Thursday, May 15, 2014

देश श्रीमंत अथवा गरीब का होतात… 
-रश्मी घटवाई 

जगातले काही देश अतिश्रीमंत आहेत,तर काही अति गरीब आहेत. ही दरी का,ह्याची व्यापक कारण मीमांसा "Why Nations Fail .The Origins of Power,Prosperity and Poverty" ह्या पुस्तकात Daron Acemoglu आणि James A. Robinson ह्या लेखक द्वयीनं केली आहे.  देश श्रीमंत-गरीब का होतात,हे लेखक द्वयीनं अनेक उदाहरणे आणि देशांचा इतिहास,भूगोल आणि राजकीय परिस्थिती यांचे सखोल विश्लेषण करून आपली स्वतंत्र संकल्पना मांडली आहे. 

जगातले काही देश अतिश्रीमंत आहेत,तर काही अति गरीब आहेत.देशांमध्ये ही प्रचंड आर्थिक विषमता का,ह्याची व्यापक कारणमीमांसा "Why Nations Fail .The Origins of Power, Prosperity and Poverty" ह्या पुस्तकात Daron Acemoglu आणि James A. Robinson ह्या लेखक द्वयीनं केली आहे.देश श्रीमंत-गरीब का होतात,याबाबत अर्थशास्त्रातल्या आधी मांडल्या गेलेल्या आणि स्वीकृत असलेल्या अनेक संकल्पना -थिअरीज ह्या संपूर्णपणे का खऱ्या ठरत नाहीत,हे लेखक द्वयीनं अनेक उदाहरणे देऊन आणि देशांचा इतिहास,भूगोल आणि राजकीय परिस्थिती यांचे सखोल विश्लेषण करून सांगून आपली स्वतंत्र संकल्पना मांडली आहे.  "While economic institutions are critical for determining whether a country is poor or prosperous,it is politics and political institutions that determine what economic institutions a country has...Our theory for world inequality shows how political and economic institutions interact in causing poverty or prosperity." असं पुस्तकात लेखकद्वयीनं म्हटलं आहे.त्यांच्या मते देश प्रगतीपथावर जाईल की गरीब होईल हे त्या देशातल्या पॉलिटीकल इंस्टीटयूशन्स  आणि इकॉनॉमिक इंस्टीटयूशन्स यांच्या कार्याच्या संयुक्त प्रभावावर अवलंबून असते.त्यांनी मांडलेले बहुसंख्य मुद्दे अर्थात आपल्या देशाबाबतसुद्धा खरे आहेत.प्रस्तुत पुस्तकात लेखकद्वयीनं उत्तर आणि दक्षिण कोरिआ यांची तुलना करीत उत्तर कोरिआमध्ये युवकांना शिक्षण,आर्थिक उन्नती वगैरेसाठी कुठलंच प्रेरणादायी चित्र नाही आणि दक्षिण कोरिआत तरुणाईला शिक्षण,आर्थिक उन्नती साधण्यासाठी केवढे पोषक वातावरण आहे,हे विस्तृतपणे सांगितले आहे. तीच गोष्ट मेक्सिको आणि अमेरिकेची्. " It should therefore be no surprise that it was U.S.society,not Mexico or Peru,that produced Thomas Edison,and  that it was South Korea,not North Korea,that today produces technologically innovative companies such as Samsung and Hyundai. " Daron Acemoglu आणि James A. Robinson ह्या लेखकद्वयीनं लिहिलेल्या ह्या वाक्यावर तर आपल्याकडे खूप चिंतन-मनन घडावं. 

जगातल्या अनेक देशांत आज जनमानसात प्रचंड प्रक्षोभ उसळलेला दिसतो आहे.तरुणाईच्या मनात असंतोषाचा उद्रेक होताना दिसतो आहे. सर्वत्र अशांती,असंतोष यांचा हा तप्त ज्वालारस खदखदत असताना कुठल्याही देशाचे आरोग्य कसे असेल ह्याचा आपल्याला सहज अंदाज बांधता येतो.हे असे का,याचं मार्मिक विश्लेषण लेखकांनी एका समर्पक वाक्यात केलंय -"The roots of discontent in these countries lie in their poverty."
तहरीर चौकात निदर्शने करणाऱ्या तरुणाईनं सरकारचा भ्रष्टाचार,दर्जेदार शिक्षणाची वानवा आणि योग्य संधीचा अभाव यांच्या विरोधात आवाज उठवला होता,अजूनही तो आवाज घुमतो आहे.       

शिक्षण हा एक महत्वाचा घटक प्रस्तुत पुस्तकात चर्चिला गेला आहे."The low education level of poor countries is caused by economic institutions that fail to create incentives for parents to educate their children....the price these nations pay for low education is high." प्रस्तुत लेखकद्वयीनं लिहिलंय.ह्यावर आपल्याला गंभीरपणे विचार करायला हवा. आपल्याकडे नंदन निलेकणी ह्यांनीही शिक्षण ह्या मुद्द्यावर "Imagining India"  (इमॅजिनिंग इंडिया)ह्या पुस्तकात खूप विस्तृत चर्चा केली आहे:भारतात जगात द्वितीय स्थानावरच्या संख्येत आपल्याकडे दरवर्षी इन्जीनीअर्स तयार होतात,तसंच दरवर्षी शाळा सोडून  जाणारी मुले सर्वाधिक संख्येत आहेत,दिल्लीतल्या रामकृष्णपुरम ह्या उच्चभ्रु वस्तीत देशातली सर्वोत्तम अशी शाळा आहे,तिथल्याच झोपडपट्टीतल्या लोकांना जेमतेम दाटीवाटीने बसता येईल,इतपत,एका खोलीच्या सरकारी शाळेवर समाधान मानावे लागते.रस्त्याअलीकडच्या त्या उच्चभ्रू शाळेत फळा वेगळ्या कारणाने वापरला जात नाहीत्याऐवजी कॉम्प्युटर्स,व्हाईट बोर्डस्मार्ट बोर्ड तिथे वापरले जातात. रस्त्यापलीकडच्या गरीब शाळेत वेगळ्या कारणाने फळा वापरला जात नाही,असा विरोधाभास पाहायला मिळतो.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या वर्षांत Defence expenditure -संरक्षणावरच्या खर्चासाठी बजेट मध्ये शिक्षणासाठीच्या खर्चापेक्षा अधिक तरतूद होती.आपले  शिक्षणविषयक धोरण असायला हवे,तसे नाही,ह्याचं भान आपल्याला रस्त्यावर चौकांत पुस्तके विकणारी मुलंआई-वडिलांना मोलमजुरीच्या कामात मदत करताना दिसणारी मुलं दिसली,की येतं!आपल्या सरकारी शाळा शिक्षणाची नी शिकू इच्छिणाऱ्यांची मागणी पुरवण्यास सपशेल पराभूत झाल्या." ते पुढे लिहितात,"दरवर्षी २० लाख इंग्रजी बोलू शकणारे पदवीधर,१५ हजार कायद्याचे पदवीधर,९ हजार PhD मिळवलेले विद्यार्थी इथे निर्माण होतात,सध्या  करोड  १० लाख  ्जीनिअर्स   असून दरवर्षी त्यात ३० हजार  इन्जीनिअर्सची भर पडते आहे."
मात्र "८३ % इन्जीनिअरिंग ग्रॅज्युएट अनफिट फॉर एमप्लोंयमेन्ट,""वीसपैकी एकोणीस इन्जीनिअरिंग ग्रॅज्युएट नोकरीसाठी अयोग्य असल्याचेही एका सर्वेक्षणात आढळून आले होते,याचा विसर पडू देत कामा नये.बरं,इतक्या मोठ्या संख्येनं इन्जीनिअर्स तयार होऊनही त्या प्रमाणात इंडस्ट्री उभी राहतेय असं चित्र तर काही दिसत नाही.प्रशिक्षित कुशल कामगार हवे असतील तर तसं शिक्षणही दिलं गेलं पाहिजे.निलकेणी यांनी लिहिलंय,"भारताचा  कुशल कामगारवर्ग आताच जगातल्या  सर्वाधिक  दुसऱ्या क्रमांकाच्या संख्येत येतो. २०२० मध्ये भारतात जवळजवळ सबंध जगाला पुरेल एवढा वर्कफोर्स-कामगार असतील." हा अर्थातच निलेकणी ह्यांच्या योग्यतेच्या व्यक्तीचा भाबडा आशावाद असणार नाही.मात्र त्यादृष्टीनी आपण पावले टाकतो आहोत का,हा कळीचा मुद्दा आहे.
देश सपशेल अपयशी ठरण्यामागे असते तिथली शोषणकर्ती व्यवस्था,कारण शासन -यंत्रणा,अनिर्बंध सत्ता आणि संपत्ती शोषक राज्यकर्त्यांच्या हाती  एकवटलेली असते. "Countries become failed states not because of their geography or their culture,but because the legacy of extractive institutions,which concentrate power and wealth in the hands of those controlling the state,opening the way for  unrest ,strife and civil war." "Why Nations Fail .The Origins of Power,Prosperity and Poverty" ह्या पुस्तकात लेखकद्वयीनं जागोजागी अधोरेखित करून लिहिलंय,ते आपल्या बाबतीत शब्दन शब्द खरे आहे. मात्र त्यांच्याच मते, चांगले शासनकर्ते निवडून देण्याचा अधिकार सर्वसामान्यांना असणे ही एक फार मोठी सशक्त व्यवस्था आपल्या देशाच्या घटनेने आपल्याला दिलेली असल्यामुळे निदान आपण जागरूक नागरिकांनी तरी आपला देश गरिबीच्या खाईत लोटला जाणार नाही,तो प्रगतीपथावर राहील ह्याची काळजी घ्यायला हवी. 

This article of mine was published in Tarun Bharat asamant supplement on  19th July 2013.

No comments: