Tuesday, April 29, 2014

"लम्हों ने ख़ता की थी,सदियों ने सज़ा पायी।"

मुखवटयाआडचा चेहरा  

-रश्मी घटवाई 

घर फिरलं;की घराचे वासेही फिरतात,ह्याचा अनुभव सध्या काँग्रेस पक्षाला येतो आहे .गेल्या दहा वर्षांत आणि त्यांतही गेल्या पाच वर्षांत तर जरा जास्तच -काँग्रेस प्रणित आघाडीनं लाखो करोडो रुपयांचे घोटाळे करून देशाचं अपिरीमित असं नुकसान करून ठेवलंय. या सगळ्या घोटाळ्यांचा बभ्रा होणार नाही ,ह्या भ्रमात काँग्रेस पक्ष आणि घोटाळ्यांत लिप्त नेते होते,पण म्हातारीने कोंबडा कितीही झाकला तरी सूर्य उगवायचा रहात नाही,त्याप्रमाणे काँग्रेस प्रणित आघाडीच्या कोळशासारख्या काळ्याकुट्ट कारकीर्दीतली एका मागोमाग एक घोटाळ्यांची प्रकरणं बाहेर येऊ लागल्यावर सर्वसामान्य माणसाची मती कुंठीत झाली पण निगरगट्ट काँग्रेसनं 'तो मी नव्हेच 'असा पवित्रा घेतला आणि आपणच आपली पाठ थोपटून घेतली.एरवी सर्वसामान्य माणसाच्या हातून यत्किंचितही चूक झाली आणि आर्थिक व्यवहारापायी त्याच्या चारित्र्यावर जरा जरी शिंतोडे उडले,तर त्याला धरणी पोटात घेईल तर बरं,असं होत असल्याचं आपल्याला दिसतं ;पण इथे लाखो करोडो रुपयांचे घोटाळे करून आणि देशात तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर अब्रूची लक्तरं टांगली जाऊन एवढी नाचक्की झाली,तरी आपण कसे 'आदर्श' आणि प्रामाणिक आहोत म्हणून काँग्रेस पक्ष स्वत:च स्वत:ला प्रमाणपत्र देत सुटला. आपण आपले कल्याण करायचे की अकल्याण, हे ठरवणे आपल्या हाती असते,असं भगवद्गीता सांगते.ह्यापासून अर्थबोध नं घेतलेला काँग्रेस पक्ष स्वत:च स्वत:च्या हातानं स्वत:चं अकल्याण करीत सुटला.बरं एवढं सगळं होऊनही मितभाषी पंतप्रधानांनी या सगळ्यांवर मौन बाळगल्यामुळे लोक अधिकच बुचकळ्यात पडले.

ह्या पार्श्वभूमीवर नुकतंच "द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर" हे संजय बारू यांनी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालं.संजय बारू हे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे माजी मीडिया अ‍ॅडव्हायजर होते . पंतप्रधानपदाच्या खुर्चीत बसल्यावर बाहेरच्या जगापासून माझा संपर्क तुटेल,म्हणून तुम्ही माझे डोळे आणि कान व्हावं,'असे म्हणून पूर्व परिचय असलेल्या संजय बारुंना पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी आपला मीडिया अ‍ॅडव्हायजर म्हणून काम करायला बोलावून घेतलं होतं.

पंतप्रधानांचे प्रसारमाध्यम सल्लागार-मीडिया ‍ॅडव्हायजर-ह्या महत्वाच्या पदावर यूपीए -१च्या काळात कार्यरत असलेले तसंच पंतप्रधानांच्या विश्वासातले अधिकारी संजय बारू यांनी गेल्या दहा वर्षांत एकूणच देशातल्या सत्तेबद्दल आणि घडामोडींबद्दल सगळ्यांनाच ठाऊक असलेलं गुह्य पुस्तकात अधिकृतपणे उघड केलं आणि देशात एकच खळबळ माजली.ह्या पुस्तकानं ऐन सार्वत्रिक निवडणुकींच्या धुमाळीत अनेक कटु सत्यांना वाचा फोडली आहे,अनेकांच्या चेहऱ्यावरचे बुरखे टराटरा फाडले आहेत, अनेकांच्या रंगरंगोटी केलेल्या मुखवटयांआडचे खरे चेहरे उघड केले आहेत.त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यांवरचे रंग उडाले,तर अनेकांच्या हाती आयतं कोलीत सापडलं.ह्या पुस्तकानं राजकारणी नेत्यांचा, सत्ताकारणी प्रशासनकर्त्यांचा आणि सोशल इलाइटस् - सामाजिक उच्चभ्रू वर्तुळांत वावरणाऱ्यांचा आणि 'दिल्ली ते गल्ली' चालणाऱ्या राजकारणाचा धांडोळा घेतला आहे.यूपीए -१च्या काळात-खरं म्हणजे गेल्या दहा वर्षांत दिल्लीतल्या सत्तेच्या सारीपाटावर प्यादी कशी हलत,होती ,ती तशी का हलत होती आणि त्यामागचा खरा सूत्रधार कोण हे सगळं अगदी बारीक सारीक तपशिलांसह बारूंनी त्यात लिहिलंय . मीडिया अ‍ॅडव्हायजर आणि अर्थविषयक बलाढ्य वृत्तपत्रांचे माजी संपादक असल्यामुळे साहजिकच राजकारणातला प्रसारमाध्यमांचा वावर आणि वापर कसा होतो,ह्याचंही दृश्य-अदृश्य प्रतिबिंब त्यांच्या भाष्यात उमटलं आहे."धिस बुक विल हेल्प रीडर्स अंडरस्टॅण्ड द कॉम्प्लेक्स रिलेशनशिप  बिटवीन द पीएम अ‍ॅण्ड द पार्टी प्रेसिडेन्ट" असं बारू म्हणतात, त्याचं पानागणिक प्रत्यंतर पुस्तक वाचताना येऊ लागतं .  

डॉ.मनमोहन सिंह हे योगायोगानं सुद्धा नव्हेत;तर केवळ अपघातानंच झालेले पंतप्रधान आहेत,ह्याबद्दल दुमत असणार नाही.दस्तुरखुद्द डॉ.मनमोहन सिंह ह्यांना स्वत:लाही,आपण निव्वळ अपघातानंच झालेले पंतप्रधान आहोत,हे ठाऊक आहे.जर सोनिया गांधी जन्मानं इटालियन नसत्या(भारतीय असत्या )तर तथाकथित त्यागाबिगाच्या भानगडीत न पडता स्वत:च पंतप्रधान झाल्या असत्या.अंतर्नाद…आपला आतला आवाज वगैरेंचा पोकळ हवाला देत आपण विनम्रपणे पंतप्रधानपदाचा त्याग करीत असल्याचा आव आणायची त्यांना गरजच भासली नसती.हा सगळा इतिहास सगळ्यांनाच चांगला माहीत आहे. त्यामुळे पंतप्रधानपदावर एक आभासी प्रतिमा,जिच्याकडे पंतप्रधानपदाचे आभासी अधिकार असतील आणि खरं पंतप्रधानपद आणि पंतप्रधानपदाचे अधिकार सोनिया गांधी ह्यांच्याकडे असतील, अशी सोयीची उपाययोजना आखण्यात आली,सोनिया गांधींच्या त्याग -नाट्याच्या वेळी ज्याने जितके अधिक अश्रू गाळले,त्याला किंवा तिला त्या प्रमाणात मंत्रिपद प्राप्त झाले, हे सर्वज्ञात आहे. 

आपल्या शोभेच्या पदाच्या मर्यादा जाणून परीस्थितीशरण होत डॉ.मनमोहन सिंह ह्यांना काय काय 
मानापमान झेलावे लागले!'सम टाईम्स इन लाईफ ,इट इज वाईज टू बी फूलिश'असं सांगणाऱ्याडॉ.मनमोहन सिंह यांना अनेकदा त्याच वक्तव्याप्रमाणे वागावं लागलं. डॉ.मनमोहन सिंह ह्यांनी संसदेत आणि नंतर परवेझ मुशर्रफ यांना ऐकवलेल्या मुझफ्फर रझ्मी यांच्या उर्दू शायरीचाच आधार घेत सांगायचं झालं तर "लम्हों ने ख़ता की थी,सदियों ने सज़ा पायी।"  

"इन यूपीए-१,ही( डॉ.मनमोहन सिंह)वॉज इन ऑफिस,बट ही वॉज नॉट इन पॉवर...  डॉ.सिंह वुड हॅव बीन वेल अवेअर ऑफ द लिमिटस् टू द प्राईम मिनिस्टरियल अथॉरिटी अंडर सच अ डिस्पेन्सेशन. ही सॉ हिमसेल्फ अ‍ॅज द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर… काँग्रेस'स्  अलाईज (allies)इन यूपीए-१ नॉमिनेटेड देअर ओन मिनिस्टर्स अ‍ॅण्ड बार्गेन्ड फॉर देअर पोर्टफोलियोज विथ सोनिया ,नॉट विथ  डॉ.सिंह ..अ‍ॅज फॉर सिनियर काँग्रेस लीडर्स,दे ओवड् देअर कॅबिनेट पोस्टस्  ऑलमोस्ट एन्टायरली टू सोनिया गांधी …व्हेन द कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स वॉज रीशफल्ड ड्युरिंग द टर्म ऑफ यूपीए-१, डॉ.सिंह डिड हॅव मोअर ऑफ अ से ,बट ईव्हन सो,फ्यू ऑफ इटस्  मेम्बर्स एव्हर बिहेवड् अ‍ॅज इफ दे ओवड् देअर मिनिस्टरियल पोझिशनस् टू पीएम.. ."बारू लिहितात. 

दिल्लीत दोन सत्ताकेंद्र असल्याचं अगदी सर्वसामान्य माणसाला जाणवत होतं. त्याबद्दल भाष्य करताना बारूंनी काँग्रेसच्या नेत्यांचे नावासकट आणि प्रसंगासकट तपशील देऊन लिहिलंय की राजकीय दृष्ट्या डॉ.सिंह हे अमुक अमुक ह्यांचे आश्रयदाते होते,पण सोनिया आणि राहुल गांधी यांच्या प्रती निष्ठा जाहीर करण्यानंच त्यांची राजकीय कारकीर्द टिकून राहणार होती. 

