Sunday, June 1, 2014

लहान रेघ मोठी रेघ

लहान रेघ मोठी रेघ
-रश्मी घटवाई 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंनी संसदेत (तेव्हाची Constituent Assembly )त्यांचं सुप्रसिद्ध "नियतीशी करार "भाषण केलं, तेव्हा त्यांना कल्पना सुद्धा नसेल की जे ते त्या वेळी बोलले,ते अक्षर न अक्षर पुढे १६ व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या बाबतीत खरं ठरेल,म्हणून! नेहरूंनी त्या  भाषणात म्हटलं होतं,"At the stroke of the midnight hour,when the world sleeps,India will awake to life and freedom.This was a moment which comes but rarely in history when we step out from the old to the new,when an age ends,and when the soul of a nation, long suppressed, finds utterance."
सबंध दशकभरात त्यांच्याच कुटुंबपरंपरेतल्या सत्तासुरानी ह्या देशाच्या आत्म्याला जणू आवळून, जखडून ठेवलं होतं,ह्या देशाची अस्मिता आपल्या सत्ताधुंद पावलांखाली चिरडून टाकली होती. नेहरूंनी सांगितल्याबरहुकुम देशानं ती जुलूमशाही झुगारून दिली आणि सत्तापरिवर्तनाची हाक देत जुलुमी काचातून मोकळ्या झालेल्या राष्ट्रानं  पुन्हा एकदा स्वातंत्र्य अनुभवलं.'जुने जाऊ द्या मरणालागुनि,जाळून किंवा पुरुनि टाका,'म्हणत देशानं त्यांच्याच काँग्रेस पक्षाला दूर भिरकावून दिलं आणि भारतीय जनता पार्टीच्या पदरात भरभरून मतं-दान दिलं. 

सार्वत्रिक निवडणुकांची चाहूल लागली,भाजपानं पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी ह्यांचं नाव घोषित केलं,तेव्हा विरोधक त्यांच्यावर अक्षरश: लांडग्यांनी भक्ष्यावर तुटून पडावं,तसे तुटून पडले, सर्वांगाचे लचके तोडायचा प्रयत्न करू लागले.निवडणुकीच्या निकालानं मात्र विरोधकांचंच अस्तित्व मिटवून टाकलं.एवढंच नव्हे,तर कोणे एके काळी भारत हा देश ज्या लोकांच्या खिजगणतीतही नव्हता, ते देशच काय,पण अवघ्या जगाचं लक्ष भारताकडे लागून राहिलं. किंबहुना महासत्ता बनण्याच्या दिशेनं भारतानं टाकलेलं पाऊल असल्याचा प्रत्यय ह्या निवडणुकीच्या निकालानं जगाला दिला .   


रुडयार्ड किपलिंग ह्या भारतात ब्रिटीश सत्ता असतानाच्या काळात मुंबईत जन्मलेल्या ब्रिटीश लेखक-कवीची "इफ" ही अतिशय प्रसिद्ध कविता आहे. ती त्यानं १९०९ साली आपल्या मुलाला उद्देशून लिहिली होती,तरी ती आज एकशे पाच वर्षांनंतरही तितकीच प्रेरणादायी आहे. ती जणू काही त्यानं नरेंद्र मोदी ह्यांनाही उद्देशून लिहिली असावी किंवा नरेंद्र मोदींनीच ती कविता पुरती आचरणात आणली,असंही म्हणता येईल.इफ मध्ये मला भगवद्गीता दिसते. नरेंद्र मोदींपुढे पण भगवद्गीतेचा आदर्श आहेच,म्हणून असेल कदाचित!(भगवद्गीतेतल्यासारखा)कवितेतला उपदेश असल्यामुळे "यू विल बी अ गॉड ,माय मॅन" असं थट्टेनं विन्स्टन चर्चिल रुडयार्ड किपलिंगला म्हणाले होते.If you can meet with Triumph and Disaster And treat those two impostors just the same ह्या कवितेतल्या ओळी विम्बल्डन मध्ये टेनिस कोर्टवर पण लागलेल्या आहेत. इफ ह्या कवितेच्या प्रेमात पडावं!कविता अशी- 

If—

If you can keep your head when all about you   
    Are losing theirs and blaming it on you,   
If you can trust yourself when all men doubt you,
    But make allowance for their doubting too;   
If you can wait and not be tired by waiting,
    Or being lied about, don’t deal in lies,
Or being hated, don’t give way to hating,
    And yet don’t look too good, nor talk too wise:

If you can dream—and not make dreams your master;   
    If you can think—and not make thoughts your aim;   
If you can meet with Triumph and Disaster
    And treat those two impostors just the same;   
If you can bear to hear the truth you’ve spoken
    Twisted by knaves to make a trap for fools,
Or watch the things you gave your life to, broken,
    And stoop and build ’em up with worn-out tools:

If you can make one heap of all your winnings
    And risk it on one turn of pitch-and-toss,
And lose, and start again at your beginnings
    And never breathe a word about your loss;
If you can force your heart and nerve and sinew
    To serve your turn long after they are gone,   
And so hold on when there is nothing in you
    Except the Will which says to them: ‘Hold on!’

If you can talk with crowds and keep your virtue,   
    Or walk with Kings—nor lose the common touch,
If neither foes nor loving friends can hurt you,
    If all men count with you, but none too much;
If you can fill the unforgiving minute
    With sixty seconds’ worth of distance run,   
Yours is the Earth and everything that’s in it,   
    And—which is more—you’ll be a Man, my son!
(Source: A Choice of Kipling's Verse (1943))    

हाच रुडयार्ड किपलिंग,सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ...जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ...असं कवितेतून  म्हणाला असला तरी भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल आणि भारतात स्वत:चं सरकार असण्याच्या शक्यतेबाबत त्याचा नकारार्थी दृष्टीकोन होता. भारत हा कधीच स्वतंत्र देश असू अशक्णार नाही ह्या मताचा तो पुरस्कर्ता होता. नोव्हेंबर १८९१ मध्ये त्याला एका पत्रकारानं भारतात स्वत:चं सरकार असण्याच्या शक्यतेबाबत विचारणा केली,तेव्हा त्याचं उत्तर होतं , " They are 4000 years old out there,much too old to learn that business.Law and order is what they want and we are there to give it to them straight." (संदर्भ :इंडिया आफ्टर गांधी -लेखक रामचंद्र गुहा) रुडयार्ड किपलिंगला देवपद देऊ करणाऱ्या विन्स्टन चर्चिल प्रभृतींची मतं याच पठडीतली होती. भारताचं स्वातंत्र्य वगैरे तर लांब,भारत हा मुळी कधी देश म्हणून असा नव्हताच आणि भविष्यातही असणार नाही,असे मानणारे अनेक होते,त्यातले एक म्हणजे सर जॉन स्ट्राची(Sir Johnn Strachey).  केम्ब्रिजमध्ये १८८८ मध्ये केलेल्या भाषणात त्यांनी म्हटलं ,"The differences between the countries of Europe are much smaller than those between the countries of India. Scotland is more like Spain than Bengal is like Punjab.The first and most essential thing to learn about India-that there is not and never was an India,or even any country of India possessing any sort of unity,physical,political,social or religious."संदर्भ :इंडिया आफ्टर गांधी -लेखक रामचंद्र गुहा) 

थोडक्यात,भारत हा अनेकांच्या खिजगणतीत नव्हता,अनेकांच्या लेखी अस्तित्वात नव्हता.मात्र अनेकांच्या हौतात्म्यानंतर जेव्हा तो अस्तित्वात आला,तेव्हा भुकेकंगालांचा देश,सापनागांचा, गारुड्यांचा,वाघांचा,हत्तींचा देश असली आपल्या देशाची ओळख पाश्चात्यांच्या मनात निर्माण झाली होती.मोठ्या देशांची वागणूकही आपल्या देशाप्रती उपेक्षेची होती.आपल्या देशातली सत्तेवर विराजमान झालेली नेतेमंडळी जगात देशाची प्रतिमा उंचावण्याऐवजी स्वत:ची प्रतिमा उंचावण्यात निमग्न झालेली होती.त्यांचे कपडे परदेशातून धुवून येत असतील भले,पण ते स्वत: स्वत:ला महान देशभक्त म्हणवून घेत होते आणि पोटातलं पाणीही हलू नं देउनसुद्धा आपली तशी आभासी प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वीही होत होते.वंशपरंपरेनं मिळालेली सत्ता उपभोगत त्यांच्यानंतरच्या सत्ताधीशांनीही वेगळं काहीच केलं नाही,आधीचा अध्याय केवळ मागच्या पानावरून पुढे सरकवला एवढंच. देशाला उत्तुंग पातळीवर नेऊन ठेवण्याची ह्या नेत्यांना दूरदृष्टी असती तर जे प्रश्न त्यांनी हेतुत: चिघळत ठेवून कठीण करून ठेवले,ते मुळात उद्भवले नसते आणि उद्भवले असते तरी त्याच्यावर वेळीच उपाययोजना केली असती.एक जुनी गोष्ट आठवते. तुपाचा डबा उघडताना एका श्रीमंत माणसाचं बोट कापलं आणि जखम होऊन त्यात तूप शिरलं.वेदना असह्य झाल्यावर त्यानं वैद्याला पाचारण केलं.वैद्यानं जखम बघून त्यावर मलमपट्टी केली आणि जखम बरी होण्यासाठी आणखी काही दिवस मलमपट्टी करण्याची गरज असल्याचं सांगितलं. पुढच्या वेळी वैद्यबुवांना काही कारणानं ऐनवेळी बाहेरगावी जावं लागलं, म्हणून त्यांनी आपल्या मुलाला त्याच्याकडे पाठवलं.आपल्या वडिलांना काहीच कळत नाही,म्हणत त्यानं त्या श्रीमंत माणसाचं बोट गरम पाण्यात बुडवलं आणि त्या किरकोळ जखमेतलं तूप निपटून काढलं. आणि आता यापुढे मलमपट्टीची गरज नसल्याचं सांगितलं.घरी परतलेल्या वैद्यबुवांना जेव्हा मुलानं ही गोष्ट सांगितली,तेव्हा त्या पित्यानं आपल्या कपाळाला हात लावला आणि मुलाला म्हटलं ,हे एवढं मला कळत नव्हतं असं समजू नकोस,मी केवळ आपली पुढची सोय करून ठेवत होतो!तात्पर्य, आपल्या देशातले सत्ताधीश आतापावेतो वैद्यबुवांचाच कित्ता गिरवत होते!स्वत:च्या तुंबड्या भरत पुढच्या पिढ्यांची सोय करण्यासाठी देशाचेच धन, साधन, संसाधन लुबाडण्यात आकंठ बुडून गेले होते.

ह्यावेळी मात्र भारतातल्या जनतेनं रुडयार्ड किपलिंग,जॉन स्ट्राची प्रभृतींना खोटं पाडलं. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक एकजुटीनं भारतातल्या जनतेनं स्वतंत्र भारतात स्थिर सरकार देणारी भरभक्कम अशी १६ वी लोकसभा जगापुढे आणली आणि सगळं जग अचंबित झालं.   

देशाच्या विकासाऐवजी स्वत:चाच विकास करणाऱ्या,गरिबांची गरीबी हटवण्याऐवजी स्वत:चीच गरीबी हटवणाऱ्या सत्ताधुंद नेत्यांना इसबार जनता माफ नहीं करेगी,असा सज्जड दम आणि इशारा मतदारांनी देऊनसुद्धा नेत्यांनी जनमानसाच्या तीव्र प्रतिक्रियेकडे कानाडोळा केला आणि सव्वाशे वर्षांपेक्षाही जुना असलेल्या काँग्रेस पक्षानं आजवरच्या त्यांच्या लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात सर्वात कमी ४४ जागा मिळवल्या आणि तरीही संसदेतला दुसऱ्या क्रमांकाचा जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरला.जनतेनं भरभरून नरेंद्र मोदींना आपली पसंती दिली आणि भाजपाला एकहाती २८२ जागा मिळाल्या.त्यामुळे आता विपक्ष सुद्धा गठबंधन करून तयार करावा लागेल,अशी मजेदार प्रतिक्रिया सर्व थरांतून उमटू लागली. लोकसभेत विरोधी पक्षाचा नेता (लीडर ऑफ अपोझिशन)बनण्यासाठी लोकसभेत त्या पक्षानं एकूण जागांच्या दहा टक्के जिंकलेल्या असायला हव्या,पण काँग्रेसजवळ तेवढ्याही जागा नाहीत.दिल्लीश्वर होण्यासाठीचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो कारण उत्तर प्रदेशातल्या लोकसभेतल्या जिंकलेल्या जागांच्या आकडेवारीवर खूप काही अवलंबून असतं.भाजपानं उत्तर प्रदेशात ७२ जागा मिळवून दणदणीत विजय मिळवला.मुस्लिम समाजाचे आपणच काय ते कैवारी म्हणून मुस्लिमांचा पत्कर घेतलेले मुलायम सिंह यांना उत्तर प्रदेशातल्या जनतेनं एकही मुस्लिम उमेदवार निवडून नं देऊन सणसणीत चपराक दिली आहे. त्यांच्या सपाचे अवघे पाच उमेदवार जिंकले आणि बहन सुश्री मायावती ह्यांना उत्तर प्रदेशातल्या जनतेनं नारळ दिला.उत्तर प्रदेशात सगळ्यात केविलवाणी स्थिती काँग्रेसची आहे,तिथे सोनिया गांधी आणि राहुल गांधी ह्यांनाच काय तो विजय मिळाला.

सोनिया गांधी यांच्या विरोधात भाजपानं हेमा मालिनी आणि राहुल गांधी ह्यांच्या विरोधात एखाद्या 'चांगल्या' सिने अभिनेत्याला उतरवलं असतं,तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी ह्यांच्याही जागा भाजपाच्या पारड्यात आल्या असत्या.स्मृती इराणीना मथुरेहून उभं केलं असतं,तर त्या जिंकल्या असत्या.उत्तर प्रदेशातली मानसिकता बघता साधं समीकरण म्हणजे पुरुषाच्या विरोधात पुरुष उमेदवार आणि स्त्री उमेदवाराच्या विरोधात स्त्री उमेदवार उभा करावा. पुढच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अमेठीसाठी आत्तापासून चांगल्या पुरुष उमेदवाराचा-जनमानसावर पकड असलेल्या चांगल्या लोकप्रियसिनेअभिनेत्याचा शोध घेऊन त्याचं ग्रूमिंग भाजपानं केलं,तर "जरा ठिवावं की "असा विचार करून उत्तर प्रदेशातल्या जनतेनं ह्यांना भले आत्ता निवडून दिलं असेल;पुढच्या वेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी ह्यांच्या पदरी पराजय निश्चित टाकतील.

मात्र आताच उत्तर प्रदेशातल्या आणि त्यातूनही वाराणसी मधल्या लोकांना नरेंद्र मोदींच्या विजयामुळे अतिशय आनंद झाला आहे ."किसी के कन्धे से कन्धा और किसी को कन्धा दे दिया,मान गये जनता तू सच मे जनार्दन है।"असं उत्तर प्रदेशातल्या लोकांचं म्हणणं आहे.रामधारी सिंह दिनकर यांची कविता प्रतीकात्मक रुपात प्रकटली असल्याचं त्यांना वाटतं आहे.   

"कलम, आज उनकी जय बोल
जो अगणित लघु दीप हमारे
तुफानों में एक किनारे
जल-जलाकर बुझ गए किसी दिन
मांगा नहीं स्नेह मुंह खोल
कलम, आज उनकी जय बोल
पीकर जिनकी लाल शिखाएं
उगल रही लपट दिशाएं
जिनके सिंहनाद से सहमी
धरती रही अभी तक डोल
कलम, आज उनकी जय बोल "

"वो आया और संसद के सेंट्रल हॉल से दहाड़ के सारी दुनिया को सन्देश दे गया, भारतवर्ष हमारे लिए एक भूमि का टुकड़ा नहीं हमारी माँ है,भारत माता को परम वैभव के शिखर पर ले के जाने वाले महानायक का आगमन हो चुका है. सबसे ज़्यादा ख़ुशी तो इस बात की है कि मोदी जी के आने के बाद गुजरात की तरह बनारस मेँ भी मद्य-निषेध लागू हो जायेगा." असं वाराणसी मधला युवावर्ग मानतो.  

आपली रेघ दुसऱ्यापेक्षा मोठी कशी करायची,तर दुसऱ्यानं ओढलेली रेघ नं पुसता त्यानं ओढलेल्या रेघेपुढे आपण आपली मोठी रेघ ओढायची असते.आधीच्या नेत्यांनी ओढलेल्या रेघेपुढे नरेंद्र मोदी आणखी मोठी रेघ ओढतील तर भारताची रेघ इतर देशापेक्षाही निश्चितच मोठी होईल!
-------- 
रश्मी घटवाई 
०९८७१२४९०४७   

No comments: