसिद्ध झाला होता.पार्टीसिपेशन ऑफ विमेन इन स्पेसिफाइड 
​​
​​
अ‍ॅ
​क्टिव्हिटीज् ह्या नावानं 
इंग्रजीत आणि घरेलू कार्यों के साथ-साथ विनिर्दिष्ट क्रियाकलापों में महिलाओं की भागीदारी ह्या नावानं हिंदीत प्रसिद्ध झालेला हा अहवाल सरकारी असला तरी त्यात माहिती रोचकपणे दिलेली असल्यामुळे कंटाळवाणा नं ठरता फार उपयुक्त  दस्तावेज ठरावा.अखिल भारतीय स्तरावर रोजगार आणि बेरोजगारी ह्याबाबतची  
​​
नॅ
​शनल 
सॅम्पल सर्व्हे ऑफिसद्वारे  सर्वेक्षण करून दिली गेलेली आकडेवारी सरकारी आणि अन्य संस्थांसाठी, धोरणे आखण्याच्या कामी महत्वाची भूमिका बजावते.जुलै २०११ ते जून २०१२ या काळात  'रोजगार आणि बेरोजगारी' या संदर्भात केल्या गेलेल्या पाहणीवर आधारित हा सर्व्हे रिपोर्ट नॅ
​शनल 
सॅम्पल सर्व्हे ऑफिसद्वारे सप्टेंबर २०१४ मध्ये प्रसिद्ध झाला,ज्यात गृहिणी म्हणून कार्य करणाऱ्या,घर सांभाळतानाच फावल्या वेळात काही ना काही काम करून अर्थार्जन करून संसाराला हातभार लावणाऱ्या महिलांचा,त्यांच्या ह्या परि-श्रमांचा आढावा घेऊन त्याबाबतची आकडेवारी विस्तृत विश्लेषणासह दिली आहे. ह्या अहवालानुसार शहरी भागातल्या ४८% स्त्रिया पूर्णवेळ गृहिणी होत्या,त्यांपैकी ३६% स्त्रिया निव्वळ घरकाम करणाऱ्या होत्या,तर ११.६ % स्त्रिया शिवण-विणकाम वगैरे कामे करून,घरचा कर्ता  पुरुष पीठ कमवत असेल तर आपण निदान मीठ कमवावं ह्या उद्देशानं संसाराला आर्थिक हातभार लावत होत्या.ग्रामीण भागातल्या पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण ४२ %होतं ,त्यांपैकी १८.५ % स्त्रिया निव्वळ घरकाम करणाऱ्या होत्या,मात्र घर सांभाळतानाच फावल्या वेळात शिवण-टिपण,विणकाम वगैरे काम करून संसाराला हातभार लावणाऱ्या महिलांची संख्या २३. ७ %होती. १५ वर्षे वयापेक्षा अधिक वय असलेल्या शहरी भागातल्या ६४ % स्त्रिया ह्या पूर्णवेळ गृहिणी असल्याचं आणि ग्रामीण भागातल्या ६० % स्त्रिया ह्या पूर्णवेळ गृहिणी असल्याचं,त्यापैकी १५-५९ वयोगटातल्या शहरी भागातल्या   ६५. १ % तर १५-६४ वयोगटातल्या  ६५. ३ %स्त्रिया असल्याचं त्यात म्हटलं आहे. ग्रामीण भागात ह्या दोन्ही वयोगटातल्या स्त्रियांची टक्केवारी अनुक्रमे ६१. ६ आणि ६१. ४ एवढी होती  आणि ६५ वर्षे अथवा त्याहून अधिक वय असलेल्या ४१. ५ %शहरी आणि ग्रामीण भागातल्या ३७. २ % स्त्रिया पूर्णवेळ गृहिणी म्हणून  काम करीत असल्याचं ह्या सरकारी अहवालानुसार म्हणणं होतं. ही आकडेवारी किती बोलकी आहे,पहा!