"… वॉज डॉ.सिंह'ज् प्रोटेजी(protege ), बट ही न्यू दॅट हिज पॉलिटिकल करीअर डिपेन्डेड ऑन डेमॉंंन्स्ट्रेटिंग लॉयल्टी टू सोनिया अ‍ॅण्ड राहुल." अन्य दुसऱ्या नेत्याबद्दल पंतप्रधानांनी बारूंना विचारलं तेव्हा,"आय रिप्लाईड दॅट … ऑट टू बी मोअर डेमॉंंन्स्ट्रेटिव्ह ऑफ हिज लॉयल्टी टू द पीएम इफ ही वॉन्टेड  अ बर्थ इन द मिनिस्ट्री ." बारू लिहितात. त्या नेत्याला डॉ.सिंह ह्यांनी मंत्रिमंडळात घेतलं. त्या नेत्यानं सोनिया गांधी यांच्या स्नेह्याला त्याबद्दल धन्यवाद दिल्याचं नंतर उभयतांना कळलं. "अ‍ॅट लीस्ट यंगर काँग्रेस एमपीज् शुड फील दे ओवड् देअर मिनिस्टरियल बर्थ टू द पीएम रादर दॅन टू जस्ट सोनिया."बारू लिहितात.
 
एकीकडे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह हे एकटे एकाकी असहाय असल्याचं चित्र लोकांपुढे येत होतं , त्याचवेळी देशाचे कणखर पंतप्रधान म्हणून जगापुढे आपली प्रतिमा निर्माण करणं हे त्यांच्यापुढे आव्हान होतं.    
"व्हॉट शुड डॉ.सिंह'ज् स्ट्रैटेजी बी ?शुड ही अझ्युम दॅट व्हाईल सोनिया वॉज द लीडर ऑफ द काँग्रेस ,ही वॉज द हेड ऑफ अ कोअलिशन गव्हर्नमेन्ट ,विथ नॉन - काँग्रेस कॉन्स्टिट्यूएन्ट्स ,इन्क्ल्युडिंग अ रिबेल लाईक … अ‍ॅण्ड कार्व्ह आउट हिज ओन पॉलिटिकल स्पेस अ‍ॅण्ड रिटेन अ‍ॅडमिनीस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ  गव्हर्नमेन्ट?ऑर शुड ही बी रनिंग एव्हरी डे टू  10 जनपथ ,सोनिया'ज् रेसिडन्स -कम -ऑफीस, टु टेक हर इंस्ट्रक्शन्स?हॅण्डलिंग द डेलिकेट इक्वेशन विथ सोनिया वॉज डॉ.सिंह'ज् फर्स्ट अ‍ॅण्ड बिगेस्टपॉलिटिकल चॅलेंज."बारू लिहितात. 
 
राजीव गांधींच्या निधनानंतर काँग्रेस पक्षात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती."विदाऊट अ नेहरू -गांधी फॅमिली मेंबर अ‍ॅट द टॉप, काँग्रेस पार्टी वुड स्प्लिन्टर अ‍ॅण्ड विदर अवे." बारू लिहितात. "द इनसायडर " लिहिणारे पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव हे पक्षाच्या आणि जी हुजुरी करणाऱ्या पक्षातल्या लोकांच्या दृष्टीने "आउटसायडर"च ठरले.इतका विद्वान माणूस ;पण त्यांच्या मृत्युनंतर काँग्रेस शीर्ष नेतृत्वानं त्यांचं पार्थिव सुद्धा काँग्रेसच्या मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवू दिलं नाही.बारूंनी ह्यावर पोटतिडकीनं भाष्य करीत काँग्रेस शीर्ष नेतृत्वावर सपासप कोरडे ओढले आहेत. " नरसिंह राव'ज् चिल्ड्रेन वॉन्टेड द फॉर्मर पीएम टु बी क्रीमेटेड इन दिल्ली,लाईक अदर काँग्रेस प्राईम मिनिस्टर्स. इम्प्रेसिव्ह मेमोरियल्स हॅड बीन बिल्ट फॉर नेहरू ,इंदिरा अ‍ॅण्ड राजीव अ‍ॅट प्लेसेस व्हेअर दे  हॅड बीन क्रीमेटेड…  …  वॉन्टेड मी टु एन्करेज नरसिंह राव'ज् चिल्ड्रेन,टु टेक देअर फादर'स् बॉडी टू हैद्राबाद फॉर क्रीमेशन. … सोनिया डिड नॉट वॉन्ट अ मेमोरियल  फॉर राव एनीव्हेअर इन दिल्ली.द काँग्रेस पार्टी रिफ्युज्ड टु अलॉव  राव'ज् बॉडी टु बी ब्रॉट इन्टू द पार्टी'ज् हेडक्वार्टर ऑन इट्स वे टू एअरपोर्ट  अ‍ॅण्ड  सोनिया चोज नॉट टु बी प्रेझेन्ट अ‍ॅट द हैद्राबाद क्रीमेशन ," बारू लिहितात .     

अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेल्या,आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थशास्त्रातल्या ज्ञानाच्या बळावर सन्माननीय व्यक्ती म्हणून नावलौकिक मिळवलेल्या आणि खरं म्हणजे अजिबात धूर्त राजकारणी नसलेल्या एका विद्वान अर्थशास्त्रज्ञाची यूपीएच्या कारकीर्दीत किती आणि कशी घुसमट होत गेली ह्याचं साद्यंत वर्णन संजय बारूंनी केलं आहे-तेच त्यांचं उद्दिष्ट्यपण आहे,ते वाचून पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांची अगतिकता,कुचंबणा आणि त्यांचं मौनव्रत ह्याबद्दल वाचक हळहळू लागतो.अंतर्बाह्य साधे सज्जन असलेल्या पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह ह्यांच्या हाताखालच्या,त्यांच्या सरकारातल्या  मंत्र्यांसंत्र्यांनी लाखो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आणि अपहार केला,पण बहुधा त्यांना त्यावर मिठाची गुळणी धरण्यास बाध्य करण्यात आलं असावं .     

त्यांनी केलेल्या नरेगा (मनरेगा)कामाचं श्रेय राहुल गांधींना देण्यात आलं.मीडियात तशी पद्धतशीर बातमी पेरली गेली नि तिचा प्रचार-प्रसार करण्यात आला."वुई हॅव टु बिल्ड राहुल'स् इमेज"अशी त्याची भलामण करण्यात आली.त्यांनी केलेल्या कृषि-कर्जमाफीची योजना ह्या त्यांनी हृदयाशी बाळगलेल्या संकल्पनेचं श्रेयसुद्धा त्यांना नं देता सोनिया गांधींना देण्यात आलं. त्यावर पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांची प्रतिक्रिया होती-"लेट देम टेक ऑल द क्रेडिट.आय डू नॉट नीड इट.आय अ‍ॅम ओन्ली डूइंग माय वर्क. आय डू नॉट वॉन्ट एनी मीडिया प्रोजेक्शन."             
 
पक्षांतर्गत हेवे- दावे, ढवळाढवळ, शह-काटशह,एकमेकांवर कुरघोडी करू पहाणारे,अजिबात सहकार्य नं करणारे सरकारातले मंत्रीगण,पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला 'अंतरीच्या गुढगर्भी एकदा जे वाटले, एकदा जे वाटले, ते प्रेम आता आटले' असा शीर्ष नेतृत्वाकडून येत असलेला अनुभव असं सगळं जिवंत चित्रण "द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर"ह्या पुस्तकात संजय बारू यांनी केलं आहे. हे पुस्तक वाचल्यावर अगदी अनभिज्ञ व्यक्तीलाही कळतं की कुण्या बाळ्या,बंड्या,बबड्या,छकुली यांच्यासाठी निर्माण करण्यात आलेलं पंतप्रधान हे पद नाही. पंतप्रधान हा काही पक्षाचा उरत नाही,तो देशाचा होतो; देशात आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला आपल्या देशाची आन -बान -शान उंचावण्याची जबाबदारी असते.जोवर त्याची प्रतिमा चांगली असते,तेव्हा त्याच्या सरकारची आणि देशाची प्रतिमा चांगली असते. पंतप्रधानाची प्रतिमा मलीन झाली;तर मात्र सरकारची आणि देशाची प्रतिमासुद्धा डागाळते!  

"लम्हों ने ख़ता की थी,सदियों ने सज़ा पायी।" 
The Accidental Prime Minister: The Making and Unmaking of Manmohan Singh

हर हर महादेव 
-रश्मि  घटवाई 
"सुरतनु जिमण अने काशीनु मरण "ऐसा गुजरात में कहा जाता है । अर्थात कोई भोजन करें,तो सुरत में  और अंतिम श्वास लें ,तो विश्व की प्राचीनतम नगरी काशी -वाराणसी में !दोनों स्थानोंका अपना अपना महात्म्य है ।वरुणा व अस्सी इन दो नदियों के बीच बसी होने के कारण वाराणसी नाम से जानी गयी यह नगरी विश्व की प्राचीनतम धार्मिक नगरी है ।मान्यता है कि साक्षात ईश्वर ने काल के साथ साथ अपने व्यक्त शरीर से वरुणा व अस्सी नदियोंको निर्माण किया और इनके संगम पर पवित्रतम स्थान काशी का भी निर्माण किया। शिव -पार्वती ने स्वयं इस स्थान का निर्माण किया होने  के कारण व उनका  यहां निरंतर वास  होने  के कारण इस स्थान को अविमुक्ता, आनंदवन, रुद्रवन नामोंसे भी जाना जाता है।१२ज्योतिर्लिंगों में  से एक ज्योतिर्लिंग विश्वेश्वर अथवा विश्वनाथ, विश्वप्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर में स्थित है।"हर हर महादेव"की गूँज के साथ, अपरिमित श्रद्धाभाव के साथ श्रद्धालू विश्वनाथ शिव का पूजन करते हैं  ।

देश में इस समय चुनाव का वातावरण अपनी चरम सीमा पर है । वाराणसी नगरी में इन दिनों गंगा की लहरों के साथ साथ चुनाव की लहर भी छाई हुई है ।भारतीय जनता पार्टी के प्रधान मंत्री पद के प्रत्याशी नरेंद्र मोदी वाराणसी से चुनाव लड़ रहे हैं ।पूरे देश में मोदी की लहर हैवाराणसी में नरेंद्र मोदी की केसरिया लहर साफ़ दिखायी दे रही है। "हर हर महादेव"गूँज के साथ भाजपा को जीत दिलाने के लिये हिंदूओंकी पवित्र नगरी वाराणसी के मतदाता पूरी तरह से तैयार हैं।

मार्च के महीने में मैं ५ -६ दिन व्यक्तिगत काम के लिए वाराणसी गयी हुई थी। मैं जिस दिन सुबह वाराणसी पहुँची,चुनाव आयोग ने तभी उस दिन सोलहवी लोकसभा के लिए चुनाव घोषित किये थे , अत: मुझे बड़ी उत्सुकता थी ।वाराणसी को इसी पल का इन्तजार था।लेकिन उस वक्त वाराणसी से किसी भी राजनैतिक दल का उम्मीदवार घोषित नहीं किया गया था।भारतीय जनता पार्टी वाराणसी  में नरेंद्र मोदी को प्रत्याशी के रूप में उतारेगी ,इस बात की चर्चा तो बहुत हो रही थी परन्तु अधिकृत रूप से तब यह घोषणा नहीं हुई थी।मैंने वाराणसी में सभी स्तरों के  लोगोंसे बातचीत की,तथा उनके विचारोंको जाना। 

एयरपोर्ट के बाहर आतेही टैक्सी में बैठकर मैंने  ड्राइवर को सहज अंदाज से वाराणसी का हालचाल पूछा।उसे मानों इसी प्रश्न का इन्तजार था।"बस अब सबको नरेंद्र मोदी का इन्तजार  है।वाराणसी में नरेंद्र मोदी की लहर हैवह बोला।न उससे मेरी कोई जान-पहचान थी,न उसे यह पता था कि मैं पत्रकार हूँ , पर एक घंटेभर के सफ़र में,बातोंमें उसने मुझे समूचे वाराणसी के व वाराणसी के लोगों के अंतरंग का दर्शन कराया। "वाराणसी में  नरेंद्र मोदी जी की सभा हुई थी २० दिसंबर को,लेकिन व्यस्तता के चलते मैं नहीं जा पाया। उनकी सभा में भारी भीड़ थी। लोग चाहते हैं कि नरेंद्र मोदी वाराणसी से चुनाव लड़ें। यहाँ की सड़के बहुत ख़राब हैं जिसके चलते यहाँ लोगों को बहुत ही असुविधा होती हैं। आये दिन ख़राब सड़कों के कारण दुर्घटनाएं  होती रहती हैं। लोगों के वाहन क्षतिग्रस्त होते हैं। वाराणसी की जनता को विश्वास है कि आते ही नरेंद्र मोदी वाराणसी में  जादू की छड़ी चला देंगे और वाराणसी को सुन्दर व् साफ़-सुथरा कर देंगे। यहाँ लाखो करोड़ों की संख्या में अपने देश से व विदेश से पर्यटक आते हैं। यहाँ रास्तें अच्छे हो जायेंगे तो और भी अधिक लोग आकर्षित होंगे।" टैक्सी चालक संतोष ने बताया। 

वाराणसी में १२ मई को चुनाव होनेवाला है।लेकिन वाराणसी में तो  उसी दिन से चुनावी वातावरण गरमाने लगा था। जिस रिज़ॉर्ट में मैं व मेरे पति रुके थे,वहाँ शांति थी। रिज़ॉर्ट सुन्दर,अत्यंत साफसुथरा था और वहाँ के केअर टेकर बहुत आतिथ्यशील थे।मैंने केअर टेकर को टीवी पर न्यूज चैनेल चला देने के लिए कहा।चुनावोंकी घोषणा तभी हुई होने के कारण सभी चैनेलोंपर केवल चुनावोंकी खबरें आ रही थीं।मुझे ध्यानपूर्वक खबरोंको सुनते हुए केअर टेकर ने देखा, तो स्वाभाविक अंदाज में बताने लगा ,"यहाँ मोदी की लहर है।" आपको सबसे अधिक सताने वाली इस शहर की सबसे गम्भीर समस्या क्या है ?मेरे इस प्रश्न पर वह तुरंत बोला,"ख़राब रास्ते !वाराणसी में जितनी ख़राब सड़कें हैं ,उतनी कहीं हीं होंगीं। " उसके विचार में मोदी वाराणसी से जीतेंगे और तभी वाराणसी का कायापलट होगा। 

रिज़ॉर्ट की व्यवस्था के बारे में हमारी राय जानने के लिए रिज़ॉर्ट के व्यवस्थापक अमित सिंह हमसे बातचीत करने लगे,तो स्वाभाविक रूप से संभाषण राजनीती व् आनेवाले चुनावोंकी तरफ बढ़ा। "वाराणसी में १२ मई को चुनाव होनेवाला है।लेकिन वाराणसी में ही नहीं,बाहर भी मोदी की लहर है।" वह बताने लगे।उनकी वाणी बहुत ही उच्च अभिरुचिपूर्ण तथा व्यवहार शालीन व मृदु था। तीस वर्षीय अमित सिंह को लेखन का शौक है।"मैं  मूलत:बलिया का रहनेवाला हूँ। अभी बाहरगाँव से लौट रहा हूँ। ट्रेन में मूंगफल्ली वाला मूंगफल्ली बेच रहा था,और बोल रहा था,नमो नमो चौदह !तो मैंने उसे बोला कि भैय्या तुम तो पार्टी के आदमी लग रहे हो! नमो नमो चौदह कहकर मूंगफल्ली बेच रहे हो,तुम्हारा इशारा तो सीधे २०१४ के चुनावोंकी तरफ है। तुम मोदी जी का प्रचार कर रहे हो !तो मूंगफल्ली वाला मुझसे कहने लगा,कि मैं अकेलाही नहीं पूरा देश मोदी जी का प्रचार कर कर रहा है!पूरा देश चाहता है कि नरेंद्र मोदी देश के प्रधानमंत्री हों और देश का विकास हो!" अमित सिंह के विचार में वाराणसी में भगवा ही फहरेगा।वाराणसी में "हर हर महादेव" नारा ही गूँजेगा!उनके विचार में काँग्रेस लगभग ख़तम हो चुकी है।" आम आदमी पार्टी का कोई विज़न नहीं है। केजड़ीवाल तानाशाह है,सत्तालोलुप  हैं। उनकी बॉडी लैंग्वेज में आत्मविश्वास नहीं है। उनको देख कर लगता नहीं कि वह कुछ करेंगे ,जबकी मोदीजी को देखकर लगता है,कि ये हमारे लिए,इस देश के लिए कुछ करेंगे। देश में व्यापक बदलाव लायेंगे।

" सपा तो केवल मुसलमानोंकी पार्टी है। मुलायम सिंह नब्बे प्रतिशत मुसलमानों के हित में और दस प्रतिशत यादवोंके हित में सोचते हैं। फेसबुक पर भी उन्होंने 'मुल्ला+यम' यही अपनी पहचान दी है। आज़मखान की भैसोंको ढूँढने के लिए उन्होंने दिन रात एक कर दी। पर कुछ ३-४ महीने पहले यहाँ चाँदपुर गाँव में एक ही परिवार के चार लोग मारे गए,उनके हत्यारोंको ढूँढने के लिए उन्होंने कुछ भी नहीं किया। रूस के राष्ट्राध्यक्ष भी कहते हैं कि उनके देश में अल्पसंख्यकों को अल्पसंख्यकों की तरह ही रहना होगा,पर अपने यहाँ अल्पसंख्यकों का तुष्टिकरण किया जाता हैउन को बहुत अधिक महत्त्व दिया जाता है।"अमित सिंह बताते हैं ।"वाराणसी में भगवा ही फहरेगा",दृढ़ विश्वास के साथ वह दोहराते हैं ।

रिज़ॉर्ट के मालिक विजय प्रकाश चार्टर्ड एकाउंटेंट हैं। राजनीति में उन्हें रूचि है।उनसे हुई अनौपचारिक बातचीत के दरम्यान सी ए विजय प्रकाश ने बताया कि देश में और विशेष रूप से उत्तर प्रदेश में कैसे जाति -धर्म पर आधारित मतदान होता है।

"उत्तर प्रदेश में १९ जिले ऐसे हैं ,जो मुस्लिमबहुल हैं। रामपुर में ४२ प्रतिशत मुस्लिम समाज के वोट होने के कारण वहाँ से मुस्लिम प्रतिनिधि चुनकर आता है।"वे बताते हैं।  "वैसे देखा जाये तो नाम भलेही रामपुर है उस जगह का;पर है तो वह रहिमपुर!"मेरी इस टिपण्णी पर वह  बताते हैं ," मुस्लिमोंका एक ही नारा होता है;सबसे पहले भाई ,फिर सपाई ,फिर काँग्रेस आई,कोई न मिलें,तो बसपाई ! किसी भी पार्टी का मुस्लिम उम्मीदवार हो,तो मुस्लिम मतदाता पार्टीके भेदाभेदों को भुलाकर मुस्लिम उम्मीदवार को इकट्ठा मत देंगे। मुस्लिम उम्मीदवार नहीं होगा,तो फिर सपा के उम्मीदवार को अपना मत देंगे,क्योंकि समाजवादी पार्टी उन्हीं के पक्ष में है।उत्तर प्रदेश में मुस्लिम मतदाता जिसके साथ चिपक जायेंगे उसकी सरकार बनेगी। उत्तर प्रदेश में इसी के चलते सत्ता परिवर्तन हुआ।परन्तु इस बार मुजफ्फर नगर दंगोंके कारण मुस्लिम मतदाता सपा से नाराज है। पश्चिम बंगाल में ममता मुस्लिमोंके मतों के कारण मुख्यमंत्री बनीं। यदि वह भाजपा के साथ जाएँगी तो पश्चिम बंगाल के  उनके मुस्लिम मतदाता उनसे नाराज़ हो जायेंगे।दिल्ली  में आम आदमी पार्टी वाल्मीकि समाज और मुस्लिम मतदाता के वोटोंपर जीती थी।सबसे बड़ी बात यह है कि पढ़े-लिखे लोग मतदान नहीं करते। अनपढ़ लोग इकट्ठा उसपर छप्पा मारते हैं-अर्थात एकसाथ मत देते हैं, जिसपर छप्पा मारने के लिए उनसे कहा जाता है।वाराणसी में ब्राम्हण हैं और वैश्य अधिक हैं ।परन्तु बनिया बँट जाता है। वह एकजूट नहीं होता। क्या कारण है कि सर्विस टैक्स वकीलोंपर नहीं लगा,पर चार्टर्ड एकाउंटेंट पर सर्विस टैक्सलगाया गया है। क्या वकीलोंकी सेवा सर्विस के अंतर्गत नहीं आती ?उसका कारण यह है, कि नब्बे प्रतिशत वकील मत देते हैं।पूरे देश में  चार्टर्ड एकाउंटेंट डेढ़ लाख कि संख्या में होंगे। इसका मतलब चार्टर्ड एकाउंटेंट का वोट मात्र एक प्रतिशत है और वकिलोंका वोट शेअर नब्बे प्रतिशत होने के कारण उनके हित में,सर्विस टैक्स वकीलोंपर नहीं लगा ।पहले वोट देखा जाता है।" चार्टर्ड एकाउंटेंट विजय प्रकाश बताते हैं

