Tuesday, February 3, 2015

U.S.President Obama's visit to India:"Yes,We Can!"

येस वुई कॅन!
-रश्मी घटवाई 
तो आला,त्यानं पाहिलं,तो बोलला आणि त्यानं जिंकलं!अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतभेटीला येणारयेणार म्हणून गेले काही दिवसांपासून देशवासियांची उत्सुकता ताणली गेली होती.त्यांच्या देशाच्या,पर्यायानं  विश्वातल्या सर्वोच्च अशा त्यापदाच्या इभ्रतीला आणि इतमामाला साजेशा पद्धतीनं सुरक्षेचं अभेद्य कवच दिल्लीच्याच नव्हेतर आपल्या सबंध देशाच्या भू-जल-आकाशाला गवसणी घालून प्राणपणानं सज्ज झालं होतं.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतभेटीला येण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हतीयाआधीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतभेटीवर आलेले होते. १९५९ सालीं भारतभेटीवर आलेले आयसेनहॉवर(Dwight D. Eisenhower)हे भारताला भेट देणारे सर्वात पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्यानंतर रिचर्ड निक्सन यांनी,कुठल्याही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी स्वतंत्र भारताला दिलेली अगदी सर्वात कमी अवधीचीअशी एकदिवसीयभेट १९६९ मध्ये भारताला दिली होती. त्यांच्यानंतर जानेवारी १९७८ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर,मार्च २००० मध्ये  राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारताला भेट दिली होती.बिल क्लिंटन यांच्या भेटीच्या वेळी दिल्लीची झालेली पराकोटीची स्वच्छता तोंडात बोटे घालायला लावत होती, हे दिल्लीकरांना आजही आठवते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश  ते ३ मार्च २००६ रोजी भारतात आले होते. अमेरिकेचे सध्याचे  राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा याआधी ६ नोव्हेंबर २०१० रोजी भारतभेटीवर आले होते.आता२५ जानेवारी-ते२७ जानेवारी २०१५ ह्या तीन दिवसांच्या भारतभेटीसहराष्ट्राध्यक्षपदाच्याकार्यकाळात भारताला दोनदा भेट देणारे,तसेच भारताच्याप्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ठरले.   (गमतीदार 'योगायोगबघाव्लादिमिर पुतीन यांनीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणूनच्या   कार्यकाळात आतापावेतो  भारताला दोनदा भेट दिली आहे आणि २६ जानेवारी २००७ रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते.)  
ओबामा यांच्या या भेटीनं भारत-अमेरिका यांच्या संबंधात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे,असं आज अगदी सर्वसामान्य माणसालाही वाटतं आहे.ह्यावेळच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर झालेल्या सोहोळ्याच्या  नेत्रदीपक प्रदर्शनानं सर्वसामान्य व्यक्तीलाही आपल्या देशाच्या हर्षोत्फुल्ल करणाऱ्याविविधरंगी सांकृतिक ठेव्याबद्दल अभिमान वाटतो आहे. ह्यावेळच्या परेडमध्ये तिन्ही सेनांमधल्या स्त्रीशक्तीच्या दर्शनामुळे मुली आणि स्त्रियांमध्ये उत्साह दुणावला आहे. आपल्या देशानं  मंगलयान धाडलं आणि आता आपण अनेकविध क्षेत्रांत प्रगती करणार हा विश्वास लोकांमध्ये रुजतो आहे. भारताची अर्थव्यवस्था आणखी सशक्त होणार म्हणून विदेशी गुंतवणूकदारांनीसुद्धा भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्याचंच प्रतिबिंब शेअर बाजाराच्या इंडेक्समध्ये सुद्धा लगोलग बघायला मिळालं.थोडक्यात,येस वुई कॅनही भावना,हम भी कुछ कम नहीं हा दिलासा मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि पुढची वाटचाल करण्यासाठी प्रेरक  ठरावा .
आंतरराष्ट्रीय राजकारण हे वरवर दिसतं तितकं साधसुधं नसतं,चांगलंच गुंतागुंतीचं असतं,(शिवाय त्यात 'तेल'पण खोलवर मुरलेलं असतं,) हे सर्वसामान्य माणूसपण जाणून आहे. तसं नसतं तर अमेरिकेचे 'सेक्रेटरी ऑफ स्टेटजॉन केरी इथे भारतात,   गांधीनगरमध्ये 'व्हायब्रंट गुजरात'परिषदेसाठी येतात आणि नंतर पाकिस्तानमध्येपण जातात,एकीकडे दहशतवादाचा बीमोड करण्याबाबत आग्रह धरणारी अमेरिका दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला अर्थसहाय्यसुद्धा करते,राष्ट्राध्यक्ष  जॉर्ज बुश त्यावेळी भारतभेटीनंतर लगोलग पाकिस्तानला सुद्धा जातात,असं घडलं नसतं.जगात जर सर्वत्र शांती नांदली,तर युद्ध कशी होतील आणि मग युद्धसामग्री ,शस्त्रास्त्र कोण कशाला खरेदी करेलत्यामुळे आधी अस्थिरता,अशांती  निर्माण करून मग तिथे स्थैर्य आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नरत व्हायचं.एका देशाशी हातमिळवणी करतेवेळी इतर दोघांना कोपरानं ढोसायची संधी गमवायची नाही,आपली अर्थव्यवस्था पुढे दामटताना इतर अर्थसत्तांना हादरे द्यायचे,असं चित्र आंतरराष्ट्रीय राजकारणात सर्रास दिसतं . 
ज्या अमेरिकेनं पोखरण मध्ये अणुचाचणी केल्याबद्दल भारतावर तीस वर्षं निर्बंध घातलेभारताच्या आण्विक कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यासाठी इतर देशांना उद्युक्त केलं,तीच अमेरिका भारतासमोर  १-२-३ नावानं ओळखल्या  जाणाऱ्या अणुकराराचा प्रस्ताव ठेवतेत्याबाबत आग्रही पाठपुरावा करते,हे बघितल्यावर  सर्वसामान्य माणूस गोंधळून जावा!,फार कशाला, 'ह्या अणुकरारामुळे नागरी अणुव्यापाराची द्वारं उघडणार आहेत,त्यामुळे अमेरिकेत रोजगाराच्या  संधी निर्माण होतील,अगदी दोन अणुभट्ट्या उभारण्यासाठी जरी अमेरिकी कंपन्यांना कंत्राट मिळाले तरी त्यामुळे अमेरिकेत हजारो रोजगार निर्माण होतील', असं अमेरिकेच्या तत्कालिन 'सेक्रेटरी ऑफ स्टेटकोंडोलिज्जा राईस यांनी 'अवर अपॉर्च्युनिटी विथ इंडिया ' नामक आपल्या वक्तव्यात तेव्हा म्हटलं होतं. इतकी वर्षं रखडलेल्या उभय देशांच्या नागरी अणुकरारामध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी जातीनं लक्ष्य घालून भारताला जाचक वाटणाऱ्या अटींवर तोडगा काढला आणि अणुकराराचा मार्ग मोकळा झाला. आपल्या वाढत्या लोकसंख्येला आणि विस्तारू पाहणाऱ्या उद्योगजगतालाअर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी  भारताला उर्जेची  गरज आहेचआणि ती ऊर्जाही स्वस्त तसेच स्वच्छ (क्लीन एनर्जी )असायला हवी,त्यामुळे उभय देशाच्या नेत्यांनी उचललेल्या ह्या नव्या पावलानं नवी वाट तयार झाली,जी देशाला प्रगतीपथावर नेईल,असं सर्वसामान्य माणसाला वाटतं आहे.शेअर बाजारात शेअरची विक्री घडताना कसं,एक विकणारा आणि दुसरा खरेदी करणारा असावा लागतो,जेव्हा उभयतांमध्ये खरेदी-विक्री होते,तेव्हा दोघांचाही हेतू सफल होतो,तसंच हेसुद्धा आहे.
जेव्हा ओबामा निवडून आले आणि सर्व देशांनी त्यांना अभिनंदानार्थ दूरध्वनी केले,तेव्हा त्यांनी प्रत्युत्तरादाखल धन्यवाद देणारे फोन इतर देशांना केले,पण भारताला केला नाहीम्हणून आपण हळहळलो होतो.नरेंद्र मोदी ह्यांनाही अमेरिकेने आधी सापत्न वागणूक दिलीमात्र  नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी  आल्यावर ओबामांनी अभिनंदानार्थ दूरध्वनी केलाआणि अमेरिकेच्या मनातली भारताबद्दलची  तेढ मावळत असल्याचे संकेत दिले.अमेरिकेत महत्वाच्या पदांवर भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या नियुक्त्या होताहेत हा काही निव्वळ योगायोग नाही! अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये व्यापारासह चांगले संबंध दृढ व्हावेत,ह्या हेतूनी उचललेली ती पावले आहेत.आज अमेरिकेत लाखो भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत (त्यातले दोन माझी लेक आणि जावई पण आहेत.)खूप मोठ्या संख्येत भारतीय तिथे कार्यरत आहेत,  अमेरिकेच्या यशात भारतीयांच्या बुद्धिमत्तेचा मोठा वाटा आहे.अमेरिकेत माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तेलगू भाषिक आणि हॉटेल -मॉटेल क्षेत्रात पटेल हे समीकरण आहे. साहजिकच मोदी जेव्हा अमेरिकेत गेले,तेव्हा त्यांची लोकप्रियता किती आहे,ह्याचं प्रत्यंतर अमेरिकेला मॅडिसन स्क्वेअर हॉल मध्ये आलं. नरेंद्र मोदी भारतात आणि अमेरिकेत लोकप्रिय आहेत तसे बराक ओबामा अमेरिकेत  आणि  भारतात लोकप्रिय आहेत. ह्याचं कारण हे दोन्ही नेते अतिशय सामान्य परिस्थितीतून ह्या पदावर पोहोचलेले आहेत आणि त्या पदाची'हवा डोक्यात जाऊ नं देता,पाय जमिनीवर ठेवून तळमळीनं कार्य करणारे आहेत.मोदी-ओबामा हे दोघेही उत्कृष्ट वक्ते आहेत,त्यांची कृत्रिमतेचा  लवलेश नसलेली  भाषणं लोकांच्या हृदयाला भिडतात.ओबामांचा कुटुंबवत्सलपणा  अमेरिकेच्या लोकांना भावतो.अमेरिकेतले सर्व वर्णाचे लोक ओबामांवर तितकेच प्रेम करतात.मात्र आर्थिकदृष्ट्यासामान्य असलेल्या अमेरिकेतल्या लोकांना ओबामा ह्यांनी "ओबामाकेअर"च्या रूपानं नवसंजीवनी दिली आहे. लेखासाठी माझ्या अमेरिकी मैत्रिणीशी त्या ओबामाकेअरबद्दल मी संवाद साधला.तिचा स्वत:चा पुस्तके   डिझाईन करण्याचा,पुस्तकनिर्मितीचा व्यवसाय आहे.हे विनापत्य  अमेरिकी दाम्पत्य व्हर्जिनियात इस्कॉनशी संबंधित आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियामध्ये दोघे भगवद्गीता तसंच भक्तियोग  शिकवतात,ते विशुद्ध शाकाहारी आहेत आणि सनातन धर्माचे आचरण करतात.त्यांच्याकडे येणारे,कृष्णवर्णीयांसह सर्व वर्णाचे त्यांचे कृष्ण-भक्त शिष्य जणू त्यांची मुलेबाळेच आहेत.त्यांनी आपली नावेदेखील भारतीय ठेवून घेतली आहेत. एवढ्यात मायाप्रिया लॉंंग माझ्या ह्या अमेरिकी मैत्रिणीचे,तिच्या 'लेक-लेकी'सह आठवडाभर माझ्याकडे वास्तव्य होते,त्यावेळी तिनं  ओबामाकेअरबद्दल सांगितलं होतं.
"अमेरिकेत बहुतेक सर्व अमेरिकी नागरिकांना,ते जिथे नोकरी करतात,   त्या त्यांच्या मालकांकडून,कंपन्यांकडून नि:शुल्क अथवा नाममात्र शुल्क आकारून  हेल्थ इन्श्युरन्स अथवा आरोग्यविमा दिला जातो.मात्र आम्ही पती-पत्नी सेल्फ-एम्प्लोयिड,  स्वरोजगार मिळवणारे असल्यामुळे आम्हाला आमचा  आरोग्यविमा विकत घ्यावा लागतो. पण अमेरिकेत आरोग्यविमा खूपच महाग असल्यामुळे आमच्यासारख्या सामान्य आर्थिक उत्पन्न असलेल्यांना खूपच कठीण जात होतं. दर वर्षाला दहा हजार डॉलर्स खर्चआम्हाला दर महिन्याला दरडोई सहाशे डॉलर्स  ही आरोग्यविम्याची रक्कम भरावी लागे.आमचा दर वर्षाचा औषध-पाण्याचा खर्च दहा हजार डॉलर्स कधी नव्हताच,आम्हाला विनाकारण हा भुर्दंड सोसावा लागत होता,त्यातून काही हशील पण होत नव्हतं,त्यामुळे खूप ओढाताण पण व्हायची.पण ओबामाकेअर अस्तित्वात आल्यानंतर आम्हाला आता  आरोग्यविम्यासाठी दर महिन्याला केवळ ८६ डॉलर्स एवढीच रक्कम भरावी लागते ज्यात डॉक्टरच्या व्हिजिट्स,औषधांच्या किमतींवर भरपूर सूट इत्यादी समाविष्ट आहे.आमच्यासारख्या अन्य सर्वांनाचज्यांना  आरोग्यविम्याचा मासिक हफ्ता म्हणजे प्रचंड आर्थिक बोजा वाटत असेओबामाकेअरमुळे खूप दिलासा मिळाला आहे."चौसष्ट वर्षीय मायाप्रिया लॉंंंग सांगते.
आत्ता अमेरिकेतसुद्धा ओबामांची भारतभेट अमेरिकी लोकांच्या औत्सुक्याचा आणि जिव्हाळ्याचा विषय ठरली आहे.ह्या भेटीनं  भारत -अमेरिकेच्या लोकांमध्ये  आणखी अच्छे दिन येण्याची आस निर्माण झाली आहे.    

मायाप्रिया लॉंंंग 

No comments: