Sunday, May 4, 2014

"कोळसा … उगाळावा तितका काळाच !

-रश्मी घटवाई 

कडू कारलं,तुपात तळलं,साखरेत घोळलं;तरी कडू ते कडूच असतं!काँग्रेसचंही तसंच आहे.केंद्रात दहा वर्षे काँग्रेसप्रणित सरकारचं राज्य म्हटल्यावर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांशिवाय अधिक वेगळं घडणार तरी काय होतं म्हणा!काँग्रेसचे नेते -मग ते गल्ली-बोळातले असू देत अथवा दिल्लीतले, ह्या एका बाबतीत त्यांचं मतैक्य दिसतं.शिवाय चतुर काँग्रेसी नेते सगळ्या चांगल्या कामांचं श्रेय काम नं करता राहुल गांधींना द्यायला आणि अपयशाचं खापर डॉ.मनमोहन सिंह ह्यांच्यावर फोडायला आतुर-उत्सुक!
  
"If the Congress had lost,the blame for the defeat would have been placed squarely on the PM's shoulder....Now that the party was back in office,and that too with more numbers than anyone in the party had forecast,the credit would go to the party's 'first family.'To the scion and future leader.It was Rahul's victory,not Manmohan's." असं "द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर" ह्या आपल्या पुस्तकात संजय बारू ह्यांनी लिहिलं आहेच. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांबाबत आणि त्यातही 'कोल-ब्लॉक वाटपा'त झालेल्या घोटाळ्याबद्दल बारूंनी लिहिलंय ,"The scandal relating to the allocation of coal blocks during the period when Dr. Manmohan Singh handled the coal portfolio further tarnished the prime minister's image.Here too, he was charged,not with corruption,but with turning a blind eye to the corruption of others."

बारूंचं हे भाष्य ज्या सुरावर थांबलं,तोच सूर पकडून आणखी एका माजी  प्रशासकीय अधिकाऱ्यानं कोळसा घोटाळा नक्की काय आणि कसा झाला ह्यावर खूप विस्तृतपणे माहिती देणारं पुस्तक लिहिलं ."क्रूसेडर ऑर कॉन्स्पिरेटर ?कोलगेट अ‍ॅण्ड द अदर ट्रूथस" (CRUSADER OR CONSPIRATOR?COALGATE AND THE OTHER TRUTHS BY P.C.PARAKH) हे माजी सनदी अधिकारी पी सी पारख लिखित पुस्तक काँग्रेसच्या एकूण  अस्तित्वावरच पूर्णविराम देणारं ठरावं.( last nail in the coffin ह्या अर्थानं.) "द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर" आणि "क्रूसेडर ऑर कॉन्स्पिरेटर ?कोलगेट  अ‍ॅण्ड द अदर ट्रूथस" ही केंद्रातल्या काँग्रेसप्रणित सरकारच्या भ्रष्टाचाराचा लेखा-जोखा मांडणारी आवळी-जावळी दोन्ही पुस्तकं ऐन निवडणुकीच्या काळात महत्वाच्या टप्प्यावर आल्यावर लोकांना आधीच ठाऊक असलेलं काँग्रेसचं खरं स्वरूप आणि केंद्रातलं सत्ताकेंद्र ह्यावर शिक्का -मोर्तब झालं  'ह्या टोपीखाली दडलंय काय 'हे उघड करणारे दोन्ही पुस्तकांचे लेखक हैद्राबाद,आंध्र प्रदेशातले हाही एक योगायोग.आंध्र प्रदेश केडरचे सनदी अधिकारी  प्रकाशचंद्र पारख पुढे कोळसा मंत्रालयाचे सचिव झाले. 
        
दिसतं तसं नसतं,म्हणून तर जग फसतं. ते कसं;हे पी सी पारख ह्यांनी "क्रूसेडर ऑर कॉन्स्पिरेटर ?कोलगेट अ‍ॅण्ड  द अदर ट्रूथस" ह्या पुस्तकात सांगितलंय.
 
ममता बॅनर्जी ह्यांचा साधेपणा प्रथमदर्शनी लोकांना भावतो.पण त्याची दुसरी बाजूही ते दाखवतात: 
 "Ms Banerjee had commendable simplicity and there is no doubt about her personal integrity.But she was not immune to misuse of her office for her party's interests. " पारख ह्यांनी लिहिलं आहे.ममता बॅनर्जी ह्यांनी कोळसा मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारताच 'कोल इंडिया लिमिटेड" Coal India Limited(CIL)चे प्रभारी चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर(acting CMD ) ह्यांना पन्नासेक तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ,त्यांची कुठलीही परीक्षा वा इंटरव्ह्यू नं घेता, त्याबद्दलची कुठलीही जाहिरात नं प्रसिद्ध करता ,कुठलीही अधिकृत कार्यपद्धती नं अवलंबिता थेट पॉइन्टमेन्ट लेटर देऊन  'कोल इंडिया लिमिटेड" मध्ये नोकरीवर घेण्याची सक्ती केली. 
 "Soon after Ms Banerjee took charge of the ministry,she forced the acting CMD of Coal India Limited(CIL) to appoint 50 odd TMC workers as trainees....No procedure was followed in their selection:no advertisement,no tests and no interviews.A list of names was handed over to him and he was told to issue appointment orders...None of these persons attended training.They used to simply mark their attendance and attend to Ms Banerje's party work.There was already huge surplus and unproductive manpower in Coal India  which was being reduced through a voluntary retirement scheme.(VRS) The government had banned new appointments in Coal India.But the ban was relaxed to facilitate  recruitment of TMC workers.....she also pressurised the Coal India chairman to make large donations to several NGO's of her choice."अर्थात इतर कोळसा मंत्र्यांनीही आपापल्या काळात उण्याअधिक फरकानं हेच केलं म्हणून पारख लिहितात . सकृतदर्शनी निरुपद्रवी दिसणाऱ्या कोळसा मंत्री शिबू सोरेन ह्यांनी आणि त्यांचे राज्यमंत्री दासारी नारायण राव ह्या दोघांनी 'कोल इंडिया लिमिटेड"मध्ये २००४ साली चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्या पदावर नियुक्त होणारया अधिकाऱ्याकडून,एकरकमी ५० लाख रुपये आणि नंतर दर महिन्याला १० लाख रुपयांची अपेक्षा करत कसा छळवाद केला,ते पारख ह्यांनी पुस्तकात लिहिलंय.   
"...before he resigned as coal minister to take over as Chief minister of Jharkhand,he ordered that no further e-auction be conducted.A proposal to bring transparency in coal marketing was thus nipped in the bud"पारख पुढे लिहितात.

"भारताची अर्थव्यवस्था  सशक्त अर्थव्यवस्था म्हणून वाटचाल करते आहे आणि २०५० सालामध्ये ती जगातली प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून गणली जाईल ,असं अनेकाचं अनुमान आहे .त्यामुळे वाढत्या अर्थव्यवस्थेला ऊर्जेची वाढीव गरज भासते आहे. भारताच्या ऊर्जेची दोन तृतीयांश गरज कोळसा भागवतो.भविष्यकाळातसुद्धा भारतात कोळसा हेच ऊर्जेची गरज भागवण्याचं मुख्य साधन असणार आहे. भारतात कोळशाचे साठे विपुल आहेत आणि कोळशाचं खननसुद्धा विपुल प्रमाणात होतं.कोळशाच्या साठ्यांच्या आणि उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात अग्रक्रमी आहे.असे असले तरी कोळशाची टंचाई भेडसावते.मागणी-पुरवठ्याच्या व्यस्त प्रमाणामुळे कोळशाचा होणारा काळाबाजार आणि कोळसा माफिया हीच सर्वात मोठी समस्या आहे.वस्तुत: कोळसा हे खनिज भारताच्या जनतेच्या मालकीचं आहे,मात्र मूठभर धनदांडग्यांच्या मिरासदारीनं कोळशाळा आपल्या ताब्यात जखडून ठेवलं आहे. कोळसा माफियांनी बोगस कंपन्या स्थापन केल्या.त्यांना रीतसर कोळसा वाटप होऊन त्यांनी तो कोळसा काळ्याबाजारात विकला. वर्षानुवर्षे हे सगळं जराही वाच्यता नं  होता बिनबोभाटपणे सुरू होतं. मात्र  देशात कोळशाची भीषण टंचाई उद्भवली.औष्णिक विद्युत ऊर्जा निर्माण करणाऱ्या केंद्रांमध्ये कोळशाच्या साठ्यानं अतिगंभीर अशी खालची पातळी गाठल्यामुळे आणीबाणीची वेळ आली. कोळशाच्या उत्पादनासाठी,खननासाठी,कोल ब्लॉक्सच्या वाटपासाठी पारदर्शीपणे जाहीर लिलाव होणे आवश्यक होते. मात्र ज्या पद्धतीने खाजगी कंपन्यांना कोल ब्लॉक्सचे वाटप झाले,त्यात काळेबेरे असल्याचे निष्पन्न झाले.कोल ब्लॉक्सचे वाटप झाले,तेव्हा कोळसा मंत्रालयाचे खाते स्वत: पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह सांभाळत होते.शिबू सोरेन वेगवेगळ्या कारणांनी कोळसा मंत्र्याच्या पदावरून दूर होत होते.पण आघाडीच्या सरकारात त्यांचा झारखंड मुक्ती मोर्चा हा पक्षही सामील असल्यामुळे अपरिहार्यपणे हे सगळे विदुषकी चाळेपंतप्रधान सहन करीत होते. भ्रष्टाचार आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यामुळे त्यांनी जणु डोळे मिटून घेतले होते. भ्रष्टाचार आणि घोटाळयांकडे कानाडोळा करीत कमालीची स्थितप्रज्ञता त्यांनी अंगी बाणवून घेतली होती. 

"कॅग(The Comptroller and Auditor General of India)-CAG  नी हा घोटाळा उघडकीला आणला .कोल ब्लॉक्स वाटप अपारदर्शीपणे घडल्याचं आणि लिलावात  असलेल्या पारदर्शीपणाच्या अभावामुळे खाजगी कंपन्यांना  १.८६ लाख करोड (1.86 lakh crore) रुपयांचा फायदा झाला,असं कॅगच्या लक्षात आल्यावर एकच हलकल्लोळ माजला. कोल ब्लॉक्स वाटप प्रकरणातल्या घोटाळ्याला कोल-गेट असं संबोधलं जाऊ लागलं .ह्या सगळ्या कोलगेट प्रकरणाचं इंगित दडलं आहे,ते हा कोल ब्लॉक्सचा लिलाव खुल्या पद्धतीनं ,e -auction प्रकाराने नं झाल्यामुळे, e -auction पद्धत कोल ब्लॉक्स वाटपासाठी अंगिकारली जाऊ नये म्हणून आटापिटा करणाऱ्या मंत्र्यांमध्ये आणि अर्थातच कोल माफिया आणि राजकारणी नेते ह्यांच्यातल्या साट्या-लोट्या मध्ये. " पारख ह्यांनी अगदी सहज-सोप्या शब्दांत कोळसा घोटाळ्याबद्दल विस्तृतपणे लिहिलंय .कोळसा खाण-coal mine  आणि coal block -ह्यात फरक असल्याचं त्यांनी पुस्तकात सांगितलं आहे. ते स्वत:देखील कोळसा घोटाळ्यातल्या एका प्रकरणात आरोपी आहेत. 
  
"The Comptroller and Auditor General of India-CAG ,Mr.Vinod Rai did an excellent job of bringing the huge coal allocation scandal into the public domain....The CAG observed that the Screening Committee did not follow a transparent  and objective method....The CAG said that on account of abnormal delay of more than eight years in implementing a policy that the government itself had formulated,there was an undue financial gain of about 1.86 lakh crore to private parties.The gain was obviously at the cost of the exchequer... Open bidding for allocation of this resource was proposed way back in 2004.It does not require great intelligence to understand why it took over eight years to implement a transparent bidding system.The reason is simple and obvious:the entire political class of India was opposed to it."पारख लिहितात.

आपली पापं अशी चव्हाट्यावर येताना पाहून राजकारण्यांची फौजची फौज त्यावर वाद घालायला आणि एका पैशाचीही अफरातफर झाली नसल्याचं ठासून सांगायला पुढे सरसावली. 

"टीव्हीवरच्या एका मुलाखतीत आणि वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तत्कालीन कायदे मंत्री  सलमान खुर्शीद उलट कॅगच्या त्या मुद्द्यावरच प्रश्न उपस्थित करू लागले की कॅग म्हणताहेत त्या  १.८६ लाख करोड (1.86 lakh crore)रुपयांपैकी सरकारला किती रुपये मिळाले असते ?"पारख लिहितात,"मुद्दा खरे तर तो नाहीच; कॅगच्या अनुमानाच्या अगदी पन्नास टक्के जरी असता,तरी सरकारी तिजोरीला झालेला  तोटा खूप होता. नक्की तोटा किती,त्या आकड्यापेक्षाही;घोटाळ्याची व्याप्ती ,पारदर्शीपणाचा अभाव आणि भ्रष्टाचाराला वाव असणारी पद्धत हा मुद्दा महत्वाचा आहे .टीव्हीवरच्या आणखी  एका मुलाखतीत खासदार नवीन जिंदल ह्यांनी वाद घातला होता की जगभर खाणी (mining properties ) विनामूल्य दिल्या जातात आणि सरकारच्या तिजोरीत महसूल येतो, तो (त्यावरच्या) रॉयल्टी आणि करांच्या माध्यमातून. पण कुठल्याच देशात विकसित केलेल्या क्षेत्रातल्या खाणी विनामूल्य दिल्या जात नाहीत. What are being given free are virgin areas with minimal geological information where large amounts of money has to be sunk as risk capital in carrying out exploration,which may or may not result in commercially minable discovery.Even such properties in most countries are not given free." पारख लिहितात,"टीव्हीवरच्या आणखी एका मुलाखतीत कोळसा मंत्री श्रीप्रकाश जायस्वाल कोळसा खाण वाटपात कुठल्याही प्रकारे विशिष्ट लोकांना झुकते माप दिले गेले नसल्याचा, दबाव आणला नसल्याचा दावा करीत होते. आपल्या कार्यकाळात कोणतेच कोळसा खाण वाटप झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.मग मला समजत नाही; की जर श्रीप्रकाश जायस्वाल ह्यांच्या कार्यकाळात जर कोळसा खाण वाटप झालेच नाही ,तर मग  दबाव आणला गेला नसल्याचं किंवा कुणाला झुकते माप दिले गेले नसल्याचं त्यांना कसं कळलं ?" पारख विचारतात.

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह ह्यांच्याबद्दल पण पारख ह्यांनी विस्तृतपणे ह्या संदर्भात लिहिलं आहे .पुढे अन्य राजकारणी नेत्यांनी अपरिमित मानहानी केल्याबद्दल व्यथित होऊन पारख जेव्हा राजीनामा द्यायला  पंतप्रधानांकडे गेले तेव्हा असले मानापमान तर त्यांच्या वाट्याला रोजच येत असतात, तेव्हा  असल्या छोट्या छोट्या गोष्टींवरून राजीनामा देणं राष्ट्रहिताचं नाही, असं म्हणून  पंतप्रधान डॉ.   मनमोहन सिंह ह्यांनी पारख ह्यांना धीर दिला होता,हे सांगून पारख लिहितात," By continuing to head a government in which he had little political authority,his image has been seriously dented by 2G and Coalgate although he has had a spotless record of personal integrity." 
   
"...I have come to terms with this.There cannot be two centres of power.I have to accept that the party president is the centre of power." असं पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह ह्यांनी म्हटल्याचं "द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर" ह्या आपल्या पुस्तकात संजय बारू ह्यांनी लिहिलं आहेच. तेव्हा घोटाळ्यांच्यामागचा चेहरा अगोचर असल्याचं मानण्याचं काहीच कारण नाही .

Tuesday, April 29, 2014

"लम्हों ने ख़ता की थी,सदियों ने सज़ा पायी।"

मुखवटयाआडचा चेहरा  

-रश्मी घटवाई 

घर फिरलं;की घराचे वासेही फिरतात,ह्याचा अनुभव सध्या काँग्रेस पक्षाला येतो आहे .गेल्या दहा वर्षांत आणि त्यांतही गेल्या पाच वर्षांत तर जरा जास्तच -काँग्रेस प्रणित आघाडीनं लाखो करोडो रुपयांचे घोटाळे करून देशाचं अपिरीमित असं नुकसान करून ठेवलंय. या सगळ्या घोटाळ्यांचा बभ्रा होणार नाही ,ह्या भ्रमात काँग्रेस पक्ष आणि घोटाळ्यांत लिप्त नेते होते,पण म्हातारीने कोंबडा कितीही झाकला तरी सूर्य उगवायचा रहात नाही,त्याप्रमाणे काँग्रेस प्रणित आघाडीच्या कोळशासारख्या काळ्याकुट्ट कारकीर्दीतली एका मागोमाग एक घोटाळ्यांची प्रकरणं बाहेर येऊ लागल्यावर सर्वसामान्य माणसाची मती कुंठीत झाली पण निगरगट्ट काँग्रेसनं 'तो मी नव्हेच 'असा पवित्रा घेतला आणि आपणच आपली पाठ थोपटून घेतली.एरवी सर्वसामान्य माणसाच्या हातून यत्किंचितही चूक झाली आणि आर्थिक व्यवहारापायी त्याच्या चारित्र्यावर जरा जरी शिंतोडे उडले,तर त्याला धरणी पोटात घेईल तर बरं,असं होत असल्याचं आपल्याला दिसतं ;पण इथे लाखो करोडो रुपयांचे घोटाळे करून आणि देशात तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर अब्रूची लक्तरं टांगली जाऊन एवढी नाचक्की झाली,तरी आपण कसे 'आदर्श' आणि प्रामाणिक आहोत म्हणून काँग्रेस पक्ष स्वत:च स्वत:ला प्रमाणपत्र देत सुटला. आपण आपले कल्याण करायचे की अकल्याण, हे ठरवणे आपल्या हाती असते,असं भगवद्गीता सांगते.ह्यापासून अर्थबोध नं घेतलेला काँग्रेस पक्ष स्वत:च स्वत:च्या हातानं स्वत:चं अकल्याण करीत सुटला.बरं एवढं सगळं होऊनही मितभाषी पंतप्रधानांनी या सगळ्यांवर मौन बाळगल्यामुळे लोक अधिकच बुचकळ्यात पडले.

ह्या पार्श्वभूमीवर नुकतंच "द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर" हे संजय बारू यांनी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालं.संजय बारू हे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे माजी मीडिया अ‍ॅडव्हायजर होते . पंतप्रधानपदाच्या खुर्चीत बसल्यावर बाहेरच्या जगापासून माझा संपर्क तुटेल,म्हणून तुम्ही माझे डोळे आणि कान व्हावं,'असे म्हणून पूर्व परिचय असलेल्या संजय बारुंना पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी आपला मीडिया अ‍ॅडव्हायजर म्हणून काम करायला बोलावून घेतलं होतं.

पंतप्रधानांचे प्रसारमाध्यम सल्लागार-मीडिया ‍ॅडव्हायजर-ह्या महत्वाच्या पदावर यूपीए -१च्या काळात कार्यरत असलेले तसंच पंतप्रधानांच्या विश्वासातले अधिकारी संजय बारू यांनी गेल्या दहा वर्षांत एकूणच देशातल्या सत्तेबद्दल आणि घडामोडींबद्दल सगळ्यांनाच ठाऊक असलेलं गुह्य पुस्तकात अधिकृतपणे उघड केलं आणि देशात एकच खळबळ माजली.ह्या पुस्तकानं ऐन सार्वत्रिक निवडणुकींच्या धुमाळीत अनेक कटु सत्यांना वाचा फोडली आहे,अनेकांच्या चेहऱ्यावरचे बुरखे टराटरा फाडले आहेत, अनेकांच्या रंगरंगोटी केलेल्या मुखवटयांआडचे खरे चेहरे उघड केले आहेत.त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यांवरचे रंग उडाले,तर अनेकांच्या हाती आयतं कोलीत सापडलं.ह्या पुस्तकानं राजकारणी नेत्यांचा, सत्ताकारणी प्रशासनकर्त्यांचा आणि सोशल इलाइटस् - सामाजिक उच्चभ्रू वर्तुळांत वावरणाऱ्यांचा आणि 'दिल्ली ते गल्ली' चालणाऱ्या राजकारणाचा धांडोळा घेतला आहे.यूपीए -१च्या काळात-खरं म्हणजे गेल्या दहा वर्षांत दिल्लीतल्या सत्तेच्या सारीपाटावर प्यादी कशी हलत,होती ,ती तशी का हलत होती आणि त्यामागचा खरा सूत्रधार कोण हे सगळं अगदी बारीक सारीक तपशिलांसह बारूंनी त्यात लिहिलंय . मीडिया अ‍ॅडव्हायजर आणि अर्थविषयक बलाढ्य वृत्तपत्रांचे माजी संपादक असल्यामुळे साहजिकच राजकारणातला प्रसारमाध्यमांचा वावर आणि वापर कसा होतो,ह्याचंही दृश्य-अदृश्य प्रतिबिंब त्यांच्या भाष्यात उमटलं आहे."धिस बुक विल हेल्प रीडर्स अंडरस्टॅण्ड द कॉम्प्लेक्स रिलेशनशिप  बिटवीन द पीएम अ‍ॅण्ड द पार्टी प्रेसिडेन्ट" असं बारू म्हणतात, त्याचं पानागणिक प्रत्यंतर पुस्तक वाचताना येऊ लागतं .  

डॉ.मनमोहन सिंह हे योगायोगानं सुद्धा नव्हेत;तर केवळ अपघातानंच झालेले पंतप्रधान आहेत,ह्याबद्दल दुमत असणार नाही.दस्तुरखुद्द डॉ.मनमोहन सिंह ह्यांना स्वत:लाही,आपण निव्वळ अपघातानंच झालेले पंतप्रधान आहोत,हे ठाऊक आहे.जर सोनिया गांधी जन्मानं इटालियन नसत्या(भारतीय असत्या )तर तथाकथित त्यागाबिगाच्या भानगडीत न पडता स्वत:च पंतप्रधान झाल्या असत्या.अंतर्नाद…आपला आतला आवाज वगैरेंचा पोकळ हवाला देत आपण विनम्रपणे पंतप्रधानपदाचा त्याग करीत असल्याचा आव आणायची त्यांना गरजच भासली नसती.हा सगळा इतिहास सगळ्यांनाच चांगला माहीत आहे. त्यामुळे पंतप्रधानपदावर एक आभासी प्रतिमा,जिच्याकडे पंतप्रधानपदाचे आभासी अधिकार असतील आणि खरं पंतप्रधानपद आणि पंतप्रधानपदाचे अधिकार सोनिया गांधी ह्यांच्याकडे असतील, अशी सोयीची उपाययोजना आखण्यात आली,सोनिया गांधींच्या त्याग -नाट्याच्या वेळी ज्याने जितके अधिक अश्रू गाळले,त्याला किंवा तिला त्या प्रमाणात मंत्रिपद प्राप्त झाले, हे सर्वज्ञात आहे. 

आपल्या शोभेच्या पदाच्या मर्यादा जाणून परीस्थितीशरण होत डॉ.मनमोहन सिंह ह्यांना काय काय 
मानापमान झेलावे लागले!'सम टाईम्स इन लाईफ ,इट इज वाईज टू बी फूलिश'असं सांगणाऱ्याडॉ.मनमोहन सिंह यांना अनेकदा त्याच वक्तव्याप्रमाणे वागावं लागलं. डॉ.मनमोहन सिंह ह्यांनी संसदेत आणि नंतर परवेझ मुशर्रफ यांना ऐकवलेल्या मुझफ्फर रझ्मी यांच्या उर्दू शायरीचाच आधार घेत सांगायचं झालं तर "लम्हों ने ख़ता की थी,सदियों ने सज़ा पायी।"  

"इन यूपीए-१,ही( डॉ.मनमोहन सिंह)वॉज इन ऑफिस,बट ही वॉज नॉट इन पॉवर...  डॉ.सिंह वुड हॅव बीन वेल अवेअर ऑफ द लिमिटस् टू द प्राईम मिनिस्टरियल अथॉरिटी अंडर सच अ डिस्पेन्सेशन. ही सॉ हिमसेल्फ अ‍ॅज द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर… काँग्रेस'स्  अलाईज (allies)इन यूपीए-१ नॉमिनेटेड देअर ओन मिनिस्टर्स अ‍ॅण्ड बार्गेन्ड फॉर देअर पोर्टफोलियोज विथ सोनिया ,नॉट विथ  डॉ.सिंह ..अ‍ॅज फॉर सिनियर काँग्रेस लीडर्स,दे ओवड् देअर कॅबिनेट पोस्टस्  ऑलमोस्ट एन्टायरली टू सोनिया गांधी …व्हेन द कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स वॉज रीशफल्ड ड्युरिंग द टर्म ऑफ यूपीए-१, डॉ.सिंह डिड हॅव मोअर ऑफ अ से ,बट ईव्हन सो,फ्यू ऑफ इटस्  मेम्बर्स एव्हर बिहेवड् अ‍ॅज इफ दे ओवड् देअर मिनिस्टरियल पोझिशनस् टू पीएम.. ."बारू लिहितात. 

दिल्लीत दोन सत्ताकेंद्र असल्याचं अगदी सर्वसामान्य माणसाला जाणवत होतं. त्याबद्दल भाष्य करताना बारूंनी काँग्रेसच्या नेत्यांचे नावासकट आणि प्रसंगासकट तपशील देऊन लिहिलंय की राजकीय दृष्ट्या डॉ.सिंह हे अमुक अमुक ह्यांचे आश्रयदाते होते,पण सोनिया आणि राहुल गांधी यांच्या प्रती निष्ठा जाहीर करण्यानंच त्यांची राजकीय कारकीर्द टिकून राहणार होती. 

"… वॉज डॉ.सिंह'ज् प्रोटेजी(protege ), बट ही न्यू दॅट हिज पॉलिटिकल करीअर डिपेन्डेड ऑन डेमॉंंन्स्ट्रेटिंग लॉयल्टी टू सोनिया अ‍ॅण्ड राहुल." अन्य दुसऱ्या नेत्याबद्दल पंतप्रधानांनी बारूंना विचारलं तेव्हा,"आय रिप्लाईड दॅट … ऑट टू बी मोअर डेमॉंंन्स्ट्रेटिव्ह ऑफ हिज लॉयल्टी टू द पीएम इफ ही वॉन्टेड  अ बर्थ इन द मिनिस्ट्री ." बारू लिहितात. त्या नेत्याला डॉ.सिंह ह्यांनी मंत्रिमंडळात घेतलं. त्या नेत्यानं सोनिया गांधी यांच्या स्नेह्याला त्याबद्दल धन्यवाद दिल्याचं नंतर उभयतांना कळलं. "अ‍ॅट लीस्ट यंगर काँग्रेस एमपीज् शुड फील दे ओवड् देअर मिनिस्टरियल बर्थ टू द पीएम रादर दॅन टू जस्ट सोनिया."बारू लिहितात.
 