कुछ समय पश्चात वाराणसी से भाजपा के लोकसभा चुनावों के प्रत्याशी के रूप नरेंद्र मोदी के नाम की अधिकृत घोषणा कर दी गयी ,तो वाराणसी में गंगा की लहरोंके के साथ साथ हर्षोल्लास की लहर भी छा गयी।परन्तु विरोधी दलों ने हेतुत: वाराणसी के वर्त्तमान सांसद डॉ. मुरली मनोहर जोशी द्वारा वाराणसी से नरेंद्र मोदी को भाजपा के प्रत्याशी घोषित होनेपर आपत्ति जताई होने की अफवाहें फैला दींइन दोनों नेताओं के समर्थकों के बीच भिडंत होने की खबरें मीडिया में आने लगीं। अत: वास्तविकता जानने के लिए मैंने वाराणसी में मेरा जिन युवाओंसे परिचय हुआ था,उन युवाओंसे दूरभाष पर बातचीत की। ८ मार्च की शाम को पर्यटन हेतु मैं वाराणसी के रामनगर किले में गयी थी। जब किला देखकर मैं बाहर आयी थी,तो मैंने देखा कि रामनगर किले के निकट के एक छोटेसे टी -स्टॉल पर कुछ युवक नरेंद्र मोदी के "चाय  पर चर्चा "कार्यक्रम के आयोजन की तैय्यारी में जूटे हुए थे। अमाप उत्साह के साथ वे  नौजवान बड़ी सी स्क्रीन (परदा ) तथा "चाय  पर चर्चा "कार्यक्रम के बैनर लगा रहे थे। उत्सुकतावश मैंने उनसे बातचीत की ,तो वे बताने लगे,की देश का युवा वर्ग यही चाहता है कि मोदी देश के प्रधानमंत्री बनें।मीडिया में जब डॉ. मुरली मनोहर जोशी व नरेंद्र मोदी के बीच कथित द्वंद्व की बात जोरोशोरोंसे उछाली जाने लगी, तो मैंने वास्तविकता जानने के लिए इन्हीं युवकोंसे दूरभाष पर बातचीत की,और पाया कि अफवाहों के विपरित चित्र था। न तो इन दो नेताओंके बीच कोई मन-मुटाव था,न इन दोनों नेताओं के समर्थकों के बीच कोई अनबन थी।

डॉ अनुपम गुप्ता वाराणसी के आकाशवाणी केंद्र पर निवेदक हैं तथा उन्होंने विधि में- (Law )में डॉक्टरेट प्राप्त की है। डॉ. मुरली मनोहर जोशी विरुद्ध नरेंद्र मोदी यह चर्चा तथा दोनों में विवाद होने की अफ़वाहें मीडिया में हेतुत: फैलायी जा रही हैं।न ही इनके समर्थकोंके बीच,मिडीया जैसे फैला रहा है,कोई लड़ाई-झगडे हो रहे हैं।भाजपा का प्रत्येक कार्यकर्ता कमल खिलाने में विश्वास रखता है,उसी दिशा में कार्य कर रहा है।भाजपा के वतर्मान सांसद डॉ. मुरली मनोहर जोशी ने पहले के काँग्रेस के सांसद को हराकर यह सीट जीती है। इस सीट पर भाजपा की ही विजय हो ,इसके लिए भाजपा के कार्यकर्ता कार्य कर रहे हैं।" वे कहते हैं। सर्वसामान्य व्यक्ति आज भी समझ नहीं पा रहा है कि दोषी और दागी मुख़्तार अन्सारी जेल में रहते हुए भी कैसे चुनाव लड़ सकता है और लालू जैसे लोग दोषी होकर भी जेल से बाहर आ जाते हैं। मेरी इस टिपण्णी पर वे बताते हैं कि मुख़्तार अन्सारी को सजा घोषित नहीं हुई है।मुख़्तार अन्सारी, अरविंद केजडीवाल आदि लोग नरेंद्र मोदी के विरोध में खड़े है,उस स्थिति पर भी वे विस्तृत चर्चा करते हैं। इस बार मतों का ध्रुवीकरण होकर हिंदुओं का मत नरेंद्र मोदी को मिलेगा ,ऐसा उन्हें लगता है।

"यहां हर हर महादेव नारा गूंजेगा " भाजयुमो के वाराणसी के जिलाध्यक्ष संतोष द्विवेदी बताते हैं
"डॉ .मुरली मनोहर जोशी और नरेंद्र मोदी इनमें कोई मनमुटाव भी नहीं है। वाराणसी की सीट को लेकर दोनों में कोई कलह भी नहीं है। अरविंद केजडीवाल को वाराणसी नगरी रत्तिभर भी महत्त्व नहीं देती। यह पूर्वांचल है।यह वाराणसी है ;कोई दिल्ली या गाज़ियाबाद  नहीं ,कि यहाँ केजडीवाल को वोट मिलेंगे।उनको या 'आप 'को यहां तिनकेभर भी नहीं पहचानता कोई!" द्विवेदी बताते हैं। 

"कितनी अजीब बात है की पिछले १० सालो से काँग्रेस इस देश को चला रही है और कई हजार करोड़ के घोटाले हुए |लेकिन केजरीवाल नरेंद्र मोदी के खिलाफ मोर्चा खोले हैं ।भारत एक ज़माने में सोने की चिड़िया कहलाता था। भारत को पहले अंग्रेजोंने लूटा,फिर काँग्रेस ने लूटा। गांधी जी ने भी कहा था कि स्वतंत्रता की प्राप्ति के बाद काँग्रेस का अस्तित्व मिटा देना चाहिए।इतने हजारों -करोड़ों रुपयोंके घोटाले करनेवाले काँग्रेस का अस्तित्व मिटा देने का यही सबसे उचित समय है। " अर्जुन सिंह बताते हैं।

इन सभी से हुई व्यापक चर्चा का सार एक ही था,कि 'वाराणसी में भगवा ही फहरेगा।वाराणसी में "हर हर महादेव" नारा ही गूँजेगा।' 


मुस्लिम समाज की मानसिकता भी अब बदलने लगी है।

बदल रही है मुस्लिम समाज की मानसिकता 

-रश्मि घटवाई 

वोट बैंक पॉलिटिक्स इन दिनों चरम सीमा पर है।अल्पसंख्यक मतदाताओंसे इकठ्ठा मत बटोरने के लिए कुछ नेता इन दिनों अपने भड़काऊ भाषणों में हीन और विवादास्पद बातें कर रहे हैं। मुलायम सिंह ने जब बलात्कार के आरोप में दोषी पाये गए आरोपियोंके प्रति हमदर्दी जताते हुए कहा कि ‘लड़कों से गलती हो जाया करती है।'तो उसके पीछेे एक ही कारण था-मुस्लिम तुष्टिकरण। क्योंकि मुंबई गैंग रेप के आरोपियों में से अधिकांश आरोपी मुस्लिम हैं। यही नहीं ,निर्भया गैंग रेप में लिप्त जो आरोपी-जिसने सबसे अधिक क्रूरता दिखाई थी, तब नाबालिग था जिसके चलते उसे बहुत ही कम सजा मिली है, वह भी मुस्लिम हैवैसे भी देश की कुछ पार्टियों ने व उनके कुछ नेताओंने यही भ्रम अपने मन में पाल रखा है कि केवल वे ही मुस्लिम अल्पसंख्यक समुदाय के एकमात्र तारणहार हैं और इसी भ्रामक कल्पना को वे मुस्लिम समाज के गले उतारने में सफल भी हुए हैं।इन अवसरवादी नेताओंने २००२ के गुजरात के दंगो को लेकर मुस्लिम समाज के मन में नरेंद्र मोदी के प्रति तथ्योंसे कोसों दूर,विद्वेषमूलक बातें डाल दी हैं।यहा तक; कि उन्होंने मुस्लिम समाज में नरेंद्र मोदी ,भारतीय जनता पार्टी तथा  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रति नफ़रत पैदा कर दी है।मुस्लिम समाज आज इनको अपना दुश्मन मानने लगा है।  

ऐसे में एक शख़्स मुस्लिम समाज को असलियत से रूबरू कराने में लगे हुए हैं। सत्तर वर्षोंसे भी अधिक उम्र के ज़हीर शेख़ जामनगर के निवासी हैं ,पर इन दिनों वे काशी में ,बिना किसी प्रलोभन या लालच के,स्वयंप्रेरणा से,देश को महाशक्ति बनाने के लिए  नरेंद्र मोदी को जिताने के लिए तन-मन-धन सेमुस्लिम समाज का प्रबोधन कर रहे हैं।

"मुसलमानों में दो पंथ होते हैं,एक शिया और दूसरा सुन्नी पंथ। अपने देश में  शिया पंथ के मुस्लिम सुशिक्षित,पढ़े लिखे हैं और दुर्भाग्यवश सुन्नी पंथ के मुस्लिम लोगोंमें शिक्षा का अभाव है।मैं उनको बताता हूँ कि तुम लोगोंकी गरीबी व अज्ञानता के पीछे शिक्षा का अभाव,यही एकमात्र कारण है   
काशी में तीन लाख मुसलमान हैं।उनमें से ७५ हजार शिया पंथ के हैं और २ लाख २७ हजार के आसपास  सुन्नी पंथ के हैं।मैं अगले चुनाव में तंदुरुस्त रहूँ ,न रहूँ ,इसलिए मैं मेरे इस अभियान को व्रत मानकर, देश को महाशक्ति बनाने के लिए लोगोंमें चेतना जगा रहा हूँ। 
    
"विरोधी पार्टीयाँ,मुलायम,मायावती मुस्लीमों से कहते हैं कि मोदी प्रधानमंत्री बन जायेंगे तो भारत के अंदर एक एक गावोंमे दंगा -फ़साद होगा। मैने मुस्लिम समाज को कहा कि भाई ,अखंड हिंदुस्तान का टुकडा किसने किया?धर्म के नाम पर जमीन का बँटवारा किसने किया?तब मोदी थे क्या?तो फिरमोदी से क्यों डर रहे हो?भाजपा सुशासन व विकासके नाम पर चुनाव ल रही है ।उनका मतलब देश में विभाजन कराना नहीं है ।नरेंद्र मोदी सबको एक करके देश को महाशक्ती बनाना चाह रहे हैं ।भाई-भाई एक हो जाएं यह चाह रहे हैं।" ज़हीर शेख़ बताते हैं। 
 
'मैं उनसे कहता हूँ ,मोदी जी से डरने की जरुरत नहींराष्ट्रीय स्वयंसेवक संघ- RSS -तुम्हारी दुश्मन नहीं है । RSS की देश में ४१ हजार से भी ज्यादा शाखाएं हैं ,वहां वें संस्कार और देशभक्ति सिखाते हैं ।लोग कहते हैं ,'चाचा भाजपा के पक्ष में हैं ,कौम के गद्दार हैं । मोदी ने गुजरात के दंगों में संहार करवाया है।तो मैं उनको बताता हूँ कि देश को स्वतंत्रता मिलने के बाद उस दिन से आजतक देश में 11 हजार से भी अधिक दंगे हुए हैं।मैं उनसे कहता हूँ कि गुजरातमें दंगे हुए,तब आप वहाँ थे क्या ?नहीं ना ?मैं था। 
दंगे मोदी जी ने नहीं करवायें। सर्वोच्च न्यायलय समेत सभी जाँच एजेंसिया १०-१२ साल उन्हें  परख रही हैं ,पर मोदी दोषी नहीं पाये गए।सभी जाँच एजेंसियों ने उन्हें परखने के बाद कहा हैं कि मोदी दोषी नहीं हैंमोदी स्वयं कह रहे हैं कि यदि वे दोषी हैं ,तो उन्हें चौराहे पे फाँसी पर लटकाया जाएं। "ज़हीर शेख़ बताते हैं।
   
"हमारा खुदा परवरदिगार कुराण में फर्माता है कि 'मैने तुमको जिस धरती पर पैदा किया,जहाँ के नदियोंका पानी पीकर तुम पले और बढ़े हो,जहाँ की हवाओंकी सास तुम लेते हो और जहाँ के खेतोंमें पैदा हुआ अनाज खाकर तुम जिन्दा हो,उस धरती से ,उस माँ भूम भारत से और अपने वतन हिंदुस्तान से तुम गद्दारी करोगे,तो मुझे कसम है अपने जलाल की;मैं क़यामत के रोज आप लोगोंको माफ़ नहीं करूंगा।"ज़हीर शेख़ बताते हैं।उनके मन में सभी धर्मोंके प्रति आदर हैमन में सर्वधर्मसमभाव रखने वाले ज़हीर शेख़ असली मायने में सेक्युलर हैं ,जो निरपेक्ष भावना से देश की उन्नति के लिए कार्य कर रहे हैं।उनकी मेहनत रंग ला रही है। क्योंकि मुस्लिम समाज की मानसिकता भी अब बदलने लगी है। 

 

Tuesday, June 5, 2012

"प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी" : आपण आणि पर्यावरण - रश्मी घटवाई

"प्रॉब्लेम ऑफ  प्लेन्टी" : आपण  आणि  पर्यावरण 
                                                                                - रश्मी घटवाई 
                                                                                      
५ जून रोजी दर वर्षी विश्व पर्यावरण दिवस साजरा केला जातो;वस्तुत:प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिवस मानून आपण प्रत्येकानं अगदी आपल्यापुरती आणि आपल्या कुटुंबीयांपुरती म्हणजे आपापल्या पातळीवर जरी पर्यावरणाची काळजी घेतली,तरी खूप काही साध्य होण्यासारखे आहे.सुदैवाने आता समाजात पर्यावरण रक्षणाविषयी जागरुकता बऱ्यापैकी वाढीला लागलेली आहे.
                                                                    
१९७२ सालीं,५ जून ते  १६ जून या दरम्यान स्वीडनची राजधानी स्टॉकहोम(stockholm )इथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत ११३ (113 )देशांनी पर्यावरणाच्या संरक्षणार्थ, संवर्धनार्थ २६ principles -सव्वीस सूत्रांचा पुरस्कार केला.दर वर्षी ५ जून रोजी विश्व पर्यावरण दिवस साजरा करण्याचा निर्णयही याच बैठकीत झाला. वस्तुत:प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिवस आहे.

आपले सगळे दैनंदिन व्यवहार पर्यावरणाला अनुकूल किंवा प्रतिकूल आकार देत असतात.किंबहुना आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक भाग हा पर्यावरणाला समर्पित आहे,म्हटलं तर वावगं ठरू नये.असं असताना आपण जाणीवपूर्वक पर्यावरण रक्षणाविषयी किती विचार करतो,हा चिंतनाचा विषय आहे.मुळात पर्यावरणशास्त्राची व्याप्ती बघा केवढी मोठी आहे.अगदी भौतिकशास्त्र,जीवशास्त्र,रसायनशास्त्र, भूगोल, खगोलशास्त्र,एवढंच काय, कला,वाणिज्य अशा सगळ्या शाखा,सगळे सजीव आणि निर्जीव घटक पर्यावरणाच्या छत्राखाली येतात. मात्र पोल्युशन,कार्बन फूटप्रिंट्स,ग्लोबल वार्मिंग,ग्रीन हाउस gas एमिशन्स वगैरे भलेथोरले शब्द ऐकूनच बावचळून जाऊन अनेक व्यक्ती पर्यावरण हा आपला प्रांत नव्हे,असा समज करून घेतात.त्या शब्दांच्या पसाऱ्यात भांबावून नं जाता  आपली जीवनशैली पर्यावरणाला पूरक आहे की मारक आहे,एवढं चिंतन जरी प्रत्येकानं केलं नी ती  काही अंशी सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येकानं केला तरी पुष्कळ काही साध्य होईल.

"ही पृथ्वी,ही जमीन,ही हवा,हे पाणी,हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला वारसा म्हणून दिलेले नाही;तर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीकडून मिळालेले ते ऋण आहे;त्यामुळे आपल्याला ज्या स्थितीत हे सारं मिळालं; किमान त्या स्थितीत ते पुढच्या पिढीच्या सुपूर्द करायचं आहे."गांधीजींच्या या वचनाची जाणीवही आपल्याला सतत व्हायला हवी."The earth does not belong to man;man belongs to the earth;"असं अमेरिकेतल्या सिएटलच्या रेड इंडियन आदिवासी जमातीच्या प्रमुखानं  अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखाला सन1800 च्या सुमारास लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखानं त्यांची जमीन विकत घेण्याबद्दल त्याला पत्र लिहिलं होतं,त्याला उत्तर देताना त्यानं पुढे म्हटलं होतं,"कुणी आकाश किंवा जमीन कसं काय खरेदी करू शकतं किंवा विकू शकतं? ही पृथ्वी आमची माता आहे.तिच्यावर काही आपत्ती येणं म्हणजेच तिच्या मुलांवरही आपत्ती येणं! या नद्या आम्हाला बंधुतुल्य आहेत..."दोनशे वर्षांपूर्वीचं त्याचं ते सबंध विवेचन आजही तितकंच यथार्थ आहे.  त्याला तेव्हा जे कळलं,ते आज इतकी प्रगती होऊनही मनुष्याला उमगत नाहीये,ही खरी शोकांतिका आहे.
वायूप्रदूषण,पाण्याचे प्रदूषण,ध्वनी प्रदूषण,यांबरोबरच आजच्या घडीला पर्यावरण ऱ्हासासाठी "प्रॉब्लेम ऑफ  प्लेन्टी " सुद्धा तितकाच जबाबदार आहे.कसा तो बघा;आपल्या घरात दोन मुले असतात नी वीस मुलांना पुरतील, एवढे कपडे असतात.आज जवळ जवळ प्रत्येक मध्यमवर्गीय घरात,कपाटात मावणार नाहीत,एवढ्या साड्या असतात. प्रत्येक कार्य-प्रसंगाच्या वेळी ठेवायला जागा पुरत नसते,तरीही भेटवस्तू,साड्या ह्यांचे ढीग अहेर म्हणून येतात आणि कहर म्हणजे कुठल्या लग्नाला वगैरे जायचं असेल,तेव्हा तिथे घालण्यासाठी साजेशी साडीच आपल्याजवळ नसल्याचा साक्षात्कार बहुतेक वेळा बहुतेकींना होतो.कुणे एके काळी दोन घरातले नी दोन बाहेरचे आणि काहीच ठेवणीतले कपडे असायचे.लहान भावंडे मोठ्या भावंडांची दप्तरे,शालेय पुस्तके आणि इतर सामग्री वापरत.(अर्थात हा सगळा जमाना आमच्या आधीच्या पिढीचा होता.)पूर्वी दिवाळी वर्षातून एकदा यायची,आज वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस दिवाळी असते.कुठल्या वस्तूची गरज इतकीशी असली तरी -अन गरज नसली,तरीही ती कृत्रिमरीत्या निर्माण करून,ती पुरवायला हजार पर्याय उपलब्ध आहेत,वस्तू इवलीशी असली तरी तिचे वेष्टन भले थोरले...बहुतांश वेळा एखाद्या वस्तूचा पुरेसा वापर करून व्हायच्या आत ती टाकून देऊन तीच वस्तू नव्यानं  आणली जाते.लग्नाबिग्नांच्या पार्ट्यांत किंवा इतर पार्ट्यांत वाया जाणारे अन्न बघून, ह्या देशात दारिद्र्यरेषेखाली  असणारे किंवा ज्यांना दोन वेळचे अन्न मिळत नाही असेही लोक आहेत,ह्यावर विश्वास बसणार नाही.ह्यांतली कुठलीही गोष्ट आकाशातून तर टपकलेली नाही.ती निर्माण करायला साधनसामुग्री,मनुष्यबळ,उर्जा सगळं लागलेलं असताना तिचा पुरेसा वापर नं करताच जर ती टाकून दिली तर त्यासाठी लागलेला पैसा, सामुग्री, मनुष्यबळ,उर्जा तर वाया जातंच,पण त्याच नव्या वस्तूच्या निर्मितीसाठी -मागणी अधिक म्हणून  पुरवठा पण अधिक होऊन पर्यावरणावर अतिरिक्त ताण येतो.त्याची किंमत नंतर आपल्याला वा आपल्या नंतरच्या पिढ्यांना वेगळ्या प्रकारानं चुकती करावी लागेल,हे आपल्या मनातही येत नाही." 'Earth provides enough to satisfy every man's needs, but not every man's greed." असं गांधीजींनी अगदी समर्पक शब्दांत सांगितलं होतं. 

"अहिंसा,सत्य,अस्तेय,ब्रम्ह्चर्य,अपरिग्रह"या यम-नियमाला विसरून,पाश्चात्य जीवनशैलीला आपलेसे करून आपण आता कसे एकदम मॉडर्न झालो म्हणून स्वत:वरच खूष होतो आहोत.त्यांची 'यूज अ‍ॅन्ड थ्रो '-वापरा आणि फेका संस्कृती आपण चटकन आत्मसात केली.गेल्यावर्षी अमेरिकेतल्या आमच्या महिनाभरातल्या वास्तव्यात ठायी-ठायी त्यांचा ओव्हर कन्झ्युमेरीझम,पेपर प्लेट्स नी ग्लासेस,पेपर napkins यांचा नको इतका वापर प्रत्ययाला येत होता.(मात्र इतका कचरा निर्माण करूनही तो सगळा व्यवस्थित dustbims ,कचरा कुंडीत टाकलेला.इवला कागदाचा कपटा देखील अन्यत्र पडलेला नाही,मुलखाच्या स्वच्छतेबद्दल,नियम नं तोडण्याबद्दल    तर त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं!तेवढं आपण बरं नाही आचरणात आणलं!आपल्याकडे लोकांच्या सवयी ही घाणेरडया! आपल्या कुठल्याही शहरात,होय,इथे दिल्लीत तर खूपच- कित्येक असंस्कृत लोक भरधाव वेगानं, बेगुमानपणे गाड़ी चालवतानासुद्धा,मध्येच दार उघडून पचकन रस्त्यांवर थुंकताना दिसतात.बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढून राजरोसपणे थुंकणारेही आहेत.कचरा कुठेही फेकावा हा अनेकांचा जणू जन्मसिद्ध हक्क असे ते वागतात. असो!) म्हणजे आधी तो भला थोरला कचरा-पक्षी पेपर प्लेट्स नी ग्लासेस,पेपर napkins वगैरे वस्तू-  निर्माण करायचा.त्यासाठी साधन सामुग्री,उर्जा वगैरे खर्ची घालायचं,लोकांनी त्या वस्तू पैसे खर्च करून विकत घ्यायच्या नी वापरून लगेच फेकून तो कचरा निर्माण करायचा आणि मग त्या कचऱ्याचं निर्मूलन करण्यासाठी, विल्हेवाट लावण्यासाठी करण्यासाठी पुन्हा साधन सामुग्री,उर्जा वगैरे खर्ची घालायचं.(आणि सशक्त अर्थव्यवस्थेच्या फुशारक्या मारायच्या!अमेरिकेत ट्वीन टॉवर वरच्या हल्ल्यानंतर लोक भीतीपोटी बाहेर पडेनासे झाले होते,वस्तू विकत घ्यायला,शॉपिंगसाठी  बाहेर पडत नव्हते,तेव्हा त्यांचे राष्ट्राध्यक्ष त्यांना मनात भीती 
बाळगू नका,बाहेर पडा,बाजारहाट करा,नाहीतर आपली इकॉनॉमी-अर्थव्यवस्था  कशी चालेल असं सांगत होते.) 

भल्या थोरल्या लोकसंख्येची भली थोरली बाजारपेठ म्हणून,ओव्हर कन्झ्युमेरीझमसाठी आता आपल्याला भलेही उद्युक्त केलं जात असलं तरी अमेरिकेसारखा ओव्हर कन्झ्युमेरीझम आपल्याला मुळीच परवडण्यासारखा नाही.अमेरिकेसारख्या प्रगत देशांच्या तुलनेत आपला उर्जेचा प्रतिमाणशी वापर भलेही कमी असेल.पण जो आहे तो निरर्थक गोष्टींसाठी व्हायला नको.जरा विचार करून पहा,आपली काही वर्षांपूर्वीची जीवनशैली काय टाकावू होती?आता मला वाटतं,अगदी लहानलहान मुलं सुद्धा पाटी-पेन्सिल वापरत  नसतील.खरं तर एवढ्या लहान मुलांना वह्यांची गरजच काय?यूज अ‍ॅन्ड थ्रो हवं तर थर्माकोलच्या वा पेपर प्लेट्स ना मजबूत पत्रावळीचा पर्याय अधिक पर्यावरण-स्नेही  नाही का?बुद्ध हा तर आद्य पर्यावरणवादी म्हणायला हवा.त्यानं यूज अ‍ॅन्ड थ्रो ऐवजी यूज अ‍ॅन्ड री-यूज ही संकल्पना तेव्हा दिली,आपल्या शिष्यांनी अंगावरची वस्त्रे जीर्ण झाल्यावर,त्यांचा अनेकवार वापर करून झाल्यावर त्यांची वात करून दिव्यात वापरण्याबद्दल त्याने सांगितले होते.

थोडक्यात, अनेक बाबतींत तर हा "प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी" टाळणं सर्वस्वी आपल्या हातात आहे.अजूनही वेळ गेलेली  नाही.पर्यावरणाच्या ऱ्हासाचा प्रश्न अधिक उग्र होऊन मानवाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होण्यापेक्षा आपल्या अति-चंगळवादाला मुरड घालणं केव्हाही अधिक श्रेयस्कर  ठरणार  नाही का?

Thursday, May 17, 2012


तो आला...त्यानं पाहिलं...त्यानं जिंकलं.
                                     
                                                                             -रश्मी घटवाई 

चित्रपट समजायला भाषेचे अडसर नसतात,ते किती खरं आहे,हे अनेक अमराठी प्रेक्षकांनी  दिल्लीमध्ये २०११ सालच्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात,पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटांना हजेरी लावून आणि त्या चित्रपटांचं रसास्वादन करून सिद्ध केलं.
दिल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी  २०११ सालचा राष्ट्रीय चित्रपट महोत्सव-National Film Festival झाला होता. भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधीनस्थ  डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल्सनं  आयोजित केलेल्या या चित्रपट महोत्सवात  २०१० चे पुरस्कारप्राप्त चित्रपट दाखवण्यात आले होते.२०१० सालच्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणाही मे महिन्यात करण्यात आली होती.या महोत्सवात जे पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट  दाखवण्यात आले,त्यातले दोन मराठी चित्रपट अमराठी व्यक्तींनी दिग्दर्शित केले होते आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मराठी चित्रपटांना अमराठी प्रेक्षक बहुसंख्येनं उपस्थित होते. 

चित्रपट हा माझा प्रांत नाही.पण मराठी चित्रपट एरवी दिल्लीत बघायला मिळत नाहीत म्हणून मग मी तिथे गेले होते.राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवले जाणारे चित्रपटही हृदयाला भिडणाऱ्या आणि विचारमंथनाला प्रवृत्त करणाऱ्या विषयाभोवती केंद्रित असल्यामुळे तिथल्या सुजाण,दर्दी प्रेक्षकांनी चित्रपट संपताच घरची वाट धरली नाही,तर उलट आपसात चर्चा केली,आपापल्या परीनं चित्रपटाची समीक्षा केली,"बाबू बॅंड बाजा " ह्या चित्रपटानंतर तर अनेक प्रेक्षकांनी आपापले अनुभव सांगत,त्यातल्या व्यक्तिरेखांमध्ये नी प्रसंगांमध्ये आपल्या जीवनातल्या व्यक्तींशी नी प्रसंगांशी साम्य शोधत,आवर्जून उपस्थित असलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांशी जाहीर संवाद साधला.तो इतका हृद्य होता की त्याचं रसास्वादन दूरस्थ वाचकांना घडावं,म्हणून हा लेख प्रपंच.
  
जग्गू ह्या बॅंड पार्टीच्या मालकाला परिस्थितीपायी आपला बॅंड नी इतर वाद्ये गहाण टाकावी लागली आहेत,हाती हलगी धरावी लागली आहे.गावात  जन्म-मृत्यू घडल्यावर हलगी वाजवून कसाबसा आपला उदरनिर्वाह करण्यात त्याचं मन रमत नाहीये.त्याला आस लागलीय,ती आपली ती वाद्ये सोडवून पुन्हा एकदा  दमदार बॅंड पार्टी स्थापन करायची.तिचं नावही त्यानं ठरवून ठेवलंय- बाबू बॅंड बाजा ! बाबू ह्या आपल्या लेकानं शिक्षणाच्या मागे जाण्याऐवजी आपल्याबरोबर खुळखुळा वाजवावा नी चार पैसे मिळवायला लागावे असा त्याचा आग्रह आहे,तर त्याच्या बायकोला-शिरमीला- बाबूनं खूप शिकावं अशी तळमळ लागलीय.ती लेकाच्या शिक्षणासाठी यथाशक्ती तजवीज करण्यासाठी जिवाचं रान करतेय,पडतील ते कष्ट झेलतेय.जणू लेकाच्या रूपानं तिची अतृप्त राहिलेली शिकायची इच्छा ती पुरी करतेय.मात्र गरीब असले तरी ते लाचार नाहीयेत.गरीबीतही माणुसकी जपत,जे काही हाती आहे त्या बळावर नाकाच्या सरळ रेषेत चालत,इतरांच्या लेखी नगण्य असू शकेल इतकं अतिसामान्य आयुष्य ते सारे जगताहेत.त्या अतिसामान्य जीवनातला त्यांचा तो संघर्ष नी परिस्थितीशी जुळवून घेत केलेली वाटचाल मात्र मुळीच क्षुद्र नाहीये.मुळात जग्गूचं नी त्याच्या कुटुंबाचं विश्व ते केवढं !परीघ तो केवढा!पण संकटांची छोटी-छोटी वर्तूळं त्यांच्याभोवती सदोदित मोठं रिंगण धरतात. जग्गूच्या नी त्या सर्वांच्या आयुष्याच्या इवल्या-इवल्याश्या डोहांत अडचणींचे अनंत छोटे छोटे भोवरे कमालीची उलथापालथ घडवतात.पुढे जे जे घडत जातं,ते सारं बघताना प्रेक्षक कमालीचा सुन्न होतो.बॅंड किंवा हलगी वाजवणारा, त्याचं कुटुंब ह्या साऱ्या व्यक्तिरेखा तशा प्रातिनिधिक.त्यांच्या माध्यमातून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतल्या- कुठलंही अन्य छोटं-मोठं काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या अतिसामान्य व्यक्तीसमूहाच्या असामान्य जीवनसंघर्षाचं आणि भावविश्वाचं  अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण 'बाबू बॅंड बाजा' या चित्रपटात घडलंय. बँड वाजवण्याचं काम पारंपारिकपणे ज्या समाजात केलं जातं,त्याचं जातीनिहाय चित्रण-एवढच काय-उल्लेख ही नं करता हा व्यक्तिनिहाय जीवनसंघर्ष चित्रपटाला आगळं-वेगळं परिमाण देतो,माणूस म्हणून त्या बँडवाल्याकडे बघण्याचं,त्याचं जीवन जवळून बघण्याचं परिप्रेक्ष्य (perspective )देतो.चित्रपटात घडणाऱ्या सगळ्या घटना इतक्या परिचयाच्या आणि अवतीभवती सहज घडणाऱ्या असतात,की त्या सगळ्याचा आपणही एक घटक होतो.चित्रपट आणि प्रेक्षक ह्या दोन वेगळ्या वेगळ्या entities च उरत नाहीत.तो  द्वैतभाव नष्ट होतो नी दोन्ही एकाकार होतात.   
 
चित्रपट संपल्यावर दिग्दर्शक आणि प्रेक्षक यांच्यांतल्या जाहीर संवादात भाग घेताना प्रेक्षकांतला एक युवक सांगू लागला- त्याचं आयुष्य मुंबईतल्या लोखंडवाला या उच्चभ्रूंच्या वस्तीत गेलं, तरीही बाबूच्या व्यक्तिरेखेत त्याला स्वत: तो कुठेतरी दिसला.एवढ्यातच तो दिल्लीतल्या मेडिकल कॉलेजमधून पदवीधर झाला,(हेसुद्धा त्यानं कमालीच्या विनयानं सांगितलं.)आपल्याजवळ असलेलं  हे backpack हे आयुष्यात पहिल्यांदाच नवंकोरं मिळालंय,तेही आत्ता मिळालेल्या स्टायपेंडच्या पैशातून विकत घेतलंय.अन्यथा आतापावेतो सगळ्या गोष्टी इतरांनी वापर्लेल्याच वापरलेल्या आहेत.त्यामुळे बाबूशी तो चटकन 'कनेक्ट'झाला असल्याचं त्यानं सांगितलं. इतर अनेक प्रेक्षकांचं  मनोगतसुद्धा भावपूर्ण होतं.चित्रपट समजायला भाषेची अडचण येत नाही असं एकजात साऱ्या अमराठी प्रेक्षकांनी सांगितलं.चित्रपट हा स्वत:च भाषा होतो! 

मुळात हे सगळं इतकं तरलपणे नी प्रभावीपणे मांडणारे दिग्दर्शक राजेश पिंजानी हे सिंधी आहेत.त्यातून 'बाबू बँड बाजा' हा त्यांचा पहिलाच चित्रपट.त्यांच्या चित्रपट पदार्पणाला राष्ट्रीय पुरस्कार(Best Debut Film) , सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- Best Actress आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार- Best Child Artist  असे तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत.त्यांतून प्रेक्षकांशी संवाद साधताना त्यांच्यातला विनम्रपणा,सुसंस्कृतपणा दृगोचर होत होता-तो असा मारून मुटकून वा कृत्रिमपणे आणता येत नाही.शिवाय काय,की अवघ्या एकदोन वाक्यांच्या संभाषणावरून समोरची व्यक्ती अंतर्बाह्य कळते.त्याची प्रगल्भता,बहुश्रुतता,परिपक्वता,आचार-विचारांची खोली,जीवनातल्या मूल्यांकडे त्याचा बघण्याचा दृष्टीकोन सारं सारं त्याच्याही नकळत ठसठशीतपणे समोर येतं.जाहीर संवादानंतर मी त्यांच्याशी ऐसपैस संवाद साधला. 
"मी नागपूरजवळच्या कामठीचा.आता तीन वर्षांपूर्वी मी पुण्याला आलो असलो तरी माझं कुटुंब नागपूरलाच आहे. तीन भाऊ आणि चार बहिणी अशा सिंधी परिवारातला मी आहे.मी एवढ्यात मराठी शिकलो."राजेश पिंजानी सांगतात, "नागपूरला मी जरी लोकल टीव्ही साठी जाहिराती करत असलो,तरी चित्रपटाशी माझा दूरान्वयेही संबंध नव्हता.चित्रपटाशी संबंधित शिक्षण वा प्रशिक्षणही मी घेतलं नाहीये.किंबहुना 'स्टोरी टेलिंग' ही मी कधी केलेलं नाहीये.हा चित्रपट मी करीत असताना माझा स्वत:चाच ह्यावर विश्वास बसत नव्हता की आपण  चित्रपट करतोय!" ते गजानन महाराजांचे भक्त आहेत,त्यांच्या निर्मितीसंस्थेचं नाव जय गजानन productions  आहे.हा चित्रपट मराठीतच का करावासा वाटला,ह्यावर ते सांगतात,की हा चित्रपट केवळ मराठीतच होऊ शकेल, अन्य कुठल्याही भाषेत नाही,कारण त्या कथेचा परिवेश नी पार्श्वभूमी वैदर्भीय आहे, घटनांचे संदर्भ वैदर्भीय आहेत.ती कथा ह्या पद्धतीने केवळ मराठीतूनच सांगितली जाऊ शकते.

चित्रपटात वैदर्भीय ग्रामीण बोलीभाषा व्यक्तिरेखेचा भाग बनून आलीय.आणि एक! मराठी चित्रपटानं तमाशापटाचा मुखवटा उतरवला,जिभेवर विसावलेल्या केवळ ग्रामीण कोल्हापुरी बोलीभाषेला अंमळ उतरवून इतर बोलीभाषाही आत्मसात केल्या,म्हणू नये,पण हिणकस मानून महाराष्ट्रात जिची कायम खिल्ली उडवली जाते,ती वैदर्भीय ग्रामीण बोलीभाषाही ह्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या तीन मराठी चित्रपटांतून त्यांतल्या संवादातून कानी आली, हेही नसे थोडके !

" पुण्यालगत,भोरलगतच्या एका गावात सलग २०-२५ दिवस ह्या चित्रपटाचं शूटिंग झालं.आमचं सगळं युनिट एखाद्या मोठ्या कुटुंबासारखं होतं,अगदी घरच्यासारखं वातावरण होतं.सगळे कलाकार प्रोफेशनल होते.अगदी आमच्या स्पॉटबॉयनं सुद्धा सहा चित्रपट केलेले होते.मीच काय तो नवखा होतो." राजेश पिंजानी चित्रपट करताना आलेले अनुभव सांगतात.

ही काल्पनिक गोष्ट असूनही खरीखुरी असल्याचा प्रत्यय प्रेक्षकांना येतो,ते त्यामागे त्यांचे परिश्रम आहेत,म्हणून. दीड-दोन वर्षे त्यांनी बँडवाल्याचं जीवन  जवळून अभ्यासलं,हे नंतर जग्गू साकारणाऱ्या मिलिंद शिंदे यांच्याशी फोनवर नोएडाहून फोनवर विस्तृत बातचीत केली,तेव्हा कळलं.

मिलिंद शिंदे यांनी जग्गू जिवंत केलाय.त्यांनी अभिनय केलेला नाहीच,तर ती भूमिका ते जगलेत. "मी मूळचा अहमदनगरचा!दिल्लीत राष्ट्रीय नाट्य विद्यालयात १९९५ ते १९९८ मध्ये मी तीन वर्षांचा अभिनयाचा कोर्स केला, नंतर पुण्याला एक वर्ष  फिल्म इनस्टीट्यूट मध्ये कोर्स केलं.त्यानंतर मी व्यावसायिक नाटकांकडे वळलो."ती फुलराणी" मध्ये वडिलांची भूमिका केली. त्या पहिल्याच भूमिकेसाठी मला पुरस्कार मिळाला.त्यामुळे माझी एक ओळख निर्माण झाली.सुदैवानं मला कधी माझा पोर्टफोलियो अथवा फोटो घेऊन फिरावं लागलं नाही.माझी ती भूमिका गजेंद्र अहिरे यांनी पहिली होती. त्यांनी मला म्हटलं,जेव्हा केव्हा मी सिनेमा करीन,त्यात तुझी भूमिका असेल.ती फुलराणी नंतर तीन वर्षांनी मी त्यांचा " नॉट ओन्ली मिसेस राऊत" हा सिनेमा केला.पुढे अग्निहोत्र, लक्ष्मणरेखा वगैरे सिरियल्स केल्या. "नटरंग" मध्ये खलनायक साकारला.पिंजानी यांनी जेव्हा ह्या सिनेमासाठी फोन केला,तेव्हा मी काही त्यांना गंभीरपणे घेतलंच नाही.लोक सिनेमासाठी विचारणा करणारे फोन करत असतात,ते पुढे जातातच असं नाही.त्यामुळे मी त्या फोनचा गंभीरपणे विचार केलाच नाही.मात्र त्यांनी म्हटलंच आहे,तर भेटू,असा विचार करून मी नगरहून मुंबईला गेलो.त्यांनी narration उत्तम दिलं.आमची केमेस्ट्री जुळली. दोन वर्षे त्यांनी परभणीला बँडवाल्यांचा बारकाईनं अभ्यास केला.मात्र पिंजानी यांनी चित्रपटात जातीय रंग येऊ दिला नाही.मीही त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केला.बँड वाजवताना तो पाय कसा वाकडा करतो, हलगी कशी वाजवतो...मी हलगी घेतली,वैदर्भीय बोलीची कॅसेट ऐकून ऐकून ती बोलीभाषा आत्मसात केली.तुमचा अनुभव,निरीक्षण या सगळ्या आधीच्या गोष्टींचा परिपाक आणि अभ्यास असा दोन्हींचा समन्वय व्यक्तिरेखा रंगवताना  साधला जातो.स्क्रिप्ट आपलंसं केलं,की आपोआप व्यक्तिरेखा जिवंत होते. हा अभिनेता अमुक एका व्यक्तिरेखेचा अभिनय करतोय असं प्रेक्षकांना जाणवता कामा नये,ते प्रयत्न दिसता कामा नयेत.तो अभिनय सहज घडला पाहिजे. म्हणजे कसं,प्रेक्षकांना रंगमंचावरचं नेपथ्य दिसतं, backstage च्या बांधलेल्या दोऱ्या,फळ्या असल्या त्यामागच्या गोष्टी दिसत नाहीत.तसंच अभिनय जाणवला पाहिजे, त्यामागचं तंत्र नाही,असं मला वाटतं, म्हणजे कसंय पहा-माधुरी  सहज नाचते,पण ऐश्वर्या म्हणते -पहा,मलाही तसंच छान नाचता येतं.माधुरी सहजपणे नाचते,ऐश्वर्याला प्रयत्न करावा लागतो. हा प्रयत्न,effort दिसला की अभिनय natural ,सहज घडलेला वाटत नाही." मिलिंद शिंदे त्यातला तपशील उलगडून सांगतात.ते आता स्वत:एक चित्रपट दिग्दर्शित करताहेत,पण त्यात कुठेही  कमर्शियल angle  नाही,व्यावसायिक नफ्या-तोट्याचा दृष्टीकोन नाही, असं ते सांगतात.
"पुणे फेस्टिवलमध्ये ह्या चित्रपटाचा शो होता,त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो. खेळ संपल्यानंतर प्रेक्षकांनी मला गराडा घातला.त्यात वयस्कर मंडळीही होती. साठ वर्षाचे प्रेक्षक मोठ्या आत्मीयतेनं माझ्या गालावरून हात फिरवत होते. त्यांचं म्हणणं असं,की मिलिंद शिंदे आहेत,तेव्हा त्यांची भूमिका,अभिनय चांगला असणारच. त्यांच्या अपेक्षांमुळे माझ्यावरची जबाबदारी वाढते.जग्गूनं त्यांच्या हृदयात स्थान मिळवलं,मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो,याचा मला अतिशय आनंद आहे,"मिलिंद शिंदे प्रेक्षकांबद्दलच्या कृतज्ञतेनं नी आपुलकीनं त्यांच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय प्रसंग सांगतात.