कुणी कितीही हिणवलं,तरी घरकाम ही एक कधीही नं संपणारी, पूर्ण वेळ द्यावा लागणारी गोष्ट आहे.सुगृहिणी केवळ घरकाम आणि बालसंगोपनच करीत नाही,तर मुलांचा  अभ्यास घेणं,मुलांच्या शाळा-कॉलेजांची वेळापत्रके सांभाळणं,पतिराजांच्या कार्यालयाचे वेळापत्रकसांभाळणं,घरात सासूसासरे वा इतर ज्येष्ठ सदस्य असतील तर त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्या औषध-पाण्याचं वेळापत्रक सांभाळणं,आला-गेला,पै-पाहुण्याचं आदरातिथ्य करणं, वीज-पाणी-टेलिफोन वगैरेंची बिलं भरणं,धान्य-किराणा,भाजी-पाला आणणं आणि त्या सगळ्याची व्यवस्था बघणं,बचत,आर्थिक नियोजन करणं,त्याची अंमलबजावणी करणं अशी अनंत कामं गृहिणीसाठी तयार असतात आणि ही सगळी जबाबदारी ती मोठ्या कुशलतेनं पार पाडत असते."मनी सेव्ह्ड इज मनी अर्न
ड्"असं म्हटलं जातं.भलेही रूढार्थानं  अशिक्षित अथवा अल्पशिक्षित असेल,पण भारतीय स्त्री ही जात्याच काटकसरी असते आणि हे वचन आचरणात आणत असते,यथाशक्ती कुटुंबासाठी 'थेंबे थेंबे तळे साचवत' असते.आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातल्या,कष्टकरी स्त्रिया आधीपासूनच संसार चालवण्यासाठी कार्यरत होत्याच; मध्यमवर्गीय घरातली सुगृहिणी अष्टभुजा होऊन हसतमुखानं चटाचट घरातली कामं उरकून ,आपले छंद जोपासून वर फावल्या वेळात संसारासाठी अधिकचे चार पैसे मिळवण्यासाठी झटते आहे,ही तिच्या उद्यमशीलतेची साक्ष देणारी गोष्ट आहे. 
अनेक सुशिक्षित,उच्च शिक्षित स्त्रियांनाही,कधी मुलांकडे बघायला कोणी नाही अथवा घरातल्या ज्येष्ठ कुटुंबियांकडे बघावे लागते म्हणून,तर कधी पतिराजांच्या फिरतीच्या नोकरीपायी,पूर्णवेळ गृहिणी म्हणून घर सांभाळावे  लागते.खरे तर ह्या सुशिक्षित गृहिणी हा एक फार मोठा मनुष्यबळाचा स्त्रोत आपल्याजवळ आहे आणि राष्ट्रनिर्मितीच्या कामी ह्या मनुष्यबळाचा वापर करून घेऊन देशाच्या नेतृत्वाला मोठी उद्दिष्ट्य साधता येऊ शकतील. उदाहरणार्थ ह्यांपैकी अनेक सुशिक्षित महिलांना शिक्षण व तत्सम अनेक उपक्रमात जोडल्या जाऊ शकतं.पूर्णवेळ गृहिणी म्हणून कार्यरत असलेल्या आणि आपल्या मुलाबाळांचे अभ्यास घेऊन आणि ते इंजिनिअर -मेडिकल सारख्या उच्चशिक्षणाच्या मार्गाला लागल्यावर हाती  अतिरिक्त वेळ असलेल्या अनेक सुशिक्षित गृहिणी शहरांत आहेत. ग्रामीण भागातल्या मुलांना शिकवायला चांगले शिक्षक उपलब्ध नाहीत.मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, टीव्ही सारख्या दृक-श्राव्य माध्यमाच्या मदतीने अशा सुशिक्षित गृहिणींकडून ग्रामीण विद्यार्थ्यांना उत्तमरीत्या दूरस्थ शिक्षण देता येईल,अनेक प्रकारचा कौशल्य-विकास साधता येईल,ग्रामीण भागात आरोग्य,स्वच्छता-हेल्थ -हायजिनचं महत्व त्यांच्याकरवी पटवून देता येईल.शहरांत आज बालगुन्हेगारी वाढीला लागली आहे.अनेक सुशिक्षित गृहिणींकडून बाल-सुधारगृहांमधल्या मार्ग चुकलेल्या त्या लहानग्यांना चांगले वळण लावण्याचे काम करवून घेता येईल,ज्येष्ठ नागरिक,कुपोषित बालके,अपंग व्यक्ती ,समाजातल्या ह्या सर्व घटकांच्या कल्याणाचे उपक्रम राबवण्याच्या कामी ह्या गृहिणींना जोडल्या जाऊ शकतं. ही यादी नं संपणारी आहे.ह्याचा दुहेरी फायदा असा,की मुलेबाळे मोठी होऊन शिक्षण-नोकरी-लग्न ह्या निमित्ताने घरातून बाहेर पडल्यावर तोवर त्यांच्यासाठी खस्ता खाणाऱ्या गृहिणीला फार एकाकी वाटू लागतं -ह्या विमनस्क अवस्थेला एम्प्टी नेस्ट सिंड्रोम म्हणतात-तो ह्या नव्यानं व्यस्त झालेल्या गृहिणींना छळणार नाही.त्याचबरोबर,इतके दिवस आपल्या घरासाठी झटणाऱ्या ह्या स्त्री शक्तीला राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान दिल्याचे आगळेवेगळे समाधानही लाभेल. 
-------------------------------------------------------------------------------------------------------------रश्मी घटवाई 
M:09871249047

Tuesday, February 3, 2015

U.S.President Obama's visit to India:"Yes,We Can!"

येस वुई कॅन!
-रश्मी घटवाई 
तो आला,त्यानं पाहिलं,तो बोलला आणि त्यानं जिंकलं!अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतभेटीला येणारयेणार म्हणून गेले काही दिवसांपासून देशवासियांची उत्सुकता ताणली गेली होती.त्यांच्या देशाच्या,पर्यायानं  विश्वातल्या सर्वोच्च अशा त्यापदाच्या इभ्रतीला आणि इतमामाला साजेशा पद्धतीनं सुरक्षेचं अभेद्य कवच दिल्लीच्याच नव्हेतर आपल्या सबंध देशाच्या भू-जल-आकाशाला गवसणी घालून प्राणपणानं सज्ज झालं होतं.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतभेटीला येण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हतीयाआधीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतभेटीवर आलेले होते. १९५९ सालीं भारतभेटीवर आलेले आयसेनहॉवर(Dwight D. Eisenhower)हे भारताला भेट देणारे सर्वात पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्यानंतर रिचर्ड निक्सन यांनी,कुठल्याही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी स्वतंत्र भारताला दिलेली अगदी सर्वात कमी अवधीचीअशी एकदिवसीयभेट १९६९ मध्ये भारताला दिली होती. त्यांच्यानंतर जानेवारी १९७८ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर,मार्च २००० मध्ये  राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारताला भेट दिली होती.बिल क्लिंटन यांच्या भेटीच्या वेळी दिल्लीची झालेली पराकोटीची स्वच्छता तोंडात बोटे घालायला लावत होती, हे दिल्लीकरांना आजही आठवते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश  ते ३ मार्च २००६ रोजी भारतात आले होते. अमेरिकेचे सध्याचे  राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा याआधी ६ नोव्हेंबर २०१० रोजी भारतभेटीवर आले होते.आता२५ जानेवारी-ते२७ जानेवारी २०१५ ह्या तीन दिवसांच्या भारतभेटीसहराष्ट्राध्यक्षपदाच्याकार्यकाळात भारताला दोनदा भेट देणारे,तसेच भारताच्याप्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ठरले.   (गमतीदार 'योगायोगबघाव्लादिमिर पुतीन यांनीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणूनच्या   कार्यकाळात आतापावेतो  भारताला दोनदा भेट दिली आहे आणि २६ जानेवारी २००७ रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते.)  
ओबामा यांच्या या भेटीनं भारत-अमेरिका यांच्या संबंधात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे,असं आज अगदी सर्वसामान्य माणसालाही वाटतं आहे.ह्यावेळच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर झालेल्या सोहोळ्याच्या  नेत्रदीपक प्रदर्शनानं सर्वसामान्य व्यक्तीलाही आपल्या देशाच्या हर्षोत्फुल्ल करणाऱ्याविविधरंगी सांकृतिक ठेव्याबद्दल अभिमान वाटतो आहे. ह्यावेळच्या परेडमध्ये तिन्ही सेनांमधल्या स्त्रीशक्तीच्या दर्शनामुळे मुली आणि स्त्रियांमध्ये उत्साह दुणावला आहे. आपल्या देशानं  मंगलयान धाडलं आणि आता आपण अनेकविध क्षेत्रांत प्रगती करणार हा विश्वास लोकांमध्ये रुजतो आहे. भारताची अर्थव्यवस्था आणखी सशक्त होणार म्हणून विदेशी गुंतवणूकदारांनीसुद्धा भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्याचंच प्रतिबिंब शेअर बाजाराच्या इंडेक्समध्ये सुद्धा लगोलग बघायला मिळालं.थोडक्यात,येस वुई कॅनही भावना,हम भी कुछ कम नहीं हा दिलासा मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि पुढची वाटचाल करण्यासाठी प्रेरक  ठरावा .
आंतरराष्ट्रीय राजकारण हे वरवर दिसतं तितकं साधसुधं नसतं,चांगलंच गुंतागुंतीचं असतं,(शिवाय त्यात 'तेल'पण खोलवर मुरलेलं असतं,) हे सर्वसामान्य माणूसपण जाणून आहे. तसं नसतं तर अमेरिकेचे 'सेक्रेटरी ऑफ स्टेटजॉन केरी इथे भारतात,   गांधीनगरमध्ये 'व्हायब्रंट गुजरात'परिषदेसाठी येतात आणि नंतर पाकिस्तानमध्येपण जातात,एकीकडे दहशतवादाचा बीमोड करण्याबाबत आग्रह धरणारी अमेरिका दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला अर्थसहाय्यसुद्धा करते,राष्ट्राध्यक्ष  जॉर्ज बुश त्यावेळी भारतभेटीनंतर लगोलग पाकिस्तानला सुद्धा जातात,असं घडलं नसतं.जगात जर सर्वत्र शांती नांदली,तर युद्ध कशी होतील आणि मग युद्धसामग्री ,शस्त्रास्त्र कोण कशाला खरेदी करेलत्यामुळे आधी अस्थिरता,अशांती  निर्माण करून मग तिथे स्थैर्य आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नरत व्हायचं.एका देशाशी हातमिळवणी करतेवेळी इतर दोघांना कोपरानं ढोसायची संधी गमवायची नाही,आपली अर्थव्यवस्था पुढे दामटताना इतर अर्थसत्तांना हादरे द्यायचे,असं चित्र आंतरराष्ट्रीय राजकारणात सर्रास दिसतं . 