एकीकडे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह हे एकटे एकाकी असहाय असल्याचं चित्र लोकांपुढे येत होतं , त्याचवेळी देशाचे कणखर पंतप्रधान म्हणून जगापुढे आपली प्रतिमा निर्माण करणं हे त्यांच्यापुढे आव्हान होतं.    
"व्हॉट शुड डॉ.सिंह'ज् स्ट्रैटेजी बी ?शुड ही अझ्युम दॅट व्हाईल सोनिया वॉज द लीडर ऑफ द काँग्रेस ,ही वॉज द हेड ऑफ अ कोअलिशन गव्हर्नमेन्ट ,विथ नॉन - काँग्रेस कॉन्स्टिट्यूएन्ट्स ,इन्क्ल्युडिंग अ रिबेल लाईक … अ‍ॅण्ड कार्व्ह आउट हिज ओन पॉलिटिकल स्पेस अ‍ॅण्ड रिटेन अ‍ॅडमिनीस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ  गव्हर्नमेन्ट?ऑर शुड ही बी रनिंग एव्हरी डे टू  10 जनपथ ,सोनिया'ज् रेसिडन्स -कम -ऑफीस, टु टेक हर इंस्ट्रक्शन्स?हॅण्डलिंग द डेलिकेट इक्वेशन विथ सोनिया वॉज डॉ.सिंह'ज् फर्स्ट अ‍ॅण्ड बिगेस्टपॉलिटिकल चॅलेंज."बारू लिहितात. 
 
राजीव गांधींच्या निधनानंतर काँग्रेस पक्षात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती."विदाऊट अ नेहरू -गांधी फॅमिली मेंबर अ‍ॅट द टॉप, काँग्रेस पार्टी वुड स्प्लिन्टर अ‍ॅण्ड विदर अवे." बारू लिहितात. "द इनसायडर " लिहिणारे पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव हे पक्षाच्या आणि जी हुजुरी करणाऱ्या पक्षातल्या लोकांच्या दृष्टीने "आउटसायडर"च ठरले.इतका विद्वान माणूस ;पण त्यांच्या मृत्युनंतर काँग्रेस शीर्ष नेतृत्वानं त्यांचं पार्थिव सुद्धा काँग्रेसच्या मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवू दिलं नाही.बारूंनी ह्यावर पोटतिडकीनं भाष्य करीत काँग्रेस शीर्ष नेतृत्वावर सपासप कोरडे ओढले आहेत. " नरसिंह राव'ज् चिल्ड्रेन वॉन्टेड द फॉर्मर पीएम टु बी क्रीमेटेड इन दिल्ली,लाईक अदर काँग्रेस प्राईम मिनिस्टर्स. इम्प्रेसिव्ह मेमोरियल्स हॅड बीन बिल्ट फॉर नेहरू ,इंदिरा अ‍ॅण्ड राजीव अ‍ॅट प्लेसेस व्हेअर दे  हॅड बीन क्रीमेटेड…  …  वॉन्टेड मी टु एन्करेज नरसिंह राव'ज् चिल्ड्रेन,टु टेक देअर फादर'स् बॉडी टू हैद्राबाद फॉर क्रीमेशन. … सोनिया डिड नॉट वॉन्ट अ मेमोरियल  फॉर राव एनीव्हेअर इन दिल्ली.द काँग्रेस पार्टी रिफ्युज्ड टु अलॉव  राव'ज् बॉडी टु बी ब्रॉट इन्टू द पार्टी'ज् हेडक्वार्टर ऑन इट्स वे टू एअरपोर्ट  अ‍ॅण्ड  सोनिया चोज नॉट टु बी प्रेझेन्ट अ‍ॅट द हैद्राबाद क्रीमेशन ," बारू लिहितात .     

अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेल्या,आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थशास्त्रातल्या ज्ञानाच्या बळावर सन्माननीय व्यक्ती म्हणून नावलौकिक मिळवलेल्या आणि खरं म्हणजे अजिबात धूर्त राजकारणी नसलेल्या एका विद्वान अर्थशास्त्रज्ञाची यूपीएच्या कारकीर्दीत किती आणि कशी घुसमट होत गेली ह्याचं साद्यंत वर्णन संजय बारूंनी केलं आहे-तेच त्यांचं उद्दिष्ट्यपण आहे,ते वाचून पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांची अगतिकता,कुचंबणा आणि त्यांचं मौनव्रत ह्याबद्दल वाचक हळहळू लागतो.अंतर्बाह्य साधे सज्जन असलेल्या पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह ह्यांच्या हाताखालच्या,त्यांच्या सरकारातल्या  मंत्र्यांसंत्र्यांनी लाखो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आणि अपहार केला,पण बहुधा त्यांना त्यावर मिठाची गुळणी धरण्यास बाध्य करण्यात आलं असावं .     

त्यांनी केलेल्या नरेगा (मनरेगा)कामाचं श्रेय राहुल गांधींना देण्यात आलं.मीडियात तशी पद्धतशीर बातमी पेरली गेली नि तिचा प्रचार-प्रसार करण्यात आला."वुई हॅव टु बिल्ड राहुल'स् इमेज"अशी त्याची भलामण करण्यात आली.त्यांनी केलेल्या कृषि-कर्जमाफीची योजना ह्या त्यांनी हृदयाशी बाळगलेल्या संकल्पनेचं श्रेयसुद्धा त्यांना नं देता सोनिया गांधींना देण्यात आलं. त्यावर पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांची प्रतिक्रिया होती-"लेट देम टेक ऑल द क्रेडिट.आय डू नॉट नीड इट.आय अ‍ॅम ओन्ली डूइंग माय वर्क. आय डू नॉट वॉन्ट एनी मीडिया प्रोजेक्शन."             
 
पक्षांतर्गत हेवे- दावे, ढवळाढवळ, शह-काटशह,एकमेकांवर कुरघोडी करू पहाणारे,अजिबात सहकार्य नं करणारे सरकारातले मंत्रीगण,पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला 'अंतरीच्या गुढगर्भी एकदा जे वाटले, एकदा जे वाटले, ते प्रेम आता आटले' असा शीर्ष नेतृत्वाकडून येत असलेला अनुभव असं सगळं जिवंत चित्रण "द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर"ह्या पुस्तकात संजय बारू यांनी केलं आहे. हे पुस्तक वाचल्यावर अगदी अनभिज्ञ व्यक्तीलाही कळतं की कुण्या बाळ्या,बंड्या,बबड्या,छकुली यांच्यासाठी निर्माण करण्यात आलेलं पंतप्रधान हे पद नाही. पंतप्रधान हा काही पक्षाचा उरत नाही,तो देशाचा होतो; देशात आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला आपल्या देशाची आन -बान -शान उंचावण्याची जबाबदारी असते.जोवर त्याची प्रतिमा चांगली असते,तेव्हा त्याच्या सरकारची आणि देशाची प्रतिमा चांगली असते. पंतप्रधानाची प्रतिमा मलीन झाली;तर मात्र सरकारची आणि देशाची प्रतिमासुद्धा डागाळते!  

"लम्हों ने ख़ता की थी,सदियों ने सज़ा पायी।" 
The Accidental Prime Minister: The Making and Unmaking of Manmohan Singh

हर हर महादेव 
-रश्मि  घटवाई 
"सुरतनु जिमण अने काशीनु मरण "ऐसा गुजरात में कहा जाता है । अर्थात कोई भोजन करें,तो सुरत में  और अंतिम श्वास लें ,तो विश्व की प्राचीनतम नगरी काशी -वाराणसी में !दोनों स्थानोंका अपना अपना महात्म्य है ।वरुणा व अस्सी इन दो नदियों के बीच बसी होने के कारण वाराणसी नाम से जानी गयी यह नगरी विश्व की प्राचीनतम धार्मिक नगरी है ।मान्यता है कि साक्षात ईश्वर ने काल के साथ साथ अपने व्यक्त शरीर से वरुणा व अस्सी नदियोंको निर्माण किया और इनके संगम पर पवित्रतम स्थान काशी का भी निर्माण किया। शिव -पार्वती ने स्वयं इस स्थान का निर्माण किया होने  के कारण व उनका  यहां निरंतर वास  होने  के कारण इस स्थान को अविमुक्ता, आनंदवन, रुद्रवन नामोंसे भी जाना जाता है।१२ज्योतिर्लिंगों में  से एक ज्योतिर्लिंग विश्वेश्वर अथवा विश्वनाथ, विश्वप्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर में स्थित है।"हर हर महादेव"की गूँज के साथ, अपरिमित श्रद्धाभाव के साथ श्रद्धालू विश्वनाथ शिव का पूजन करते हैं  ।

देश में इस समय चुनाव का वातावरण अपनी चरम सीमा पर है । वाराणसी नगरी में इन दिनों गंगा की लहरों के साथ साथ चुनाव की लहर भी छाई हुई है ।भारतीय जनता पार्टी के प्रधान मंत्री पद के प्रत्याशी नरेंद्र मोदी वाराणसी से चुनाव लड़ रहे हैं ।पूरे देश में मोदी की लहर हैवाराणसी में नरेंद्र मोदी की केसरिया लहर साफ़ दिखायी दे रही है। "हर हर महादेव"गूँज के साथ भाजपा को जीत दिलाने के लिये हिंदूओंकी पवित्र नगरी वाराणसी के मतदाता पूरी तरह से तैयार हैं।