अगदी असाच अनुभव बाबू बँड बाजा चित्रपटात शिरमी साकारणाऱ्या नी त्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेल्या मिताली जगताप- वराडकर हिलाही आला.मिताली शिरमीची व्यक्तिरेखा जगलीय.मितालीशी नोएडाहून दूरध्वनीवर विस्तृत बातचीत केली,तेव्हा ती भरभरून ह्या अनुभवाबद्दल सांगू लागली. 
"हा चित्रपट हाच मुळी माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.पुणे फेस्टिवलमध्ये ह्या चित्रपटाचा शो होता,त्यावेळी मी तिथे उपस्थित होते.चित्रपट संपल्यावर हजारेक प्रेक्षक जवळ आले.प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते.एक पंच्याऐंशी वर्षांचे कोट्याधीश डॉक्टर आले.ते माझ्या खांद्यावर डोके ठेवून ढसाढसा रडत होते.ते म्हणाले,माझ्या आईनं माझ्यासाठी जे कष्ट घेतलेत ते मला आठवले. सर्वच प्रेक्षकांनी मोठ्या आत्मीयतेनं माझ्याजवळ येऊन सांगितलं की माझ्यामुळे  त्यांना आज त्यांची आई आठवली.त्या सगळ्यांचे हे उद्गार,त्यांच्या डोळ्यातले ते अश्रू नी प्रेक्षकांनी केलेलं कौतुक हे माझ्यासाठी कुठल्याही पुरस्काराहून अधिक मोलाचे आहेत."मिताली सांगते." माझ्या आई -वडीलांची इच्छा होती की मी स्मिता पाटीलसारखं काम करावं.'स्मिता पाटीलसारखं काम कर बुवा!' असं ते सारखं म्हणत.कसंय पहा- स्मिता पाटील ही अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी पहिली मराठीभाषिक अभिनेत्री,पण तिला तो हिंदी चित्रपटासाठी मिळालाय.अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली मी पहिली मराठीभाषिक अभिनेत्री आहे,जिला मराठी चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालाय," मिताली अगदी सहजपणे सांगते.तिच्या आवाजात कुठे गर्वाचा लवलेश नसतो."अर्थात स्मिता पाटील हे खूप उत्तुंग व्यक्तिमत्व होतं.थोडीशी का होईना,तिच्या कुठेतरी जवळपास मी जाऊ शकले,याचा मला आनंद आहे." 

 "मी औरंगाबादची आहे.माझे वडील साहित्यिक आहेत,समाजकार्य करणारे आहेत आणि आई शिक्षिका आहे.चित्रपटाची कुठली पार्श्वभूमी नव्हती.आईला मात्र कलेची खूप आवड होती.मुलगी व्हावी,तिला आपण शास्त्रीय नृत्य शिकवावं हे आईचं स्वप्न माझ्या रूपानं पूर्ण झालं.मी बारा वर्षं भरतनाट्यम शिकले.त्यात नृत्याबरोबर अभिनयसुद्धा आहे.हे मला आवडू लागलं,परदेशांत डान्स फेस्टिवल्सना गेले.औरंगाबादमध्ये नाटकांत अभिनय केला,त्यात 
बक्षिसं मिळाली.मात्र दरवर्षी पुढे तेच तेच घडत होतं,मुंबईशिवाय पर्याय नव्हता.खरं तर दिल्लीत NSD -राष्ट्रीय नाट्य विद्यालयात जाण्याचं माझं स्वप्न होतं,पण दिल्ली आवाक्याबाहेर होती.औरंगाबादहून मुंबई जवळ होती. पहिल्यांदा मुंबईत आले,वडिलांनी एके ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून मला जागा शोधून दिली.मात्र आई वडिलांवर आपला आर्थिक बोजा टाकायचा नाही,त्यांना त्रास होऊ द्यायचा नाही असं मी ठरवलं होतं.मुळात मुंबईचं राहणीमान,तिथला चकचकाट,तिथला प्रोफेशनल approach  ह्या सगळ्याशी जुळवून घ्यायलाच मला दीड एक वर्ष  लागलं.कुणाची ओळख नाही,रस्ते माहीत नाहीत,पैसे नाहीत,अशा परिस्थितीत वडापावावर,प्रसंगी उपाशी राहून मी स्ट्रगल केला. मात्र त्या आर्थिक संकटातून खूप शिकायला मिळालं.उपाशी राहिले;त्यामुळे यशाची चव चांगली चाखता आली .मुंबईत पुढे नाटकांत अभिनय केला,हिंदी सिरियल्समधून सुरुवात केली.पण तो कारखाना होता,ते एकसाची काम करण्यात मला स्वारस्य नव्हतं. मग मी मराठीत आले.२-३ वर्ष काम केलं.  सिरियल्स,दोन-तीन चित्रपट केले.कॅमेरामन संदीप वराडकर यांच्याशी दरम्यान माझं लग्न झालं.मुलगी झाली.तेव्हा मात्र मी ब्रेक घेतला.मी माझ्या आई-वडिलांना सोडून दूर आले होते.आता मुलगी झाल्यावर तिला मी पूर्ण वेळ द्यायचं ठरवलं.नवव्या दिवसापासून मी माझ्या बाळाला आंघोळ घातली.आज माझी मुलगी चार वर्षांची आहे."मिताली सांगते. 

"बहुधा माझ्यातली हीच छटा पिंजानी यांना दिसली असावी.ते जेव्हा भूमिकेबाबत विचारणा करायला आले,तेव्हा ओवीशी- माझ्या मुलीशी माझी जी जवळीक आहे,ती त्यांना भावली.मातृत्वाचा,मायेचा हा पदर त्यांना शिरमीच्या भूमिकेसाठी अभिप्रेत होता,तो त्यांना गवसला.ही भूमिका तूच करशील,असं त्यांनी सांगितलं.मला आश्चर्य वाटलं, कारण मुलीकडे लक्ष देण्यासाठी मी जवळ जवळ २-३ वर्षे ब्रेक घेतला होता.मात्र मला माझ्या नणंदेचा खूप मोठा आधार होता.तिनंच मला ब्रेकनंतर काम करायला प्रोत्साहन दिलं.लेकीला सांभाळलं. तिच्यामुळे मी निर्धास्त होऊन चित्रपट केला.शिरमीचं तिच्या मुलाशी असलेलं जीवाभावाचं नातं हे आतून आलं.मुळात जमिनीशी माझं नातं आहे.वडील मला चपला काढून काळ्या ढेकळावरून चालायला लावायचे.मात्र भूमिकेसाठी मी अभ्यास केला नाही.भरतनाट्यममध्ये,परात डान्स मध्ये balance -तोल सांभाळायची सवय होती.मात्र डोक्यावर टोपली घेऊन चालायचा सराव वगैरे केला नाही.प्रसंगानुसार चुंबळ वेगवेगळी तसंच प्रसंगानुसार टोपलीतली भांडी नी कपडे कमी-अधिक असल्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं तोल सांभाळायचा असायचा.ते सर्व तिथल्या तिथे उत्स्फूर्तपणे घडत गेलं.सगळी दृश्यही कुठल्याही रिटेकविना चित्रित झालीत.सबंध चित्रपटाच्या चित्रीकरणात मोजून एक वा दोन रिटेक झाले असतील.सबंध चित्रपटात, लेकाला कागदांची वही शिवून देतानाचा प्रसंग अभिनयाच्या दृष्टीकोनातून माझ्यालेखी खूप भावस्पर्शी होता.दिग्दर्शकांनी 'कट 'म्हटल्यावर मी पाहिलं तर सगळे रडत होते.प्रत्येकाला आपली आई आठवत होती."मिताली सांगते.

एकूणच,राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो आला,त्यानं पाहिलं,त्यानं जिंकलं,असं "बाबू  बँड बाजा" चित्रपटाच्या बाबतीत झालं होतं.आता पुन्हा एकवार त्यानं कोल्हापूरला झालेल्या थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात, मराठी सिनेमाच्या कॅटेगरीत सर्वोत्कृष्ट फिल्म,सर्वोत्कृष्ट डायरेक्टर,र्वोत्कृष्ट अभिनेता,सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार यासाठीचे एकूण पाच पुरस्कार मिळवून ते सिद्ध केलं.
    
चित्रपटाला भाषेचे अडसर नसतात,कुठल्याही भाषेतला चांगला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो,असं अमराठी प्रेक्षकांनी सांगितल्यामुळे त्याचा प्रत्यय घेण्यासाठी आणि आडुकलम(Adukalam )ह्या तमिळ चित्रपटाला दिग्दर्शन,अभिनेता, पटकथा,संकलन,कोरिओग्राफी ह्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत,तेव्हा तो नक्की बघा,इथे पाय ठेवायला जागा नसेल,एवढी गर्दी असेल असे लोकांच्या  आग्रहपूर्वक सांगण्यावरून तमिळ कळत नसताना आडुकलम हा तमिळ चित्रपट बघायला गेले.कोंबड्यांच्या झुंजी हा तमिळनाडूच्या खेड्यातला लोकप्रिय क्रीडाप्रकार.त्यात प्रवीण असलेल्या आता वयस्कर झालेल्या पेट्टईकारन आणि पोलीस अधिकारी रत्नस्वामी ह्या प्रतिस्पर्ध्यांतल्या लढतीत करुप्पुमुळे पेट्टईचा विजय होतो.करुप्पू पेट्टईला गुरूस्थानी मानत असला तरी पेट्टईच्या मनात करुप्पुबद्दल आकस असतो.....तमिळ चित्रपटाच्या परंपरेला साजेसाच तो चित्रपट होता.करुप्पुचीभूमिका धनुष ह्या अभिनेत्यानं चांगलीच केली आहे.त्याचा इनोसन्स हा त्याचा प्राण आहे.हा धनुष म्हणजे वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा हा सुपरस्टार रजनीकांतचा जावई.आता त्यानं " व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी?"म्हणत काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतच्या तरुणाईला वेड लावलंय. पेट्टईची भूमिका जयबालन ह्या अभिनेत्यानं फारच प्रभावीपणे केलीये...(श्रेयनामावलीत कलानिधी मारन वगैरे नावे वाचली.)चित्रपट समजायला भाषेचे अडसर नसतात,ह्याचं प्रत्यंतर आलं.  
                            
---------------------------------------------------------------------------------------
रश्मी  घटवाई 
डी-१/७०१,
भारत पेट्रोलियम हाऊसिंग कॉम्प्लेक्स,
सेक्टर- ५६,नोएडा -२०१३०१
दूरध्वनी क्र:०१२०-२४९०१९०
मोबाईल:०९८७१२४९०४७