ज्या अमेरिकेनं पोखरण मध्ये अणुचाचणी केल्याबद्दल भारतावर तीस वर्षं निर्बंध घातलेभारताच्या आण्विक कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यासाठी इतर देशांना उद्युक्त केलं,तीच अमेरिका भारतासमोर  १-२-३ नावानं ओळखल्या  जाणाऱ्या अणुकराराचा प्रस्ताव ठेवतेत्याबाबत आग्रही पाठपुरावा करते,हे बघितल्यावर  सर्वसामान्य माणूस गोंधळून जावा!,फार कशाला, 'ह्या अणुकरारामुळे नागरी अणुव्यापाराची द्वारं उघडणार आहेत,त्यामुळे अमेरिकेत रोजगाराच्या  संधी निर्माण होतील,अगदी दोन अणुभट्ट्या उभारण्यासाठी जरी अमेरिकी कंपन्यांना कंत्राट मिळाले तरी त्यामुळे अमेरिकेत हजारो रोजगार निर्माण होतील', असं अमेरिकेच्या तत्कालिन 'सेक्रेटरी ऑफ स्टेटकोंडोलिज्जा राईस यांनी 'अवर अपॉर्च्युनिटी विथ इंडिया ' नामक आपल्या वक्तव्यात तेव्हा म्हटलं होतं. इतकी वर्षं रखडलेल्या उभय देशांच्या नागरी अणुकरारामध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी जातीनं लक्ष्य घालून भारताला जाचक वाटणाऱ्या अटींवर तोडगा काढला आणि अणुकराराचा मार्ग मोकळा झाला. आपल्या वाढत्या लोकसंख्येला आणि विस्तारू पाहणाऱ्या उद्योगजगतालाअर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी  भारताला उर्जेची  गरज आहेचआणि ती ऊर्जाही स्वस्त तसेच स्वच्छ (क्लीन एनर्जी )असायला हवी,त्यामुळे उभय देशाच्या नेत्यांनी उचललेल्या ह्या नव्या पावलानं नवी वाट तयार झाली,जी देशाला प्रगतीपथावर नेईल,असं सर्वसामान्य माणसाला वाटतं आहे.शेअर बाजारात शेअरची विक्री घडताना कसं,एक विकणारा आणि दुसरा खरेदी करणारा असावा लागतो,जेव्हा उभयतांमध्ये खरेदी-विक्री होते,तेव्हा दोघांचाही हेतू सफल होतो,तसंच हेसुद्धा आहे.
जेव्हा ओबामा निवडून आले आणि सर्व देशांनी त्यांना अभिनंदानार्थ दूरध्वनी केले,तेव्हा त्यांनी प्रत्युत्तरादाखल धन्यवाद देणारे फोन इतर देशांना केले,पण भारताला केला नाहीम्हणून आपण हळहळलो होतो.नरेंद्र मोदी ह्यांनाही अमेरिकेने आधी सापत्न वागणूक दिलीमात्र  नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी  आल्यावर ओबामांनी अभिनंदानार्थ दूरध्वनी केलाआणि अमेरिकेच्या मनातली भारताबद्दलची  तेढ मावळत असल्याचे संकेत दिले.अमेरिकेत महत्वाच्या पदांवर भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या नियुक्त्या होताहेत हा काही निव्वळ योगायोग नाही! अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये व्यापारासह चांगले संबंध दृढ व्हावेत,ह्या हेतूनी उचललेली ती पावले आहेत.आज अमेरिकेत लाखो भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत (त्यातले दोन माझी लेक आणि जावई पण आहेत.)खूप मोठ्या संख्येत भारतीय तिथे कार्यरत आहेत,  अमेरिकेच्या यशात भारतीयांच्या बुद्धिमत्तेचा मोठा वाटा आहे.अमेरिकेत माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तेलगू भाषिक आणि हॉटेल -मॉटेल क्षेत्रात पटेल हे समीकरण आहे. साहजिकच मोदी जेव्हा अमेरिकेत गेले,तेव्हा त्यांची लोकप्रियता किती आहे,ह्याचं प्रत्यंतर अमेरिकेला मॅडिसन स्क्वेअर हॉल मध्ये आलं. नरेंद्र मोदी भारतात आणि अमेरिकेत लोकप्रिय आहेत तसे बराक ओबामा अमेरिकेत  आणि  भारतात लोकप्रिय आहेत. ह्याचं कारण हे दोन्ही नेते अतिशय सामान्य परिस्थितीतून ह्या पदावर पोहोचलेले आहेत आणि त्या पदाची'हवा डोक्यात जाऊ नं देता,पाय जमिनीवर ठेवून तळमळीनं कार्य करणारे आहेत.मोदी-ओबामा हे दोघेही उत्कृष्ट वक्ते आहेत,त्यांची कृत्रिमतेचा  लवलेश नसलेली  भाषणं लोकांच्या हृदयाला भिडतात.ओबामांचा कुटुंबवत्सलपणा  अमेरिकेच्या लोकांना भावतो.अमेरिकेतले सर्व वर्णाचे लोक ओबामांवर तितकेच प्रेम करतात.मात्र आर्थिकदृष्ट्यासामान्य असलेल्या अमेरिकेतल्या लोकांना ओबामा ह्यांनी "ओबामाकेअर"च्या रूपानं नवसंजीवनी दिली आहे. लेखासाठी माझ्या अमेरिकी मैत्रिणीशी त्या ओबामाकेअरबद्दल मी संवाद साधला.तिचा स्वत:चा पुस्तके   डिझाईन करण्याचा,पुस्तकनिर्मितीचा व्यवसाय आहे.हे विनापत्य  अमेरिकी दाम्पत्य व्हर्जिनियात इस्कॉनशी संबंधित आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियामध्ये दोघे भगवद्गीता तसंच भक्तियोग  शिकवतात,ते विशुद्ध शाकाहारी आहेत आणि सनातन धर्माचे आचरण करतात.त्यांच्याकडे येणारे,कृष्णवर्णीयांसह सर्व वर्णाचे त्यांचे कृष्ण-भक्त शिष्य जणू त्यांची मुलेबाळेच आहेत.त्यांनी आपली नावेदेखील भारतीय ठेवून घेतली आहेत. एवढ्यात मायाप्रिया लॉंंग माझ्या ह्या अमेरिकी मैत्रिणीचे,तिच्या 'लेक-लेकी'सह आठवडाभर माझ्याकडे वास्तव्य होते,त्यावेळी तिनं  ओबामाकेअरबद्दल सांगितलं होतं.
"अमेरिकेत बहुतेक सर्व अमेरिकी नागरिकांना,ते जिथे नोकरी करतात,   त्या त्यांच्या मालकांकडून,कंपन्यांकडून नि:शुल्क अथवा नाममात्र शुल्क आकारून  हेल्थ इन्श्युरन्स अथवा आरोग्यविमा दिला जातो.मात्र आम्ही पती-पत्नी सेल्फ-एम्प्लोयिड,  स्वरोजगार मिळवणारे असल्यामुळे आम्हाला आमचा  आरोग्यविमा विकत घ्यावा लागतो. पण अमेरिकेत आरोग्यविमा खूपच महाग असल्यामुळे आमच्यासारख्या सामान्य आर्थिक उत्पन्न असलेल्यांना खूपच कठीण जात होतं. दर वर्षाला दहा हजार डॉलर्स खर्चआम्हाला दर महिन्याला दरडोई सहाशे डॉलर्स  ही आरोग्यविम्याची रक्कम भरावी लागे.आमचा दर वर्षाचा औषध-पाण्याचा खर्च दहा हजार डॉलर्स कधी नव्हताच,आम्हाला विनाकारण हा भुर्दंड सोसावा लागत होता,त्यातून काही हशील पण होत नव्हतं,त्यामुळे खूप ओढाताण पण व्हायची.पण ओबामाकेअर अस्तित्वात आल्यानंतर आम्हाला आता  आरोग्यविम्यासाठी दर महिन्याला केवळ ८६ डॉलर्स एवढीच रक्कम भरावी लागते ज्यात डॉक्टरच्या व्हिजिट्स,औषधांच्या किमतींवर भरपूर सूट इत्यादी समाविष्ट आहे.आमच्यासारख्या अन्य सर्वांनाचज्यांना  आरोग्यविम्याचा मासिक हफ्ता म्हणजे प्रचंड आर्थिक बोजा वाटत असेओबामाकेअरमुळे खूप दिलासा मिळाला आहे."चौसष्ट वर्षीय मायाप्रिया लॉंंंग सांगते.
आत्ता अमेरिकेतसुद्धा ओबामांची भारतभेट अमेरिकी लोकांच्या औत्सुक्याचा आणि जिव्हाळ्याचा विषय ठरली आहे.ह्या भेटीनं  भारत -अमेरिकेच्या लोकांमध्ये  आणखी अच्छे दिन येण्याची आस निर्माण झाली आहे.    

मायाप्रिया लॉंंंग