मार्च के महीने में मैं ५ -६ दिन व्यक्तिगत काम के लिए वाराणसी गयी हुई थी। मैं जिस दिन सुबह वाराणसी पहुँची,चुनाव आयोग ने तभी उस दिन सोलहवी लोकसभा के लिए चुनाव घोषित किये थे , अत: मुझे बड़ी उत्सुकता थी ।वाराणसी को इसी पल का इन्तजार था।लेकिन उस वक्त वाराणसी से किसी भी राजनैतिक दल का उम्मीदवार घोषित नहीं किया गया था।भारतीय जनता पार्टी वाराणसी  में नरेंद्र मोदी को प्रत्याशी के रूप में उतारेगी ,इस बात की चर्चा तो बहुत हो रही थी परन्तु अधिकृत रूप से तब यह घोषणा नहीं हुई थी।मैंने वाराणसी में सभी स्तरों के  लोगोंसे बातचीत की,तथा उनके विचारोंको जाना। 

एयरपोर्ट के बाहर आतेही टैक्सी में बैठकर मैंने  ड्राइवर को सहज अंदाज से वाराणसी का हालचाल पूछा।उसे मानों इसी प्रश्न का इन्तजार था।"बस अब सबको नरेंद्र मोदी का इन्तजार  है।वाराणसी में नरेंद्र मोदी की लहर हैवह बोला।न उससे मेरी कोई जान-पहचान थी,न उसे यह पता था कि मैं पत्रकार हूँ , पर एक घंटेभर के सफ़र में,बातोंमें उसने मुझे समूचे वाराणसी के व वाराणसी के लोगों के अंतरंग का दर्शन कराया। "वाराणसी में  नरेंद्र मोदी जी की सभा हुई थी २० दिसंबर को,लेकिन व्यस्तता के चलते मैं नहीं जा पाया। उनकी सभा में भारी भीड़ थी। लोग चाहते हैं कि नरेंद्र मोदी वाराणसी से चुनाव लड़ें। यहाँ की सड़के बहुत ख़राब हैं जिसके चलते यहाँ लोगों को बहुत ही असुविधा होती हैं। आये दिन ख़राब सड़कों के कारण दुर्घटनाएं  होती रहती हैं। लोगों के वाहन क्षतिग्रस्त होते हैं। वाराणसी की जनता को विश्वास है कि आते ही नरेंद्र मोदी वाराणसी में  जादू की छड़ी चला देंगे और वाराणसी को सुन्दर व् साफ़-सुथरा कर देंगे। यहाँ लाखो करोड़ों की संख्या में अपने देश से व विदेश से पर्यटक आते हैं। यहाँ रास्तें अच्छे हो जायेंगे तो और भी अधिक लोग आकर्षित होंगे।" टैक्सी चालक संतोष ने बताया। 

वाराणसी में १२ मई को चुनाव होनेवाला है।लेकिन वाराणसी में तो  उसी दिन से चुनावी वातावरण गरमाने लगा था। जिस रिज़ॉर्ट में मैं व मेरे पति रुके थे,वहाँ शांति थी। रिज़ॉर्ट सुन्दर,अत्यंत साफसुथरा था और वहाँ के केअर टेकर बहुत आतिथ्यशील थे।मैंने केअर टेकर को टीवी पर न्यूज चैनेल चला देने के लिए कहा।चुनावोंकी घोषणा तभी हुई होने के कारण सभी चैनेलोंपर केवल चुनावोंकी खबरें आ रही थीं।मुझे ध्यानपूर्वक खबरोंको सुनते हुए केअर टेकर ने देखा, तो स्वाभाविक अंदाज में बताने लगा ,"यहाँ मोदी की लहर है।" आपको सबसे अधिक सताने वाली इस शहर की सबसे गम्भीर समस्या क्या है ?मेरे इस प्रश्न पर वह तुरंत बोला,"ख़राब रास्ते !वाराणसी में जितनी ख़राब सड़कें हैं ,उतनी कहीं हीं होंगीं। " उसके विचार में मोदी वाराणसी से जीतेंगे और तभी वाराणसी का कायापलट होगा। 

रिज़ॉर्ट की व्यवस्था के बारे में हमारी राय जानने के लिए रिज़ॉर्ट के व्यवस्थापक अमित सिंह हमसे बातचीत करने लगे,तो स्वाभाविक रूप से संभाषण राजनीती व् आनेवाले चुनावोंकी तरफ बढ़ा। "वाराणसी में १२ मई को चुनाव होनेवाला है।लेकिन वाराणसी में ही नहीं,बाहर भी मोदी की लहर है।" वह बताने लगे।उनकी वाणी बहुत ही उच्च अभिरुचिपूर्ण तथा व्यवहार शालीन व मृदु था। तीस वर्षीय अमित सिंह को लेखन का शौक है।"मैं  मूलत:बलिया का रहनेवाला हूँ। अभी बाहरगाँव से लौट रहा हूँ। ट्रेन में मूंगफल्ली वाला मूंगफल्ली बेच रहा था,और बोल रहा था,नमो नमो चौदह !तो मैंने उसे बोला कि भैय्या तुम तो पार्टी के आदमी लग रहे हो! नमो नमो चौदह कहकर मूंगफल्ली बेच रहे हो,तुम्हारा इशारा तो सीधे २०१४ के चुनावोंकी तरफ है। तुम मोदी जी का प्रचार कर रहे हो !तो मूंगफल्ली वाला मुझसे कहने लगा,कि मैं अकेलाही नहीं पूरा देश मोदी जी का प्रचार कर कर रहा है!पूरा देश चाहता है कि नरेंद्र मोदी देश के प्रधानमंत्री हों और देश का विकास हो!" अमित सिंह के विचार में वाराणसी में भगवा ही फहरेगा।वाराणसी में "हर हर महादेव" नारा ही गूँजेगा!उनके विचार में काँग्रेस लगभग ख़तम हो चुकी है।" आम आदमी पार्टी का कोई विज़न नहीं है। केजड़ीवाल तानाशाह है,सत्तालोलुप  हैं। उनकी बॉडी लैंग्वेज में आत्मविश्वास नहीं है। उनको देख कर लगता नहीं कि वह कुछ करेंगे ,जबकी मोदीजी को देखकर लगता है,कि ये हमारे लिए,इस देश के लिए कुछ करेंगे। देश में व्यापक बदलाव लायेंगे।

" सपा तो केवल मुसलमानोंकी पार्टी है। मुलायम सिंह नब्बे प्रतिशत मुसलमानों के हित में और दस प्रतिशत यादवोंके हित में सोचते हैं। फेसबुक पर भी उन्होंने 'मुल्ला+यम' यही अपनी पहचान दी है। आज़मखान की भैसोंको ढूँढने के लिए उन्होंने दिन रात एक कर दी। पर कुछ ३-४ महीने पहले यहाँ चाँदपुर गाँव में एक ही परिवार के चार लोग मारे गए,उनके हत्यारोंको ढूँढने के लिए उन्होंने कुछ भी नहीं किया। रूस के राष्ट्राध्यक्ष भी कहते हैं कि उनके देश में अल्पसंख्यकों को अल्पसंख्यकों की तरह ही रहना होगा,पर अपने यहाँ अल्पसंख्यकों का तुष्टिकरण किया जाता हैउन को बहुत अधिक महत्त्व दिया जाता है।"अमित सिंह बताते हैं ।"वाराणसी में भगवा ही फहरेगा",दृढ़ विश्वास के साथ वह दोहराते हैं ।

रिज़ॉर्ट के मालिक विजय प्रकाश चार्टर्ड एकाउंटेंट हैं। राजनीति में उन्हें रूचि है।उनसे हुई अनौपचारिक बातचीत के दरम्यान सी ए विजय प्रकाश ने बताया कि देश में और विशेष रूप से उत्तर प्रदेश में कैसे जाति -धर्म पर आधारित मतदान होता है।

"उत्तर प्रदेश में १९ जिले ऐसे हैं ,जो मुस्लिमबहुल हैं। रामपुर में ४२ प्रतिशत मुस्लिम समाज के वोट होने के कारण वहाँ से मुस्लिम प्रतिनिधि चुनकर आता है।"वे बताते हैं।  "वैसे देखा जाये तो नाम भलेही रामपुर है उस जगह का;पर है तो वह रहिमपुर!"मेरी इस टिपण्णी पर वह  बताते हैं ," मुस्लिमोंका एक ही नारा होता है;सबसे पहले भाई ,फिर सपाई ,फिर काँग्रेस आई,कोई न मिलें,तो बसपाई ! किसी भी पार्टी का मुस्लिम उम्मीदवार हो,तो मुस्लिम मतदाता पार्टीके भेदाभेदों को भुलाकर मुस्लिम उम्मीदवार को इकट्ठा मत देंगे। मुस्लिम उम्मीदवार नहीं होगा,तो फिर सपा के उम्मीदवार को अपना मत देंगे,क्योंकि समाजवादी पार्टी उन्हीं के पक्ष में है।उत्तर प्रदेश में मुस्लिम मतदाता जिसके साथ चिपक जायेंगे उसकी सरकार बनेगी। उत्तर प्रदेश में इसी के चलते सत्ता परिवर्तन हुआ।परन्तु इस बार मुजफ्फर नगर दंगोंके कारण मुस्लिम मतदाता सपा से नाराज है। पश्चिम बंगाल में ममता मुस्लिमोंके मतों के कारण मुख्यमंत्री बनीं। यदि वह भाजपा के साथ जाएँगी तो पश्चिम बंगाल के  उनके मुस्लिम मतदाता उनसे नाराज़ हो जायेंगे।दिल्ली  में आम आदमी पार्टी वाल्मीकि समाज और मुस्लिम मतदाता के वोटोंपर जीती थी।सबसे बड़ी बात यह है कि पढ़े-लिखे लोग मतदान नहीं करते। अनपढ़ लोग इकट्ठा उसपर छप्पा मारते हैं-अर्थात एकसाथ मत देते हैं, जिसपर छप्पा मारने के लिए उनसे कहा जाता है।वाराणसी में ब्राम्हण हैं और वैश्य अधिक हैं ।परन्तु बनिया बँट जाता है। वह एकजूट नहीं होता। क्या कारण है कि सर्विस टैक्स वकीलोंपर नहीं लगा,पर चार्टर्ड एकाउंटेंट पर सर्विस टैक्सलगाया गया है। क्या वकीलोंकी सेवा सर्विस के अंतर्गत नहीं आती ?उसका कारण यह है, कि नब्बे प्रतिशत वकील मत देते हैं।पूरे देश में  चार्टर्ड एकाउंटेंट डेढ़ लाख कि संख्या में होंगे। इसका मतलब चार्टर्ड एकाउंटेंट का वोट मात्र एक प्रतिशत है और वकिलोंका वोट शेअर नब्बे प्रतिशत होने के कारण उनके हित में,सर्विस टैक्स वकीलोंपर नहीं लगा ।पहले वोट देखा जाता है।" चार्टर्ड एकाउंटेंट विजय प्रकाश बताते हैं

कुछ समय पश्चात वाराणसी से भाजपा के लोकसभा चुनावों के प्रत्याशी के रूप नरेंद्र मोदी के नाम की अधिकृत घोषणा कर दी गयी ,तो वाराणसी में गंगा की लहरोंके के साथ साथ हर्षोल्लास की लहर भी छा गयी।परन्तु विरोधी दलों ने हेतुत: वाराणसी के वर्त्तमान सांसद डॉ. मुरली मनोहर जोशी द्वारा वाराणसी से नरेंद्र मोदी को भाजपा के प्रत्याशी घोषित होनेपर आपत्ति जताई होने की अफवाहें फैला दींइन दोनों नेताओं के समर्थकों के बीच भिडंत होने की खबरें मीडिया में आने लगीं। अत: वास्तविकता जानने के लिए मैंने वाराणसी में मेरा जिन युवाओंसे परिचय हुआ था,उन युवाओंसे दूरभाष पर बातचीत की। ८ मार्च की शाम को पर्यटन हेतु मैं वाराणसी के रामनगर किले में गयी थी। जब किला देखकर मैं बाहर आयी थी,तो मैंने देखा कि रामनगर किले के निकट के एक छोटेसे टी -स्टॉल पर कुछ युवक नरेंद्र मोदी के "चाय  पर चर्चा "कार्यक्रम के आयोजन की तैय्यारी में जूटे हुए थे। अमाप उत्साह के साथ वे  नौजवान बड़ी सी स्क्रीन (परदा ) तथा "चाय  पर चर्चा "कार्यक्रम के बैनर लगा रहे थे। उत्सुकतावश मैंने उनसे बातचीत की ,तो वे बताने लगे,की देश का युवा वर्ग यही चाहता है कि मोदी देश के प्रधानमंत्री बनें।मीडिया में जब डॉ. मुरली मनोहर जोशी व नरेंद्र मोदी के बीच कथित द्वंद्व की बात जोरोशोरोंसे उछाली जाने लगी, तो मैंने वास्तविकता जानने के लिए इन्हीं युवकोंसे दूरभाष पर बातचीत की,और पाया कि अफवाहों के विपरित चित्र था। न तो इन दो नेताओंके बीच कोई मन-मुटाव था,न इन दोनों नेताओं के समर्थकों के बीच कोई अनबन थी।

डॉ अनुपम गुप्ता वाराणसी के आकाशवाणी केंद्र पर निवेदक हैं तथा उन्होंने विधि में- (Law )में डॉक्टरेट प्राप्त की है। डॉ. मुरली मनोहर जोशी विरुद्ध नरेंद्र मोदी यह चर्चा तथा दोनों में विवाद होने की अफ़वाहें मीडिया में हेतुत: फैलायी जा रही हैं।न ही इनके समर्थकोंके बीच,मिडीया जैसे फैला रहा है,कोई लड़ाई-झगडे हो रहे हैं।भाजपा का प्रत्येक कार्यकर्ता कमल खिलाने में विश्वास रखता है,उसी दिशा में कार्य कर रहा है।भाजपा के वतर्मान सांसद डॉ. मुरली मनोहर जोशी ने पहले के काँग्रेस के सांसद को हराकर यह सीट जीती है। इस सीट पर भाजपा की ही विजय हो ,इसके लिए भाजपा के कार्यकर्ता कार्य कर रहे हैं।" वे कहते हैं। सर्वसामान्य व्यक्ति आज भी समझ नहीं पा रहा है कि दोषी और दागी मुख़्तार अन्सारी जेल में रहते हुए भी कैसे चुनाव लड़ सकता है और लालू जैसे लोग दोषी होकर भी जेल से बाहर आ जाते हैं। मेरी इस टिपण्णी पर वे बताते हैं कि मुख़्तार अन्सारी को सजा घोषित नहीं हुई है।मुख़्तार अन्सारी, अरविंद केजडीवाल आदि लोग नरेंद्र मोदी के विरोध में खड़े है,उस स्थिति पर भी वे विस्तृत चर्चा करते हैं। इस बार मतों का ध्रुवीकरण होकर हिंदुओं का मत नरेंद्र मोदी को मिलेगा ,ऐसा उन्हें लगता है।

"यहां हर हर महादेव नारा गूंजेगा " भाजयुमो के वाराणसी के जिलाध्यक्ष संतोष द्विवेदी बताते हैं
"डॉ .मुरली मनोहर जोशी और नरेंद्र मोदी इनमें कोई मनमुटाव भी नहीं है। वाराणसी की सीट को लेकर दोनों में कोई कलह भी नहीं है। अरविंद केजडीवाल को वाराणसी नगरी रत्तिभर भी महत्त्व नहीं देती। यह पूर्वांचल है।यह वाराणसी है ;कोई दिल्ली या गाज़ियाबाद  नहीं ,कि यहाँ केजडीवाल को वोट मिलेंगे।उनको या 'आप 'को यहां तिनकेभर भी नहीं पहचानता कोई!" द्विवेदी बताते हैं। 

"कितनी अजीब बात है की पिछले १० सालो से काँग्रेस इस देश को चला रही है और कई हजार करोड़ के घोटाले हुए |लेकिन केजरीवाल नरेंद्र मोदी के खिलाफ मोर्चा खोले हैं ।भारत एक ज़माने में सोने की चिड़िया कहलाता था। भारत को पहले अंग्रेजोंने लूटा,फिर काँग्रेस ने लूटा। गांधी जी ने भी कहा था कि स्वतंत्रता की प्राप्ति के बाद काँग्रेस का अस्तित्व मिटा देना चाहिए।इतने हजारों -करोड़ों रुपयोंके घोटाले करनेवाले काँग्रेस का अस्तित्व मिटा देने का यही सबसे उचित समय है। " अर्जुन सिंह बताते हैं।

इन सभी से हुई व्यापक चर्चा का सार एक ही था,कि 'वाराणसी में भगवा ही फहरेगा।वाराणसी में "हर हर महादेव" नारा ही गूँजेगा।' 


मुस्लिम समाज की मानसिकता भी अब बदलने लगी है।

बदल रही है मुस्लिम समाज की मानसिकता 

-रश्मि घटवाई 

वोट बैंक पॉलिटिक्स इन दिनों चरम सीमा पर है।अल्पसंख्यक मतदाताओंसे इकठ्ठा मत बटोरने के लिए कुछ नेता इन दिनों अपने भड़काऊ भाषणों में हीन और विवादास्पद बातें कर रहे हैं। मुलायम सिंह ने जब बलात्कार के आरोप में दोषी पाये गए आरोपियोंके प्रति हमदर्दी जताते हुए कहा कि ‘लड़कों से गलती हो जाया करती है।'तो उसके पीछेे एक ही कारण था-मुस्लिम तुष्टिकरण। क्योंकि मुंबई गैंग रेप के आरोपियों में से अधिकांश आरोपी मुस्लिम हैं। यही नहीं ,निर्भया गैंग रेप में लिप्त जो आरोपी-जिसने सबसे अधिक क्रूरता दिखाई थी, तब नाबालिग था जिसके चलते उसे बहुत ही कम सजा मिली है, वह भी मुस्लिम हैवैसे भी देश की कुछ पार्टियों ने व उनके कुछ नेताओंने यही भ्रम अपने मन में पाल रखा है कि केवल वे ही मुस्लिम अल्पसंख्यक समुदाय के एकमात्र तारणहार हैं और इसी भ्रामक कल्पना को वे मुस्लिम समाज के गले उतारने में सफल भी हुए हैं।इन अवसरवादी नेताओंने २००२ के गुजरात के दंगो को लेकर मुस्लिम समाज के मन में नरेंद्र मोदी के प्रति तथ्योंसे कोसों दूर,विद्वेषमूलक बातें डाल दी हैं।यहा तक; कि उन्होंने मुस्लिम समाज में नरेंद्र मोदी ,भारतीय जनता पार्टी तथा  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रति नफ़रत पैदा कर दी है।मुस्लिम समाज आज इनको अपना दुश्मन मानने लगा है।  

ऐसे में एक शख़्स मुस्लिम समाज को असलियत से रूबरू कराने में लगे हुए हैं। सत्तर वर्षोंसे भी अधिक उम्र के ज़हीर शेख़ जामनगर के निवासी हैं ,पर इन दिनों वे काशी में ,बिना किसी प्रलोभन या लालच के,स्वयंप्रेरणा से,देश को महाशक्ति बनाने के लिए  नरेंद्र मोदी को जिताने के लिए तन-मन-धन सेमुस्लिम समाज का प्रबोधन कर रहे हैं।

"मुसलमानों में दो पंथ होते हैं,एक शिया और दूसरा सुन्नी पंथ। अपने देश में  शिया पंथ के मुस्लिम सुशिक्षित,पढ़े लिखे हैं और दुर्भाग्यवश सुन्नी पंथ के मुस्लिम लोगोंमें शिक्षा का अभाव है।मैं उनको बताता हूँ कि तुम लोगोंकी गरीबी व अज्ञानता के पीछे शिक्षा का अभाव,यही एकमात्र कारण है   
काशी में तीन लाख मुसलमान हैं।उनमें से ७५ हजार शिया पंथ के हैं और २ लाख २७ हजार के आसपास  सुन्नी पंथ के हैं।मैं अगले चुनाव में तंदुरुस्त रहूँ ,न रहूँ ,इसलिए मैं मेरे इस अभियान को व्रत मानकर, देश को महाशक्ति बनाने के लिए लोगोंमें चेतना जगा रहा हूँ। 
    
"विरोधी पार्टीयाँ,मुलायम,मायावती मुस्लीमों से कहते हैं कि मोदी प्रधानमंत्री बन जायेंगे तो भारत के अंदर एक एक गावोंमे दंगा -फ़साद होगा। मैने मुस्लिम समाज को कहा कि भाई ,अखंड हिंदुस्तान का टुकडा किसने किया?धर्म के नाम पर जमीन का बँटवारा किसने किया?तब मोदी थे क्या?तो फिरमोदी से क्यों डर रहे हो?भाजपा सुशासन व विकासके नाम पर चुनाव ल रही है ।उनका मतलब देश में विभाजन कराना नहीं है ।नरेंद्र मोदी सबको एक करके देश को महाशक्ती बनाना चाह रहे हैं ।भाई-भाई एक हो जाएं यह चाह रहे हैं।" ज़हीर शेख़ बताते हैं। 
 
'मैं उनसे कहता हूँ ,मोदी जी से डरने की जरुरत नहींराष्ट्रीय स्वयंसेवक संघ- RSS -तुम्हारी दुश्मन नहीं है । RSS की देश में ४१ हजार से भी ज्यादा शाखाएं हैं ,वहां वें संस्कार और देशभक्ति सिखाते हैं ।लोग कहते हैं ,'चाचा भाजपा के पक्ष में हैं ,कौम के गद्दार हैं । मोदी ने गुजरात के दंगों में संहार करवाया है।तो मैं उनको बताता हूँ कि देश को स्वतंत्रता मिलने के बाद उस दिन से आजतक देश में 11 हजार से भी अधिक दंगे हुए हैं।मैं उनसे कहता हूँ कि गुजरातमें दंगे हुए,तब आप वहाँ थे क्या ?नहीं ना ?मैं था। 
दंगे मोदी जी ने नहीं करवायें। सर्वोच्च न्यायलय समेत सभी जाँच एजेंसिया १०-१२ साल उन्हें  परख रही हैं ,पर मोदी दोषी नहीं पाये गए।सभी जाँच एजेंसियों ने उन्हें परखने के बाद कहा हैं कि मोदी दोषी नहीं हैंमोदी स्वयं कह रहे हैं कि यदि वे दोषी हैं ,तो उन्हें चौराहे पे फाँसी पर लटकाया जाएं। "ज़हीर शेख़ बताते हैं।
   
"हमारा खुदा परवरदिगार कुराण में फर्माता है कि 'मैने तुमको जिस धरती पर पैदा किया,जहाँ के नदियोंका पानी पीकर तुम पले और बढ़े हो,जहाँ की हवाओंकी सास तुम लेते हो और जहाँ के खेतोंमें पैदा हुआ अनाज खाकर तुम जिन्दा हो,उस धरती से ,उस माँ भूम भारत से और अपने वतन हिंदुस्तान से तुम गद्दारी करोगे,तो मुझे कसम है अपने जलाल की;मैं क़यामत के रोज आप लोगोंको माफ़ नहीं करूंगा।"ज़हीर शेख़ बताते हैं।उनके मन में सभी धर्मोंके प्रति आदर हैमन में सर्वधर्मसमभाव रखने वाले ज़हीर शेख़ असली मायने में सेक्युलर हैं ,जो निरपेक्ष भावना से देश की उन्नति के लिए कार्य कर रहे हैं।उनकी मेहनत रंग ला रही है। क्योंकि मुस्लिम समाज की मानसिकता भी अब बदलने लगी है। 

 

Tuesday, June 5, 2012

"प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी" : आपण आणि पर्यावरण - रश्मी घटवाई

"प्रॉब्लेम ऑफ  प्लेन्टी" : आपण  आणि  पर्यावरण 
                                                                                - रश्मी घटवाई 
                                                                                      
५ जून रोजी दर वर्षी विश्व पर्यावरण दिवस साजरा केला जातो;वस्तुत:प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिवस मानून आपण प्रत्येकानं अगदी आपल्यापुरती आणि आपल्या कुटुंबीयांपुरती म्हणजे आपापल्या पातळीवर जरी पर्यावरणाची काळजी घेतली,तरी खूप काही साध्य होण्यासारखे आहे.सुदैवाने आता समाजात पर्यावरण रक्षणाविषयी जागरुकता बऱ्यापैकी वाढीला लागलेली आहे.
                                                                    
१९७२ सालीं,५ जून ते  १६ जून या दरम्यान स्वीडनची राजधानी स्टॉकहोम(stockholm )इथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत ११३ (113 )देशांनी पर्यावरणाच्या संरक्षणार्थ, संवर्धनार्थ २६ principles -सव्वीस सूत्रांचा पुरस्कार केला.दर वर्षी ५ जून रोजी विश्व पर्यावरण दिवस साजरा करण्याचा निर्णयही याच बैठकीत झाला. वस्तुत:प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिवस आहे.

आपले सगळे दैनंदिन व्यवहार पर्यावरणाला अनुकूल किंवा प्रतिकूल आकार देत असतात.किंबहुना आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक भाग हा पर्यावरणाला समर्पित आहे,म्हटलं तर वावगं ठरू नये.असं असताना आपण जाणीवपूर्वक पर्यावरण रक्षणाविषयी किती विचार करतो,हा चिंतनाचा विषय आहे.मुळात पर्यावरणशास्त्राची व्याप्ती बघा केवढी मोठी आहे.अगदी भौतिकशास्त्र,जीवशास्त्र,रसायनशास्त्र, भूगोल, खगोलशास्त्र,एवढंच काय, कला,वाणिज्य अशा सगळ्या शाखा,सगळे सजीव आणि निर्जीव घटक पर्यावरणाच्या छत्राखाली येतात. मात्र पोल्युशन,कार्बन फूटप्रिंट्स,ग्लोबल वार्मिंग,ग्रीन हाउस gas एमिशन्स वगैरे भलेथोरले शब्द ऐकूनच बावचळून जाऊन अनेक व्यक्ती पर्यावरण हा आपला प्रांत नव्हे,असा समज करून घेतात.त्या शब्दांच्या पसाऱ्यात भांबावून नं जाता  आपली जीवनशैली पर्यावरणाला पूरक आहे की मारक आहे,एवढं चिंतन जरी प्रत्येकानं केलं नी ती  काही अंशी सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येकानं केला तरी पुष्कळ काही साध्य होईल.

"ही पृथ्वी,ही जमीन,ही हवा,हे पाणी,हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला वारसा म्हणून दिलेले नाही;तर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीकडून मिळालेले ते ऋण आहे;त्यामुळे आपल्याला ज्या स्थितीत हे सारं मिळालं; किमान त्या स्थितीत ते पुढच्या पिढीच्या सुपूर्द करायचं आहे."गांधीजींच्या या वचनाची जाणीवही आपल्याला सतत व्हायला हवी."The earth does not belong to man;man belongs to the earth;"असं अमेरिकेतल्या सिएटलच्या रेड इंडियन आदिवासी जमातीच्या प्रमुखानं  अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखाला सन1800 च्या सुमारास लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखानं त्यांची जमीन विकत घेण्याबद्दल त्याला पत्र लिहिलं होतं,त्याला उत्तर देताना त्यानं पुढे म्हटलं होतं,"कुणी आकाश किंवा जमीन कसं काय खरेदी करू शकतं किंवा विकू शकतं? ही पृथ्वी आमची माता आहे.तिच्यावर काही आपत्ती येणं म्हणजेच तिच्या मुलांवरही आपत्ती येणं! या नद्या आम्हाला बंधुतुल्य आहेत..."दोनशे वर्षांपूर्वीचं त्याचं ते सबंध विवेचन आजही तितकंच यथार्थ आहे.  त्याला तेव्हा जे कळलं,ते आज इतकी प्रगती होऊनही मनुष्याला उमगत नाहीये,ही खरी शोकांतिका आहे.
वायूप्रदूषण,पाण्याचे प्रदूषण,ध्वनी प्रदूषण,यांबरोबरच आजच्या घडीला पर्यावरण ऱ्हासासाठी "प्रॉब्लेम ऑफ  प्लेन्टी " सुद्धा तितकाच जबाबदार आहे.कसा तो बघा;आपल्या घरात दोन मुले असतात नी वीस मुलांना पुरतील, एवढे कपडे असतात.आज जवळ जवळ प्रत्येक मध्यमवर्गीय घरात,कपाटात मावणार नाहीत,एवढ्या साड्या असतात. प्रत्येक कार्य-प्रसंगाच्या वेळी ठेवायला जागा पुरत नसते,तरीही भेटवस्तू,साड्या ह्यांचे ढीग अहेर म्हणून येतात आणि कहर म्हणजे कुठल्या लग्नाला वगैरे जायचं असेल,तेव्हा तिथे घालण्यासाठी साजेशी साडीच आपल्याजवळ नसल्याचा साक्षात्कार बहुतेक वेळा बहुतेकींना होतो.कुणे एके काळी दोन घरातले नी दोन बाहेरचे आणि काहीच ठेवणीतले कपडे असायचे.लहान भावंडे मोठ्या भावंडांची दप्तरे,शालेय पुस्तके आणि इतर सामग्री वापरत.(अर्थात हा सगळा जमाना आमच्या आधीच्या पिढीचा होता.)पूर्वी दिवाळी वर्षातून एकदा यायची,आज वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस दिवाळी असते.कुठल्या वस्तूची गरज इतकीशी असली तरी -अन गरज नसली,तरीही ती कृत्रिमरीत्या निर्माण करून,ती पुरवायला हजार पर्याय उपलब्ध आहेत,वस्तू इवलीशी असली तरी तिचे वेष्टन भले थोरले...बहुतांश वेळा एखाद्या वस्तूचा पुरेसा वापर करून व्हायच्या आत ती टाकून देऊन तीच वस्तू नव्यानं  आणली जाते.लग्नाबिग्नांच्या पार्ट्यांत किंवा इतर पार्ट्यांत वाया जाणारे अन्न बघून, ह्या देशात दारिद्र्यरेषेखाली  असणारे किंवा ज्यांना दोन वेळचे अन्न मिळत नाही असेही लोक आहेत,ह्यावर विश्वास बसणार नाही.ह्यांतली कुठलीही गोष्ट आकाशातून तर टपकलेली नाही.ती निर्माण करायला साधनसामुग्री,मनुष्यबळ,उर्जा सगळं लागलेलं असताना तिचा पुरेसा वापर नं करताच जर ती टाकून दिली तर त्यासाठी लागलेला पैसा, सामुग्री, मनुष्यबळ,उर्जा तर वाया जातंच,पण त्याच नव्या वस्तूच्या निर्मितीसाठी -मागणी अधिक म्हणून  पुरवठा पण अधिक होऊन पर्यावरणावर अतिरिक्त ताण येतो.त्याची किंमत नंतर आपल्याला वा आपल्या नंतरच्या पिढ्यांना वेगळ्या प्रकारानं चुकती करावी लागेल,हे आपल्या मनातही येत नाही." 'Earth provides enough to satisfy every man's needs, but not every man's greed." असं गांधीजींनी अगदी समर्पक शब्दांत सांगितलं होतं. 

"अहिंसा,सत्य,अस्तेय,ब्रम्ह्चर्य,अपरिग्रह"या यम-नियमाला विसरून,पाश्चात्य जीवनशैलीला आपलेसे करून आपण आता कसे एकदम मॉडर्न झालो म्हणून स्वत:वरच खूष होतो आहोत.त्यांची 'यूज अ‍ॅन्ड थ्रो '-वापरा आणि फेका संस्कृती आपण चटकन आत्मसात केली.गेल्यावर्षी अमेरिकेतल्या आमच्या महिनाभरातल्या वास्तव्यात ठायी-ठायी त्यांचा ओव्हर कन्झ्युमेरीझम,पेपर प्लेट्स नी ग्लासेस,पेपर napkins यांचा नको इतका वापर प्रत्ययाला येत होता.(मात्र इतका कचरा निर्माण करूनही तो सगळा व्यवस्थित dustbims ,कचरा कुंडीत टाकलेला.इवला कागदाचा कपटा देखील अन्यत्र पडलेला नाही,मुलखाच्या स्वच्छतेबद्दल,नियम नं तोडण्याबद्दल    तर त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं!तेवढं आपण बरं नाही आचरणात आणलं!आपल्याकडे लोकांच्या सवयी ही घाणेरडया! आपल्या कुठल्याही शहरात,होय,इथे दिल्लीत तर खूपच- कित्येक असंस्कृत लोक भरधाव वेगानं, बेगुमानपणे गाड़ी चालवतानासुद्धा,मध्येच दार उघडून पचकन रस्त्यांवर थुंकताना दिसतात.बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढून राजरोसपणे थुंकणारेही आहेत.कचरा कुठेही फेकावा हा अनेकांचा जणू जन्मसिद्ध हक्क असे ते वागतात. असो!) म्हणजे आधी तो भला थोरला कचरा-पक्षी पेपर प्लेट्स नी ग्लासेस,पेपर napkins वगैरे वस्तू-  निर्माण करायचा.त्यासाठी साधन सामुग्री,उर्जा वगैरे खर्ची घालायचं,लोकांनी त्या वस्तू पैसे खर्च करून विकत घ्यायच्या नी वापरून लगेच फेकून तो कचरा निर्माण करायचा आणि मग त्या कचऱ्याचं निर्मूलन करण्यासाठी, विल्हेवाट लावण्यासाठी करण्यासाठी पुन्हा साधन सामुग्री,उर्जा वगैरे खर्ची घालायचं.(आणि सशक्त अर्थव्यवस्थेच्या फुशारक्या मारायच्या!अमेरिकेत ट्वीन टॉवर वरच्या हल्ल्यानंतर लोक भीतीपोटी बाहेर पडेनासे झाले होते,वस्तू विकत घ्यायला,शॉपिंगसाठी  बाहेर पडत नव्हते,तेव्हा त्यांचे राष्ट्राध्यक्ष त्यांना मनात भीती 
बाळगू नका,बाहेर पडा,बाजारहाट करा,नाहीतर आपली इकॉनॉमी-अर्थव्यवस्था  कशी चालेल असं सांगत होते.) 

भल्या थोरल्या लोकसंख्येची भली थोरली बाजारपेठ म्हणून,ओव्हर कन्झ्युमेरीझमसाठी आता आपल्याला भलेही उद्युक्त केलं जात असलं तरी अमेरिकेसारखा ओव्हर कन्झ्युमेरीझम आपल्याला मुळीच परवडण्यासारखा नाही.अमेरिकेसारख्या प्रगत देशांच्या तुलनेत आपला उर्जेचा प्रतिमाणशी वापर भलेही कमी असेल.पण जो आहे तो निरर्थक गोष्टींसाठी व्हायला नको.जरा विचार करून पहा,आपली काही वर्षांपूर्वीची जीवनशैली काय टाकावू होती?आता मला वाटतं,अगदी लहानलहान मुलं सुद्धा पाटी-पेन्सिल वापरत  नसतील.खरं तर एवढ्या लहान मुलांना वह्यांची गरजच काय?यूज अ‍ॅन्ड थ्रो हवं तर थर्माकोलच्या वा पेपर प्लेट्स ना मजबूत पत्रावळीचा पर्याय अधिक पर्यावरण-स्नेही  नाही का?बुद्ध हा तर आद्य पर्यावरणवादी म्हणायला हवा.त्यानं यूज अ‍ॅन्ड थ्रो ऐवजी यूज अ‍ॅन्ड री-यूज ही संकल्पना तेव्हा दिली,आपल्या शिष्यांनी अंगावरची वस्त्रे जीर्ण झाल्यावर,त्यांचा अनेकवार वापर करून झाल्यावर त्यांची वात करून दिव्यात वापरण्याबद्दल त्याने सांगितले होते.

थोडक्यात, अनेक बाबतींत तर हा "प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी" टाळणं सर्वस्वी आपल्या हातात आहे.अजूनही वेळ गेलेली  नाही.पर्यावरणाच्या ऱ्हासाचा प्रश्न अधिक उग्र होऊन मानवाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होण्यापेक्षा आपल्या अति-चंगळवादाला मुरड घालणं केव्हाही अधिक श्रेयस्कर  ठरणार  नाही का?